शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीनंतर श्रेयासाठी आटापिटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2017 01:43 IST

शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयानंतर आता श्रेयासाठी सर्वपक्षीय आटापिटा सुरू झाला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळेच कर्जमाफीचा निर्णय झाल्याचा

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयानंतर आता श्रेयासाठी सर्वपक्षीय आटापिटा सुरू झाला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळेच कर्जमाफीचा निर्णय झाल्याचा दावा शिवसेनेने केला असून, त्यासाठी फलकबाजीसह वृत्तपत्रात जाहिरातदेखील दिली आहे. तर, विरोधकांच्या ‘संघर्ष यात्रे’मुळे सरकारला कर्जमाफीचा निर्णय घेणे भाग पडल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे. त्यामुळे श्रेयवादासाठीच्या या लढाईत शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीही मैदानात उतरल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी नेमण्यात आलेला मंत्रिगट आणि शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीच्या पहिल्याच बैठकीत अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय झाला; शिवाय सरसकट कर्जमाफीच्या मागणीला तत्त्वत: मान्यताही देण्यात आली. पहिल्याच बैठकीत सरकारला बळीराजासमोर नमते घ्यावे लागल्याचे चित्र निर्माण झाले. शेतकरी आंदोलनाला मिळालेल्या या अभूतपूर्व यशामुळे आता सर्वच राजकीय पक्षांनी दावेदारी सांगायला सुरुवात केली आहे. सत्तेत राहूनही विरोधकांची भूमिका वठविण्याचा आटापिटा करणाऱ्या शिवसेनेच्या नेते, आमदारांनी वृत्तपत्रात जाहिरात देत उद्धव ठाकरेंना श्रेय दिले आहे. उद्धव ठाकरे यांच्यामुळेच शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याचा दावा या जाहिरातीत करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांच्या लढ्याला अभूतपूर्व यश मिळाल्याचा दावा करणारी पोस्टरबाजीही शिवसेनेकडून करण्यात येत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीनेही कर्जमाफी आपल्यामुळेच झाल्याचा दावा केला आहे. शेतकऱ्यांचा संप, विरोधकांच्या संघर्ष यात्रेमुळे सरकारला तत्त्वत: सरसकट कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. कर्जमाफीची घोषणा झाली असली तरी अद्याप तसे आदेश निघाले नाहीत. त्यामुळे अंमलबजावणी होत नाही आणि सरकट सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष आक्रमकच राहील, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.सरकारला श्रेयाचे घेणेदेणे नाहीशेतकरी कर्जमाफीचे श्रेय घेण्यासाठी सर्व पक्षांमध्ये कुरघोडीचे राजकारण पाहायला मिळत असले, पोस्टरबाजी सुरू असली तरी याबाबत बोलताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, सरकारला श्रेयाचे काहीही घेणेदेणे नाही. कर्जमाफीबाबत सर्व राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटनांनी श्रेय घ्यावे.