शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीनंतर श्रेयासाठी आटापिटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2017 01:43 IST

शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयानंतर आता श्रेयासाठी सर्वपक्षीय आटापिटा सुरू झाला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळेच कर्जमाफीचा निर्णय झाल्याचा

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयानंतर आता श्रेयासाठी सर्वपक्षीय आटापिटा सुरू झाला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळेच कर्जमाफीचा निर्णय झाल्याचा दावा शिवसेनेने केला असून, त्यासाठी फलकबाजीसह वृत्तपत्रात जाहिरातदेखील दिली आहे. तर, विरोधकांच्या ‘संघर्ष यात्रे’मुळे सरकारला कर्जमाफीचा निर्णय घेणे भाग पडल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे. त्यामुळे श्रेयवादासाठीच्या या लढाईत शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीही मैदानात उतरल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी नेमण्यात आलेला मंत्रिगट आणि शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीच्या पहिल्याच बैठकीत अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय झाला; शिवाय सरसकट कर्जमाफीच्या मागणीला तत्त्वत: मान्यताही देण्यात आली. पहिल्याच बैठकीत सरकारला बळीराजासमोर नमते घ्यावे लागल्याचे चित्र निर्माण झाले. शेतकरी आंदोलनाला मिळालेल्या या अभूतपूर्व यशामुळे आता सर्वच राजकीय पक्षांनी दावेदारी सांगायला सुरुवात केली आहे. सत्तेत राहूनही विरोधकांची भूमिका वठविण्याचा आटापिटा करणाऱ्या शिवसेनेच्या नेते, आमदारांनी वृत्तपत्रात जाहिरात देत उद्धव ठाकरेंना श्रेय दिले आहे. उद्धव ठाकरे यांच्यामुळेच शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याचा दावा या जाहिरातीत करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांच्या लढ्याला अभूतपूर्व यश मिळाल्याचा दावा करणारी पोस्टरबाजीही शिवसेनेकडून करण्यात येत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीनेही कर्जमाफी आपल्यामुळेच झाल्याचा दावा केला आहे. शेतकऱ्यांचा संप, विरोधकांच्या संघर्ष यात्रेमुळे सरकारला तत्त्वत: सरसकट कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. कर्जमाफीची घोषणा झाली असली तरी अद्याप तसे आदेश निघाले नाहीत. त्यामुळे अंमलबजावणी होत नाही आणि सरकट सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष आक्रमकच राहील, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.सरकारला श्रेयाचे घेणेदेणे नाहीशेतकरी कर्जमाफीचे श्रेय घेण्यासाठी सर्व पक्षांमध्ये कुरघोडीचे राजकारण पाहायला मिळत असले, पोस्टरबाजी सुरू असली तरी याबाबत बोलताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, सरकारला श्रेयाचे काहीही घेणेदेणे नाही. कर्जमाफीबाबत सर्व राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटनांनी श्रेय घ्यावे.