शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

कर्जमाफीनंतर श्रेयासाठी आटापिटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2017 01:43 IST

शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयानंतर आता श्रेयासाठी सर्वपक्षीय आटापिटा सुरू झाला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळेच कर्जमाफीचा निर्णय झाल्याचा

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयानंतर आता श्रेयासाठी सर्वपक्षीय आटापिटा सुरू झाला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळेच कर्जमाफीचा निर्णय झाल्याचा दावा शिवसेनेने केला असून, त्यासाठी फलकबाजीसह वृत्तपत्रात जाहिरातदेखील दिली आहे. तर, विरोधकांच्या ‘संघर्ष यात्रे’मुळे सरकारला कर्जमाफीचा निर्णय घेणे भाग पडल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे. त्यामुळे श्रेयवादासाठीच्या या लढाईत शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीही मैदानात उतरल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी नेमण्यात आलेला मंत्रिगट आणि शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीच्या पहिल्याच बैठकीत अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय झाला; शिवाय सरसकट कर्जमाफीच्या मागणीला तत्त्वत: मान्यताही देण्यात आली. पहिल्याच बैठकीत सरकारला बळीराजासमोर नमते घ्यावे लागल्याचे चित्र निर्माण झाले. शेतकरी आंदोलनाला मिळालेल्या या अभूतपूर्व यशामुळे आता सर्वच राजकीय पक्षांनी दावेदारी सांगायला सुरुवात केली आहे. सत्तेत राहूनही विरोधकांची भूमिका वठविण्याचा आटापिटा करणाऱ्या शिवसेनेच्या नेते, आमदारांनी वृत्तपत्रात जाहिरात देत उद्धव ठाकरेंना श्रेय दिले आहे. उद्धव ठाकरे यांच्यामुळेच शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याचा दावा या जाहिरातीत करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांच्या लढ्याला अभूतपूर्व यश मिळाल्याचा दावा करणारी पोस्टरबाजीही शिवसेनेकडून करण्यात येत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीनेही कर्जमाफी आपल्यामुळेच झाल्याचा दावा केला आहे. शेतकऱ्यांचा संप, विरोधकांच्या संघर्ष यात्रेमुळे सरकारला तत्त्वत: सरसकट कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. कर्जमाफीची घोषणा झाली असली तरी अद्याप तसे आदेश निघाले नाहीत. त्यामुळे अंमलबजावणी होत नाही आणि सरकट सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष आक्रमकच राहील, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.सरकारला श्रेयाचे घेणेदेणे नाहीशेतकरी कर्जमाफीचे श्रेय घेण्यासाठी सर्व पक्षांमध्ये कुरघोडीचे राजकारण पाहायला मिळत असले, पोस्टरबाजी सुरू असली तरी याबाबत बोलताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, सरकारला श्रेयाचे काहीही घेणेदेणे नाही. कर्जमाफीबाबत सर्व राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटनांनी श्रेय घ्यावे.