शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

‘शेट्ट्येच्या मृत्यूनंतर कारागृहातील सुरक्षेवर विचार करणे आवश्यक’

By admin | Updated: July 1, 2017 03:01 IST

मंजुळा शेट्ट्येच्या मृत्यूनंतर कारागृहाच्या अंतर्गत सुरक्षेबाबत विचार करणे आवश्यक आहे, असे उच्च न्यायालयाने येरवडा कारागृहातील

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मंजुळा शेट्ट्येच्या मृत्यूनंतर कारागृहाच्या अंतर्गत सुरक्षेबाबत विचार करणे आवश्यक आहे, असे उच्च न्यायालयाने येरवडा कारागृहातील स्थितीबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना म्हटले.बाळू चौधरी उर्फ शिवाजी तुकाराम चौधरी (४१) याला पोलिसांनी एका गुन्ह्याप्रकरणी २०१४ मध्ये अटक केली, तेव्हापासून त्याला येरवडा कारागृहातच ठेवण्यात आले आहे. या कारागृहाच्या अमानवी स्थितीबाबत चौधरी याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.न्या. आर. एम. सावंत व न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती. अतिसुरक्षा असलेल्या अस्वच्छ आणि घाणेरड्या सेलमध्ये ठेवून कारागृह प्रशासन आपल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करत आहेत, तसेच कारागृहाच्या नियमानुसार आपल्याला ज्या सुविधा मिळायला हव्यात, त्याही देण्यात येत नसल्याचा आरोप चौधरी याने याचिकेद्वारे केला आहे. शुक्रवारच्या सुनावणीत सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी कारागृहांच्या काराभाराबद्दल आणखी एक याचिका दाखल केली असून, त्यावरील सुनावणी अन्य खंडपीठापुढे सुरू असल्याची माहिती न्यायालयाला दिली. त्या याचिकेत आणि या याचिकेत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांमध्ये साधर्म्य असल्याने, ही याचिकाही त्याच खंडपीठापुढे वर्ग करावी, अशी विनंती शिंदे यांनी न्यायालयाला केली.त्यावर न्यायालयाने त्याही याचिकेत (अन्य खंडपीठापुढे असलेली याचिका) कारागृहातील सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे का? अशी विचारणा सरकारकडे केली.‘शेट्ट्येच्या मृत्यूनंतर कारागृहातील सुरक्षेबाबत विचार करणे आवश्यक आहे. आरोपी / कैद्यांचीही सुरक्षा महत्त्वाची आहे,’ असे म्हणत, न्यायालयाने सरकारी वकिलांना याबाबत एका आठवड्यात सूचना घेण्याचे निर्देश दिले.