शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

‘शेट्ट्येच्या मृत्यूनंतर कारागृहातील सुरक्षेवर विचार करणे आवश्यक’

By admin | Updated: July 1, 2017 03:01 IST

मंजुळा शेट्ट्येच्या मृत्यूनंतर कारागृहाच्या अंतर्गत सुरक्षेबाबत विचार करणे आवश्यक आहे, असे उच्च न्यायालयाने येरवडा कारागृहातील

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मंजुळा शेट्ट्येच्या मृत्यूनंतर कारागृहाच्या अंतर्गत सुरक्षेबाबत विचार करणे आवश्यक आहे, असे उच्च न्यायालयाने येरवडा कारागृहातील स्थितीबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना म्हटले.बाळू चौधरी उर्फ शिवाजी तुकाराम चौधरी (४१) याला पोलिसांनी एका गुन्ह्याप्रकरणी २०१४ मध्ये अटक केली, तेव्हापासून त्याला येरवडा कारागृहातच ठेवण्यात आले आहे. या कारागृहाच्या अमानवी स्थितीबाबत चौधरी याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.न्या. आर. एम. सावंत व न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती. अतिसुरक्षा असलेल्या अस्वच्छ आणि घाणेरड्या सेलमध्ये ठेवून कारागृह प्रशासन आपल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करत आहेत, तसेच कारागृहाच्या नियमानुसार आपल्याला ज्या सुविधा मिळायला हव्यात, त्याही देण्यात येत नसल्याचा आरोप चौधरी याने याचिकेद्वारे केला आहे. शुक्रवारच्या सुनावणीत सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी कारागृहांच्या काराभाराबद्दल आणखी एक याचिका दाखल केली असून, त्यावरील सुनावणी अन्य खंडपीठापुढे सुरू असल्याची माहिती न्यायालयाला दिली. त्या याचिकेत आणि या याचिकेत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांमध्ये साधर्म्य असल्याने, ही याचिकाही त्याच खंडपीठापुढे वर्ग करावी, अशी विनंती शिंदे यांनी न्यायालयाला केली.त्यावर न्यायालयाने त्याही याचिकेत (अन्य खंडपीठापुढे असलेली याचिका) कारागृहातील सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे का? अशी विचारणा सरकारकडे केली.‘शेट्ट्येच्या मृत्यूनंतर कारागृहातील सुरक्षेबाबत विचार करणे आवश्यक आहे. आरोपी / कैद्यांचीही सुरक्षा महत्त्वाची आहे,’ असे म्हणत, न्यायालयाने सरकारी वकिलांना याबाबत एका आठवड्यात सूचना घेण्याचे निर्देश दिले.