शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

पतीच्या निधनानंतर 'तिला' वर्षभर डांबले

By admin | Updated: July 19, 2016 20:48 IST

मुलाच्या अपघाती निधनानंतर सुनेला मानसिक आधार देण्याऐवजी तिला वर्षभर अंधार कोठडीत डांबले. धडधाकट शरीरयष्टीची ती मरणासन्न अवस्थेत पोहोचली.

- वैभव बाबरेकर 

अमरावती, दि.19 -  मुलाच्या अपघाती निधनानंतर सुनेला मानसिक आधार देण्याऐवजी तिला वर्षभर अंधार कोठडीत डांबले. धडधाकट शरीरयष्टीची ती मरणासन्न अवस्थेत पोहोचली. समाजमन सुन्न करणारा हा गंभीर प्रकार तिवसा तालुक्यातील कुऱ्हा या गावी उघडकीस आला. जयश्री सुरेश दुधे (३५) असे या अत्याचारग्रस्त महिलेचे नाव आहे.कुऱ्हा येथील भाऊराव कुऱ्हाडे यांची कन्या जयश्रीचे २००१ मध्ये नांदेड जिल्ह्यातील माहुर येथील सुरेश दुधे यांच्याशी विवाह झाला. लग्नानंतर सुखी संसार सुरू झाला. त्यांना दोन मुलगे व एक मुलगी झालीे. सुखी संसारावर तीन वर्षांपूर्वी आघात झाला. जयश्रीचे पती सुरेश यांचे अपघाती निधन झाले. सासरच्या मंडळीने जयश्रीला छळणे सुरू केले. सुरेश यांच्या नावाने माहूर येथे १३ एकर शेतजमीन आहे. त्या शेतीच्या हव्यासापोटी हा छळ होता. जयश्रीने आई-वडिलांना सांगण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र, सासरच्या मंडळीने संधी मिळू दिली नाही. एकदा नातवांना भेटण्यासाठी म्हणून जयश्रीचे वडील भाऊराव यांनी माहूर गाठले. त्यावेळी सासरकडून होणाऱ्या छळाची माहिती जयश्रीने त्यांना दिली. भाऊराव यांनी जयश्रीला माहेरी आणले. सारेच सुरळीत सुरु असताना संपत्तीवर डोळा ठेवणाऱ्या सासरकरांनी जयश्रीच्या माहेरी जाऊन गोडीगुलाबीने तिला पुन्हा सासरी नेले. ती माया फसवी होती. जयश्रीचा पुन्हा अनन्वीत छळ सुरू झाला. वर्षभर आई-वडिलांशी ती संपर्क करू शकली नाही. 'हातावर कमावणे, पानावर खाणे' अशी स्थिती असल्याने वडीलही फारसे मागोवा घेऊ शकले नव्हते. त्याचाच गैरफायदा घेवून सासू, सासरे आणि दीर यांनी जयश्रीला वर्षभर अंधार कोठडीत डांबून ठेवले. अपुरे जेवण दिले. मारहाण केली. जयश्री आता हाडाच्या सापळ्यात रुपांतरित झाली आहे. तिचे डोळे निकामी झाले आहेत. १४ जुलै रोजी सासरच्या मंडळीने जयश्रीला मरणासन्न स्थितीत कुऱ्हा येथील वडिलांच्या घराबाहेर आणून सोडले. ग्रामस्थांनी माहुरकरांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी पोबारा ठोकला. वडिलांनी तिला तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात व तेथून जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. आता तिच्यावर अमरावतीत अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. 'त्या' तीन चिमुकल्यांची काळजी घेणार कोण?जयश्रीला संकेत (९), ऐश्वर्या (७), प्रणव (५) अशी तीन मुले आहेत. त्यांचे संगोपन सासरची मंडळी करीत असली तरी जयश्रीच्या पित्याला नातवंडांची चिंता आहे. वडिलांची छत्रछाया गमावलेल्या, आई मरणाच्या दारात असलेल्या त्या चिमुकल्यांकडे लक्ष द्यायला कुणीच नाही.

कुऱ्हा पोलिसांची असंवेदनशीलताभाऊराव कुऱ्हाडे यांनी जयश्रीवरील अन्यायाची तक्रार १५ जुलैला कुऱ्हा पोलीस ठाण्यात नोंदविली. अद्यापपर्यंत पोलिसांनी तिचे बयाणसुध्दा नोंदविले नाही. जयश्री अत्यवस्थेत असताना कुऱ्हा पोलिसांनी केलेले दुर्लक्ष संतापजनक आणि स्री अत्याचाराला बळ देणारे आहे.

यांनी दाखविली माणुसकी...जयश्रीला न्याय मिळावा, या उद्देशाने विवेक बिंड, संतोष धुमाळे, मनीष पोकळे, राजेश बिंड यांनी यांनी मदत केली. पोलिसांकडेही पाठपुरावा केला.माझ्या मुलीचा शारिरीक व मानसिक छळ करण्यात आला. तिला अन्न पाण्याविना अंधाऱ्या खोलीत वर्षभरापासून डांबून ठेवण्यात आले. त्यामुळे ती कमालीची अशक्त झाली आहे. कुऱ्हा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविलीे. मात्र, पोलिसांनी दखल घेतली नाही. पोलीस अधीक्षकांकडेही दाद मागितली, उपयोग झाला नाही. भाऊराव कुऱ्हाडे, जयश्रीचे वडीलमहिलेच्या छळाविषयी माहिती प्राप्त झाली. संबंधित ठाण्याला तत्काळ दखल घेण्याच्या सूचना दिल्या. गांभीर्याने दखल घेऊन त्वरित कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. - लखमी गौतम, पोलीस अधीक्षक, अमरावतीअन्नपाण्याविना महिला अशक्त झाली आहे. तिच्या सर्व तपासणी करून तिला हायप्रोटीन डायट देण्याच्या सूचना डॉक्टरांना दिल्या. आम्ही योग्य काळजी घेत आहोत. - अरुण राऊत,जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती अन्नपाण्याविना जयश्रीे अत्यंत अशक्त झाल्या आहेत. त्यांच्या हाडाचा सापळा दिसू लागला आहे. प्रकृती गंभीर असून उपचार सुरू केले आहेत. - सुनीता मेश्राम,वैद्यकीय अधिकारी, आयसीयू