शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
2
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
3
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
4
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
5
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
6
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
7
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
8
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
9
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
10
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
11
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
12
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
13
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
14
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
15
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
16
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
17
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
18
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
19
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
20
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर

पतीच्या निधनानंतर 'तिला' वर्षभर डांबले

By admin | Updated: July 19, 2016 20:48 IST

मुलाच्या अपघाती निधनानंतर सुनेला मानसिक आधार देण्याऐवजी तिला वर्षभर अंधार कोठडीत डांबले. धडधाकट शरीरयष्टीची ती मरणासन्न अवस्थेत पोहोचली.

- वैभव बाबरेकर 

अमरावती, दि.19 -  मुलाच्या अपघाती निधनानंतर सुनेला मानसिक आधार देण्याऐवजी तिला वर्षभर अंधार कोठडीत डांबले. धडधाकट शरीरयष्टीची ती मरणासन्न अवस्थेत पोहोचली. समाजमन सुन्न करणारा हा गंभीर प्रकार तिवसा तालुक्यातील कुऱ्हा या गावी उघडकीस आला. जयश्री सुरेश दुधे (३५) असे या अत्याचारग्रस्त महिलेचे नाव आहे.कुऱ्हा येथील भाऊराव कुऱ्हाडे यांची कन्या जयश्रीचे २००१ मध्ये नांदेड जिल्ह्यातील माहुर येथील सुरेश दुधे यांच्याशी विवाह झाला. लग्नानंतर सुखी संसार सुरू झाला. त्यांना दोन मुलगे व एक मुलगी झालीे. सुखी संसारावर तीन वर्षांपूर्वी आघात झाला. जयश्रीचे पती सुरेश यांचे अपघाती निधन झाले. सासरच्या मंडळीने जयश्रीला छळणे सुरू केले. सुरेश यांच्या नावाने माहूर येथे १३ एकर शेतजमीन आहे. त्या शेतीच्या हव्यासापोटी हा छळ होता. जयश्रीने आई-वडिलांना सांगण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र, सासरच्या मंडळीने संधी मिळू दिली नाही. एकदा नातवांना भेटण्यासाठी म्हणून जयश्रीचे वडील भाऊराव यांनी माहूर गाठले. त्यावेळी सासरकडून होणाऱ्या छळाची माहिती जयश्रीने त्यांना दिली. भाऊराव यांनी जयश्रीला माहेरी आणले. सारेच सुरळीत सुरु असताना संपत्तीवर डोळा ठेवणाऱ्या सासरकरांनी जयश्रीच्या माहेरी जाऊन गोडीगुलाबीने तिला पुन्हा सासरी नेले. ती माया फसवी होती. जयश्रीचा पुन्हा अनन्वीत छळ सुरू झाला. वर्षभर आई-वडिलांशी ती संपर्क करू शकली नाही. 'हातावर कमावणे, पानावर खाणे' अशी स्थिती असल्याने वडीलही फारसे मागोवा घेऊ शकले नव्हते. त्याचाच गैरफायदा घेवून सासू, सासरे आणि दीर यांनी जयश्रीला वर्षभर अंधार कोठडीत डांबून ठेवले. अपुरे जेवण दिले. मारहाण केली. जयश्री आता हाडाच्या सापळ्यात रुपांतरित झाली आहे. तिचे डोळे निकामी झाले आहेत. १४ जुलै रोजी सासरच्या मंडळीने जयश्रीला मरणासन्न स्थितीत कुऱ्हा येथील वडिलांच्या घराबाहेर आणून सोडले. ग्रामस्थांनी माहुरकरांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी पोबारा ठोकला. वडिलांनी तिला तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात व तेथून जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. आता तिच्यावर अमरावतीत अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. 'त्या' तीन चिमुकल्यांची काळजी घेणार कोण?जयश्रीला संकेत (९), ऐश्वर्या (७), प्रणव (५) अशी तीन मुले आहेत. त्यांचे संगोपन सासरची मंडळी करीत असली तरी जयश्रीच्या पित्याला नातवंडांची चिंता आहे. वडिलांची छत्रछाया गमावलेल्या, आई मरणाच्या दारात असलेल्या त्या चिमुकल्यांकडे लक्ष द्यायला कुणीच नाही.

कुऱ्हा पोलिसांची असंवेदनशीलताभाऊराव कुऱ्हाडे यांनी जयश्रीवरील अन्यायाची तक्रार १५ जुलैला कुऱ्हा पोलीस ठाण्यात नोंदविली. अद्यापपर्यंत पोलिसांनी तिचे बयाणसुध्दा नोंदविले नाही. जयश्री अत्यवस्थेत असताना कुऱ्हा पोलिसांनी केलेले दुर्लक्ष संतापजनक आणि स्री अत्याचाराला बळ देणारे आहे.

यांनी दाखविली माणुसकी...जयश्रीला न्याय मिळावा, या उद्देशाने विवेक बिंड, संतोष धुमाळे, मनीष पोकळे, राजेश बिंड यांनी यांनी मदत केली. पोलिसांकडेही पाठपुरावा केला.माझ्या मुलीचा शारिरीक व मानसिक छळ करण्यात आला. तिला अन्न पाण्याविना अंधाऱ्या खोलीत वर्षभरापासून डांबून ठेवण्यात आले. त्यामुळे ती कमालीची अशक्त झाली आहे. कुऱ्हा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविलीे. मात्र, पोलिसांनी दखल घेतली नाही. पोलीस अधीक्षकांकडेही दाद मागितली, उपयोग झाला नाही. भाऊराव कुऱ्हाडे, जयश्रीचे वडीलमहिलेच्या छळाविषयी माहिती प्राप्त झाली. संबंधित ठाण्याला तत्काळ दखल घेण्याच्या सूचना दिल्या. गांभीर्याने दखल घेऊन त्वरित कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. - लखमी गौतम, पोलीस अधीक्षक, अमरावतीअन्नपाण्याविना महिला अशक्त झाली आहे. तिच्या सर्व तपासणी करून तिला हायप्रोटीन डायट देण्याच्या सूचना डॉक्टरांना दिल्या. आम्ही योग्य काळजी घेत आहोत. - अरुण राऊत,जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती अन्नपाण्याविना जयश्रीे अत्यंत अशक्त झाल्या आहेत. त्यांच्या हाडाचा सापळा दिसू लागला आहे. प्रकृती गंभीर असून उपचार सुरू केले आहेत. - सुनीता मेश्राम,वैद्यकीय अधिकारी, आयसीयू