शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
5
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
6
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
9
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
10
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
11
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
12
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
13
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
14
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
15
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
16
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
17
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
18
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
19
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
20
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा

मुलाच्या निधनानंतर पित्यानेही त्यागले प्राण

By admin | Updated: June 22, 2015 01:54 IST

‘फादर्स डे’ला अकोला जिल्हय़ात घडली घटना.

शरद वाघोलकर/ गांधीग्राम (अकोला): आई व मुलाच्या नात्यातील प्रेमाची महती नेहमीच चर्चिली जाते. प्रेमाचा असाच ओलावा मुलाच्या व पित्याच्या नात्यातही बरेचदा जाणवतो. राजा दशरथाने पुत्र वियोगात प्राण त्यागल्याची पौराणिक कथा सर्वश्रुत आहे. मुलाच्या निधनानंतर पित्याने प्राण सोडल्याची अशीच मन हेलावणारी घटना अकोल्यापासून १२ किलोमीटर अंतरावरील गांधीग्राम येथे ह्यफादर्स डेह्णला दुपारी ३.३0 वाजता घडली. गांधीग्राम येथील सुखदेव लक्ष्मण सदांशिव यांना तीन मुलींपाठोपाठ झालेला अशोक हा एकुलता एक मुलगा. वायरमन म्हणून काम करून तो उदरनिर्वाह चालवित असे. वडिलांनी आयुष्यभर मोलमजुरी करून मुला-मुलींची लग्ने पार पाडली; पण वयाची ऐंशी गाठल्यानंतर त्यांच्याकडून कष्टाची कामे होत नसल्याने घर चालविण्याची जबाबदारी अशोकवर येऊन पडली. त्याची पत्नीही मोलमजुरी करून हातभार लावत असे. या व्यापात अशोकला क्षयरोगाने ग्रासले. आपल्याला आजार झाल्याचे त्याला कळल्यानंतर त्याने उपचार सुरू केले; मात्र उपचार सुरू असतानाच तो वायरमनची कामे करीत असे. त्याच्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. अशातच रविवार, २१ जून रोजी त्याचे निधन झाले. या घटनेने त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. अशोकची अंत्ययात्रा दुपारी २ वाजता निघाली. त्याच्यावर अंत्यसंस्कार करून गावकरी व नातेवाईक मंडळी घरी पोहोचत नाही तोच, पुत्रवियोगाने अशोकचे वडील सुखदेव सदांशिव यांनीही प्राण सोडले. या घटनेने त्यांचे कुटुंबीय शोकसागरात बुडाले. पुत्राच्या निधनाच्या दु:खामुळे पित्याचा मृत्यू झाल्याने एकाच दिवशी मुलापाठोपाठ पित्यावर अंत्यसंस्कार करण्याची पाळी नातेवाईक व गावकर्‍यांवर आली. आता कुटुंबात अशोकची आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा आप्त परिवार आहे.