शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
4
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
5
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
6
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
7
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
8
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
9
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
10
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
11
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
12
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
13
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
14
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
15
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
16
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
17
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
19
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
20
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल

मुंबईपाठोपाठ नागपुरातही काँग्रेस-राष्ट्रवादीचा काडीमोड

By admin | Updated: January 31, 2017 22:28 IST

राष्ट्रवादीने आघाडी करण्याबाबत दिलेल्या प्रस्तावाला काँग्रेसने सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे अखेर आघाडी तुटली आहे

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 31 - राष्ट्रवादीने आघाडी करण्याबाबत दिलेल्या प्रस्तावाला काँग्रेसने सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे अखेर आघाडी तुटली आहे. प्रस्ताव देणाऱ्या राष्ट्रवादीनेच आघाडी तुटल्याची घोषणा करण्यात पुढाकार घेतला आहे. नागपुरात भाजपासारख्या बलाढ्य पक्षाशी सामना असल्यामुळे तसेच चार सदस्यीय प्रभाग आघाडी तुटल्यामुळे आता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांपुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बुधवारी दिवसभर काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क साधून आघाडीची बोलणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काँग्रेसचे सर्वच नेते मुंबईत संसदीय मंडळाच्या बैठकीसाठी गेले आहेत. त्यामुळे फक्त मोबाईलवर चर्चेच्या फेऱ्या होत राहिल्या. शेवटी तोडगा निघत नसल्यामुळे बुधवारी रात्री ८.३० वाजता राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष माजी मंत्री अनिल देशमुख यांनी प्रसिद्धिपत्रक जारी करीत आघाडी तुटल्याची व राष्ट्रवादी आता स्वबळावरच लढेल, अशी घोषणा केली. देशमुख यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, जातीयवादी शक्तीला थांबविण्यासाठी समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढविण्याचा आमचा प्रयत्न होता. यासाठी काँग्रेसकडे प्रस्ताव देण्यात आला होता. काँग्रेस नेत्यांसोबत बैठका घेऊन चर्चाही करण्यात आली. मात्र, राष्ट्रवादीसाठी पोषक वातावरण असलेल्या जागाही सोडण्यास काँग्रेस तयार नव्हती. काँग्रेसने अखेरपर्यंत वेळकाढू धोरण सुरू ठेवले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ निघत आहे. काँग्रेस पाहू, थांबा असे सांगत आहे. यामुळे राष्ट्रवादी इतर समविचारी पक्षाला सोबत घेऊन स्वबळावर निवडणुकीला सामोरे जात आहे, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले. गेल्या निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादीची २९ जागांवर आघाडी झाली होती. याशिवाय दोन्ही पक्षांनी आघाडी धर्म न पाळता आपल्या उमेदवारांना ए-बी फॉर्म दिल्याने तीन जागांवर मैत्रीपूर्ण लढत झाली होती. निकालानंतर राष्ट्रवादीने ६ तर काँग्रेसने ४१ जागा जिंकल्या होत्या.