शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईपाठोपाठ नागपुरातही काँग्रेस-राष्ट्रवादीचा काडीमोड

By admin | Updated: January 31, 2017 22:28 IST

राष्ट्रवादीने आघाडी करण्याबाबत दिलेल्या प्रस्तावाला काँग्रेसने सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे अखेर आघाडी तुटली आहे

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 31 - राष्ट्रवादीने आघाडी करण्याबाबत दिलेल्या प्रस्तावाला काँग्रेसने सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे अखेर आघाडी तुटली आहे. प्रस्ताव देणाऱ्या राष्ट्रवादीनेच आघाडी तुटल्याची घोषणा करण्यात पुढाकार घेतला आहे. नागपुरात भाजपासारख्या बलाढ्य पक्षाशी सामना असल्यामुळे तसेच चार सदस्यीय प्रभाग आघाडी तुटल्यामुळे आता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांपुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बुधवारी दिवसभर काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क साधून आघाडीची बोलणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काँग्रेसचे सर्वच नेते मुंबईत संसदीय मंडळाच्या बैठकीसाठी गेले आहेत. त्यामुळे फक्त मोबाईलवर चर्चेच्या फेऱ्या होत राहिल्या. शेवटी तोडगा निघत नसल्यामुळे बुधवारी रात्री ८.३० वाजता राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष माजी मंत्री अनिल देशमुख यांनी प्रसिद्धिपत्रक जारी करीत आघाडी तुटल्याची व राष्ट्रवादी आता स्वबळावरच लढेल, अशी घोषणा केली. देशमुख यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, जातीयवादी शक्तीला थांबविण्यासाठी समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढविण्याचा आमचा प्रयत्न होता. यासाठी काँग्रेसकडे प्रस्ताव देण्यात आला होता. काँग्रेस नेत्यांसोबत बैठका घेऊन चर्चाही करण्यात आली. मात्र, राष्ट्रवादीसाठी पोषक वातावरण असलेल्या जागाही सोडण्यास काँग्रेस तयार नव्हती. काँग्रेसने अखेरपर्यंत वेळकाढू धोरण सुरू ठेवले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ निघत आहे. काँग्रेस पाहू, थांबा असे सांगत आहे. यामुळे राष्ट्रवादी इतर समविचारी पक्षाला सोबत घेऊन स्वबळावर निवडणुकीला सामोरे जात आहे, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले. गेल्या निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादीची २९ जागांवर आघाडी झाली होती. याशिवाय दोन्ही पक्षांनी आघाडी धर्म न पाळता आपल्या उमेदवारांना ए-बी फॉर्म दिल्याने तीन जागांवर मैत्रीपूर्ण लढत झाली होती. निकालानंतर राष्ट्रवादीने ६ तर काँग्रेसने ४१ जागा जिंकल्या होत्या.