शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
4
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
7
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
8
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
9
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
10
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
11
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
12
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
13
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
14
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
15
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
16
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
18
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
19
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
20
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार

स्पष्ट बहुमतानंतर ठाण्यातील शिवसेना नगरसेवकांची पिकनिक

By admin | Updated: March 2, 2017 03:33 IST

ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना २५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच स्वबळावर लढली

ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना २५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच स्वबळावर लढली आणि त्यांना ठाणेकरांनी स्पष्ट बहुमत दिल्यानंतरही पक्षाने सर्व नगरसेवकांना अलिबागला नेले आहे. दगाफटका होऊ नये म्हणून हे पाऊल उचलले असले, तरी सेना नेत्यांनी त्याचा इन्कार केला आहे. निवडणुकीचा शीण घालवण्यासाठी ही पिकनिक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या सर्वांना एकत्रित अलिबागला नेल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली. या नगरसेवकांना अज्ञातवासात नेले नसून केवळ निवडणुकीतील शीण घालवण्यासाठी हा दौरा आयोजित केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अर्ज भरण्यासाठी येणारे मोजके नगरसेवक वगळता उरलेले नगरसेवक आता थेट ६ तारखेला महापौरपदाच्या निवडणुकीच्या दिवशी हजर होतील, अशी माहिती हाती आली आहे.दरम्यान, २०१२ मध्ये युतीला बहुमत मिळाले असतानादेखील एक महिला नगरसेविका गायब झाली होती. त्यामुळे या मुद्यावरून चांगलेच रण माजले होते. त्यामुळे या वेळी स्पष्ट बहुमत मिळवूनही कोणताही दगाफटका नको म्हणूनच ही खेळी खेळली गेली आहे. यामध्ये नव्या उमेदवारांना ज्येष्ठांच्या नजरकैदेत ठेवण्यात येत असल्याचे समजते. (प्रतिनिधी) हा अज्ञातवास नव्हे!स्पष्ट बहुमतामुळे शिवसेना नगरसेवकांना अज्ञातवासात जाण्याची गरज नाही. त्यामुळे ही पिकनिक असल्याचे सेना नेते सांगत आहेत. पुढील पाच वर्षांत कसे काम करावे, सभागृह कसे चालवावे, हे ज्येष्ठ नगरसेवक त्यांना शिकवणार आहेत.