शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

अखेर तीन कुटुंबे बहिष्कारमुक्त

By admin | Updated: October 30, 2015 01:23 IST

जादूटोणा करीत असल्याच्या संशयावरून गावाने बहिष्कृत केलेल्या तीन कुटुंबांना ‘लोकमत’च्या पाठपुराव्यानंतर अखेर न्याय मिळाला. बुधवारी रात्री गावकऱ्यांनी त्या तीन कुटुंबांना बहिष्कारातून मुक्त केले.

संतोष कुंडकर, चंद्रपूरजादूटोणा करीत असल्याच्या संशयावरून गावाने बहिष्कृत केलेल्या तीन कुटुंबांना ‘लोकमत’च्या पाठपुराव्यानंतर अखेर न्याय मिळाला. बुधवारी रात्री गावकऱ्यांनी त्या तीन कुटुंबांना बहिष्कारातून मुक्त केले.‘लोकमत’ने २८ आॅक्टोबर रोजी या संबंधीचे वृत्त प्रकाशित केले होते. चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी या वृत्ताची दखल घेत, बुधवारी सायंकाळी मूलचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाबाराव महामुने आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विदर्भ संघटक हरिभाऊ पाथोडे यांना तातडीने आंबोली येथे रवाना केले. तेथे महामुने यांनी गावकऱ्यांची बैठक घेतली. सर्वप्रथम गोकुलदास मेश्राम, इंद्रजीत गावतुरे, आनंदराव नन्नावरे या बहिष्कृत कुटुंंब प्रमुखांची बाजू ऐकून घेण्यात आली. त्यानंतर गावकऱ्यांनही बोलण्याची संधी देण्यात आली. यावेळी बाबाराव महामुने यांनी गावकऱ्यांना जादूटोणाविरोधी कायद्याबाबत माहिती दिली. हे कृत्य कसे कायद्याच्या विरुद्ध आहे आणि त्याचे काय दुष्पपरिणाम होतील, हे पटवून दिले. त्यानंतर हरिभाऊ पाथोडे यांनी दीड तास गावकऱ्यांचे प्रबोधन केले. अखेर गावकऱ्यांनी आपली चूक कबूल करीत, आजपासून आम्ही त्या तीन कुटुंबांवरील बहिष्कार मागे घेत आहोत, असे जाहीर करून यापुढे गावातील एकोपा कायम राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे सांगितले. पोलिसांना तसे लेखी दिले. त्यामुळे बहिष्कार प्रकरणावर पडदा पडला.