शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
2
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
3
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
4
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
5
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
6
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
7
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
8
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
9
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
10
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
11
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
12
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
13
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
14
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
15
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
16
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
17
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
18
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
19
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
20
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!

अखेर कोयना प्रकल्पग्रस्तांची घेतली दखल

By admin | Updated: August 2, 2016 02:48 IST

कोयना प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे वेगवेगळ्या ठिकाणी नावापुरते पुनर्वसन झाले आहे.

कळंबोली : कोयना प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे वेगवेगळ्या ठिकाणी नावापुरते पुनर्वसन झाले आहे. मात्र आजही ही गावे पायाभूत सुविधांच्या प्रतीक्षेत आहेत. यासंदर्भात वेगवेगळ्या संघटना गेल्या काही वर्षांपासून सरकारकडे पाठपुरावा करीत असल्या तरी त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. याबाबत मराठा समाज सेवा संघाने उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र देवून अन्यायाला वाचा फोडली होती. त्यानुसार मुख्य न्यायाधीशांनी राज्य शासनाला आदेश दिले होते. त्यानंतर राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. १९५९ मध्ये सातारा जिल्ह्यातील ८२ गावे कोयना जलविद्युत प्रकल्पामुळे बाधित झाली. शासनाने त्यांचे पुनर्वसन रायगड, ठाणे, रत्नागिरी, सातारा, सांगली आणि पालघर जिल्ह्यात केले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कोयना प्रकल्पग्रस्तांना शासकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. यामध्ये पर्यायी १६ एकर जमिनीचे वाटप, दोन व्यक्तींना शासकीय नोकरी, विविध प्रकारच्या १३ नागरी सुविधा, मोफत वीज पुरवठा आदी आश्वासने देण्यात आली होती. मात्र इतक्या वर्षांनंतरही आश्वासनांची पूर्तता न झाल्याने प्रकल्पग्रस्त अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. मराठा समाज सेवा संघ नवी मुंबईचे अध्यक्ष मुकुंद कदम यांनी मुख्यमंत्री, राज्यपाल, पंतप्रधान, मुख्य न्यायाधीश आठ मंत्र्यांना निवेदन दिले होते. या पत्राची मुख्य न्यायाधीशांनी दखल देत शासनाने याबाबत पावले उचलण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर राज्याच्या मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली बैठक घेतली. >आझाद मैदानावर धरणेसातारा येथील धरणात बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी मंगळवार, २ आॅगस्ट रोजी आझाद मैदानावर एल्गार पुकारला आहे. त्यांना इतर जिल्ह्यातील उपेक्षित असलेले कोयना पुनर्वसितांकडून पाठिंबा देण्यात आला आहे.