शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

अखेर कोयना प्रकल्पग्रस्तांची घेतली दखल

By admin | Updated: August 2, 2016 02:48 IST

कोयना प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे वेगवेगळ्या ठिकाणी नावापुरते पुनर्वसन झाले आहे.

कळंबोली : कोयना प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे वेगवेगळ्या ठिकाणी नावापुरते पुनर्वसन झाले आहे. मात्र आजही ही गावे पायाभूत सुविधांच्या प्रतीक्षेत आहेत. यासंदर्भात वेगवेगळ्या संघटना गेल्या काही वर्षांपासून सरकारकडे पाठपुरावा करीत असल्या तरी त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. याबाबत मराठा समाज सेवा संघाने उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र देवून अन्यायाला वाचा फोडली होती. त्यानुसार मुख्य न्यायाधीशांनी राज्य शासनाला आदेश दिले होते. त्यानंतर राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. १९५९ मध्ये सातारा जिल्ह्यातील ८२ गावे कोयना जलविद्युत प्रकल्पामुळे बाधित झाली. शासनाने त्यांचे पुनर्वसन रायगड, ठाणे, रत्नागिरी, सातारा, सांगली आणि पालघर जिल्ह्यात केले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कोयना प्रकल्पग्रस्तांना शासकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. यामध्ये पर्यायी १६ एकर जमिनीचे वाटप, दोन व्यक्तींना शासकीय नोकरी, विविध प्रकारच्या १३ नागरी सुविधा, मोफत वीज पुरवठा आदी आश्वासने देण्यात आली होती. मात्र इतक्या वर्षांनंतरही आश्वासनांची पूर्तता न झाल्याने प्रकल्पग्रस्त अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. मराठा समाज सेवा संघ नवी मुंबईचे अध्यक्ष मुकुंद कदम यांनी मुख्यमंत्री, राज्यपाल, पंतप्रधान, मुख्य न्यायाधीश आठ मंत्र्यांना निवेदन दिले होते. या पत्राची मुख्य न्यायाधीशांनी दखल देत शासनाने याबाबत पावले उचलण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर राज्याच्या मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली बैठक घेतली. >आझाद मैदानावर धरणेसातारा येथील धरणात बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी मंगळवार, २ आॅगस्ट रोजी आझाद मैदानावर एल्गार पुकारला आहे. त्यांना इतर जिल्ह्यातील उपेक्षित असलेले कोयना पुनर्वसितांकडून पाठिंबा देण्यात आला आहे.