शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
3
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
4
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
5
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
6
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
7
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
8
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
9
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
10
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
11
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
12
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
13
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
14
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
15
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट, जम्मूपासून जैसलमेरपर्यंत मोठ्या घडामोडी
16
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
17
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
18
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
19
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
20
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी

तब्बल २८ वर्षांनंतर दहावीचे गणित सुटले

By admin | Updated: June 10, 2015 03:09 IST

पन्नाशीचे चोगले तब्बल २८ वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर दहावी उत्तीर्ण झाल्याने त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.

मुंबई : अविनाश भालचंद्र चोगले हे मुख्यमंत्री कार्यालयातील शिपाई मंगळवारी मंत्रालयात पेढे वाटत फिरत होते. पन्नाशीचे चोगले तब्बल २८ वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर दहावी उत्तीर्ण झाल्याने त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. प्रत्येकाच्या हातावर पेढा ठेवताना आता यापुढे आपण ‘शिपाईगिरी’ करणार नाही कारकून होणार, हे ते आवर्जून सांगत होते.चोगले हे १९८७ मध्ये सर्वात प्रथम दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्या वेळी इंग्रजी, गणित, इतिहास-भूगोल आणि हिंदी या चार विषयांत त्यांना अपयश आले. १९९० मध्ये त्यांना सार्वजनिक आरोग्य विभागात शिपायाची नोकरी लागली. आपण दहावी झालो नाही याची खंत चोगले यांना सतत जाणवायची. त्यांनी खासगी क्लास लावून मार्च व आॅक्टोबर असा परीक्षा देण्याचा सपाटा लावला. हिंदी, इतिहास-भूगोल इतकेच काय इंग्रजी हे विषय टप्प्याटप्प्याने सुटले. मात्र गणिताच्या कोड्याने चोगलेंची दहावीची वाट रोखली होती. भांडुपच्या नवजीवन विद्यामंदिरातील शिक्षक आणि आई-वडील व पत्नी यांनी चोगले यांची पाठराखण केली. घरचा मासे विक्रीचा व्यवसाय आई पाहायची. आता पंच्याहत्तरी झालेल्या आईला हा व्यवसाय करणे झेपत नाही. त्यामुळे चोगले यांच्यावर ही जबाबदारी येऊन पडली. परंतु पत्नीने ही जबाबदारी घेत आपल्या नवऱ्याला सकाळचा वेळ अभ्यास करायची उसंत दिली. कार्यालयातील फावल्या वेळात चोगले गणित सोडवायचे़ गेल्या २८ वर्षांतील प्रश्नपत्रिका त्यांनी अनेकदा सोडवल्या. पन्नाशीला आलेल्या चोगलेंनी या वेळी गणित सोडवण्याचा निर्धार केला होता. निकालाच्या अगोदर त्यांना दहावी उत्तीर्ण झाल्याचे कळले होते. तरीही धडधडत्या छातीने सोमवारी आपला निकाल पाहिला. ३८ गुण मिळवून चोगलेंचे गणित सुटले. (विशेष प्रतिनिधी)