शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

वीरपत्नीला २७ वर्षांच्या लढाईनंतर पेन्शन

By admin | Updated: April 11, 2017 01:23 IST

दुसऱ्या महायुद्धात देशाची सेवा करणाऱ्या वीर जवानाच्या विधवा पत्नीला शासकीय यंत्रणा तिला मिळणाऱ्या पेन्शनसाठी दारोदारी भटकायला लावणाऱ्या राज्य शासनाला उच्च

मुंबई/कोल्हापूर : दुसऱ्या महायुद्धात देशाची सेवा करणाऱ्या वीर जवानाच्या विधवा पत्नीला शासकीय यंत्रणा तिला मिळणाऱ्या पेन्शनसाठी दारोदारी भटकायला लावणाऱ्या राज्य शासनाला उच्च न्यायालयाने सोमवारी कडक शब्दांत फटकारले व पुढच्या सोमवारी पेन्शन देण्याचा आदेशच घेऊन येण्यास बजावले. कोणतीही सबब ऐकली जाणार नसल्याचे स्पष्ट करत उच्च न्यायालयाच्या न्या. अनुप मोहता व न्या. रवींद्र घुगे यांच्या खंडपीठाने १७ तारखेपर्यंत सुनावणी तहकूब केली. शिरोळ (जि.कोल्हापूर) येथील तुळसाबाई गणपती सूर्यवंशी या ७६ वर्षीय वृद्ध महिलेला सन १९९० पासून म्हणजेच गेल्या वीस वर्षांपासून महाराष्ट्र राज्य व कर्नाटक राज्य सरकारे पेन्शनसाठी तांत्रिक कारणे काढून खेळवत असल्याचा संतापजनक प्रकार पुढे आला आहे. याला कंटाळून या वीरपत्नीने अ‍ॅड. धैर्यशील सुतार यांच्यामार्फत उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावून याचिका दाखल केली.अ‍ॅड. सुतार यांनी युक्तिवादात सांगितले की,‘तुळसाबाई यांचे पती गणपती सूर्यवंशी हे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लष्करात दाखल झाले. त्यानंतर १९४७ मध्ये ते सेवेतून निवृत्त झाले. तद्नंतर गणपती सूर्यवंशी व कुटुंबीय हे कर्नाटक राज्यातील अथणी तालुक्यातील रहिवासी होते. ते तेथेच कायमस्वरूपी स्थायिक झाले. गणपती सूर्यवंशी यांचे १९८५ मध्ये निधन झाले. तद्नंतर १९९० मध्ये श्रीमती तुळसाबाई त्यांच्या मुलासह महाराष्ट्रात शिरोळ गावी राहण्यास आल्या आणि कायमस्वरूपी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी बनल्या. आजअखेर त्या महाराष्ट्रात कायमस्वरूपी रहिवास करून आहेत. (प्रतिनिधी)