शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
4
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
5
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
6
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
7
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
8
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
9
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
10
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
11
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
12
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
13
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
14
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
15
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
16
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
17
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
18
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
19
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
20
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!

वीरपत्नीला २७ वर्षांच्या लढाईनंतर पेन्शन

By admin | Updated: April 11, 2017 01:23 IST

दुसऱ्या महायुद्धात देशाची सेवा करणाऱ्या वीर जवानाच्या विधवा पत्नीला शासकीय यंत्रणा तिला मिळणाऱ्या पेन्शनसाठी दारोदारी भटकायला लावणाऱ्या राज्य शासनाला उच्च

मुंबई/कोल्हापूर : दुसऱ्या महायुद्धात देशाची सेवा करणाऱ्या वीर जवानाच्या विधवा पत्नीला शासकीय यंत्रणा तिला मिळणाऱ्या पेन्शनसाठी दारोदारी भटकायला लावणाऱ्या राज्य शासनाला उच्च न्यायालयाने सोमवारी कडक शब्दांत फटकारले व पुढच्या सोमवारी पेन्शन देण्याचा आदेशच घेऊन येण्यास बजावले. कोणतीही सबब ऐकली जाणार नसल्याचे स्पष्ट करत उच्च न्यायालयाच्या न्या. अनुप मोहता व न्या. रवींद्र घुगे यांच्या खंडपीठाने १७ तारखेपर्यंत सुनावणी तहकूब केली. शिरोळ (जि.कोल्हापूर) येथील तुळसाबाई गणपती सूर्यवंशी या ७६ वर्षीय वृद्ध महिलेला सन १९९० पासून म्हणजेच गेल्या वीस वर्षांपासून महाराष्ट्र राज्य व कर्नाटक राज्य सरकारे पेन्शनसाठी तांत्रिक कारणे काढून खेळवत असल्याचा संतापजनक प्रकार पुढे आला आहे. याला कंटाळून या वीरपत्नीने अ‍ॅड. धैर्यशील सुतार यांच्यामार्फत उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावून याचिका दाखल केली.अ‍ॅड. सुतार यांनी युक्तिवादात सांगितले की,‘तुळसाबाई यांचे पती गणपती सूर्यवंशी हे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लष्करात दाखल झाले. त्यानंतर १९४७ मध्ये ते सेवेतून निवृत्त झाले. तद्नंतर गणपती सूर्यवंशी व कुटुंबीय हे कर्नाटक राज्यातील अथणी तालुक्यातील रहिवासी होते. ते तेथेच कायमस्वरूपी स्थायिक झाले. गणपती सूर्यवंशी यांचे १९८५ मध्ये निधन झाले. तद्नंतर १९९० मध्ये श्रीमती तुळसाबाई त्यांच्या मुलासह महाराष्ट्रात शिरोळ गावी राहण्यास आल्या आणि कायमस्वरूपी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी बनल्या. आजअखेर त्या महाराष्ट्रात कायमस्वरूपी रहिवास करून आहेत. (प्रतिनिधी)