शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

जुलैच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश यादी?

By admin | Updated: June 24, 2014 00:56 IST

केंद्रीय प्रवेश समितीतर्फे राबविण्यात येत असलेल्या अकरावीच्या केंद्रीभूत प्रवेशप्रक्रियेअंतर्गत अर्ज दाखल करण्याची मंगळवारी अखेरची तारीख आहे. यंदा दहावीचा निकाल वाढल्यामुळे प्रवेशासाठी

अकरावी प्रवेश : आज अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवसनागपूर : केंद्रीय प्रवेश समितीतर्फे राबविण्यात येत असलेल्या अकरावीच्या केंद्रीभूत प्रवेशप्रक्रियेअंतर्गत अर्ज दाखल करण्याची मंगळवारी अखेरची तारीख आहे. यंदा दहावीचा निकाल वाढल्यामुळे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांसाठी एक-एक गुणदेखील महत्त्वाचा ठरणार आहे. जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात प्रवेशयादी जाहीर करण्यात होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.१७ जूनपासून अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली होती. पहिल्याच दिवसापासून शहरातील निरनिराळ््या महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची गर्दी दिसून आली. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता अर्ज दाखल करण्याची मुदत वाढविण्यात आली. विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर २५ तारखेपासून अर्जांची पडताळणी करण्यात येणार आहे. पडताळणी झाली की लागलीच प्रवेशयादी जाहीर करण्यात येईल. प्रवेशयादी जाहीर करण्याची नेमकी तारीख अद्याप ठरविण्यात आलेली नाही.सोमवारी २,७७९ अर्ज दाखलदरम्यान, अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारीदेखील विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. २,७७९ विद्यार्थ्यांनी सोमवारी अर्ज दाखल केले. यात सर्वाधिक १,४५९ अर्ज हे विज्ञान (इंग्रजी) शाखेसाठी स्वीकृत करण्यात आले. द्विलक्षीचे ८६९ तर वाणिज्य शाखेचे ४०० अर्ज दाखल झाले. अर्जांची आकडेवारी मंगळवारीच स्पष्ट होऊ शकेल.(प्रतिनिधी)अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेला प्रारंभसोमवारपासून राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली. मात्र अपेक्षेच्या अगदी विरुद्ध पहिल्याच दिवशी या प्रवेश प्रक्रियेस म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. पहिल्या दिवशी ४०० च्या जवळपास अर्ज प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शहरातील काही महत्त्वाच्या ‘एआरसी’वर (अप्लिकेशन रिसिप्ट सेंटर) सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती. मात्र इतर ठिकाणी शुकशुकाटच दिसून आला. साधारणत: दोन दिवसात प्रवेश प्रक्रियेला वेग येईल, अशी आशा तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.विद्यार्थ्यांच्या हितालाच प्राधान्यकेंद्रीय प्रवेश समितीतर्फे विद्यार्थ्यांच्या हितालाच सर्वात जास्त प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांना मुदत वाढवून देण्यात आली. शिवाय विद्यार्थ्यांच्या मनातील शंका दूर करण्याचे कामदेखील महाविद्यालयांकडून करण्यात येत आहे. यंदा जास्त संख्येत प्रवेश असतानादेखील आतापर्यंत संपूर्ण प्रवेशप्रक्रिया सुरळीतपणेच पार पडली आहे असे डॉ.पटवे यांनी सांगितले. अर्जांची पडताळणी झाली की लगेच प्रवेशयादी जाहीर करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय प्रवेश समितीचे सचिव व सहायक शिक्षण संचालक डॉ. एस.एन.पटवे यांनी दिली.