शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या दिवशी ६ हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश

By admin | Updated: June 28, 2016 00:51 IST

पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर झाली

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर झाली असली तरी पहिल्या दिवशी केवळ ६ हजार ३९९ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. त्यामुळे सोमवारी अकरावी प्रवेशास थंड प्रतिसाद मिळाला. मात्र, प्रवेश मिळूनही ५० रुपये शुल्क न भरून आपला प्रवेश निश्चित न करणारे विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर जाणार आहेत. त्यामुळे पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना येत्या ३० जूनपर्यंत प्रवेश घ्यावाच लागणार आहे.पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या ७३ हजार ३८५ जागांसाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून आॅनलाइन प्रवेशासाठी ७३ हजार ९६१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. विद्यार्थ्यांची पहिली गुणवत्ता यादी सकाळी १०.३० वाजता जाहीर करण्यात आली. पहिल्या गुणवत्ता यादीतून ५२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी आजपासून संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे अपेक्षित होते. मात्र, केवळ ६ हजार ३३९ विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी प्रवेश घेतला. तब्बल ४६ हजार १९३ विद्यार्थ्यांनी प्रवेशास प्रतिसाद दिला नाही.सर्व विद्यार्थ्यांना केवळ आॅनलाइनच प्रवेश दिले जाणार आहे. मात्र, काही विद्यार्थी आॅफलाइनने प्रवेश घेण्याचा विचार करीत आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशी आॅनलाइन प्रवेशास विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, शहरातील काही नामांकित महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी गर्दी केली होती. फर्ग्युसन महाविद्यालयात विज्ञान, कला, वाणिज्य शाखेच्या प्रवेशासाठी स्वतंत्र वर्गखोल्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे तपासून मगच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता. गरवारे, एस. पी. कॉलेज व मॉडर्न महाविद्यालयातही विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी गर्दी केली होती. काही महाविद्यालयात प्रवेश शुल्क भरण्यासाठी रांगा लागल्या होत्या. (प्रतिनिधी)>आॅनलाईन प्रवेशप्रक्रियागेल्या काही वर्षांपासून अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. यंदा प्रत्येक विद्यार्थ्याला केवळ आॅनलाइन पद्धतीनेच प्रवेश दिला जाणार आहे. शिक्षण विभागाकडून अकरावीचा आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना सुमारे एक महिन्याचा कालावधी दिला होता. तरीही काही विद्यार्थ्यांनी अर्ज भरला नसल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयात सोमवारी तीन सुशिक्षित पालक आले होते. आमच्याकडून मुलाचा आॅनलाइन अर्ज भरायचा राहून गेला. आता आम्हाला प्रवेश कसा मिळेल, याबाबत त्यांनी विचारणा केली. त्यामुळे यंदाही आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेत सहभागी न झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण होणार आहे.