शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

रुपीचा प्रशासकीय कारभार वाढणार !

By admin | Updated: June 10, 2014 00:49 IST

विलिनीकरणाचा नवीन प्रस्ताव नाही : खातेदारांना करावी लागणार प्रतिक्षा

विलिनीकरणाचा नवीन प्रस्ताव नाही : खातेदारांना करावी लागणार प्रतिक्षा पुणे : रुपी बँकेकडे विलिनीकरणासाठी सध्या कोणत्याही सक्षम बँकेचा पर्याय नाही. त्यातच बँकेच्या प्रशासकीय कालावधीची मुदत २२ ऑगस्ट रोजी संपत आहे. रिझर्व्ह बँकेला (आरबीआय) चौथ्यांदा बँकेच्या प्रशासकीय कालावधीची मुदत वाढवावी लागणार असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे खातेदार-ठेवीदारांनी आणखी प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे. आर्थिक अनियमिततेमुळे आरबीआयने २२ फेब्रुवारी २०१३ रोजी रुपी बँकेवर निर्बंध घातले आहेत. तेव्हापासून प्रशासकांची मुदत तीनदा वाढविण्यात आली आहे. बँकेच्या तत्कालिन प्रशासकीय मंडळाने बँकेच्या विलिनीकरणासाठी प्रयत्न सुरु केले होते. सारस्वत बँकेने त्यासाठी उत्सुकता दाखविली होती. त्याप्रमाणे आर्थिक पडताळणी देखील केली होती. मात्र बँकेने सुरुवातीस खातेदारांना त्यांच्या खात्यातील रक्कमेपैकी ६५ टक्के (६५:३५) रक्कम देण्याचा प्रस्ताव दिला होता. उर्वरीत रक्कम थकीत कर्जाची वसुली झाल्यानंतर खातेदारांना देण्यात येणार होती. मात्र खातेदारांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला होता. दरम्यान बँकेचे आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प आहे. कर्मचार्‍यांचे वेतन व प्रशासकीय खर्च मात्र सुरु आहे. त्यामुळे बँकेच्या तोट्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या हा तोटा तब्बल ६१३ कोटींच्या घरात पोहचला आहे. विलिनीकरणाच्या ६५-३५ प्रस्तावाला होत असलेला विरोध व विलिनीकरण लांबल्याने रुपीच्या तोट्यात होत असलेली वाढ यामुळे सारस्वत बँक विलिनीकरणाच्या स्पर्धेतून मागे पडल्याची चर्चा आहे. काही महिन्यांपुर्वी अलाहाबाद बँकेशी विलिनीकरणाची बोलणी सुरु होती. अलहाबाद बँकेने आर्थिक पडताळणी अहवालासाठी त्यांच्या संकेतस्थळावर निविदा देखील प्रसिद्ध केली होती. मात्र त्यांचा आर्थिक पडताळणी अहवाल गुलदस्त्यात आहे. रुपी बँकेच्या प्रशासकांनी काही राष्ट्रीयकृत बँकांशी विलिनीकरणाबाबत बोलणी सुरु केली आहे. एका बलाढ्य बँकेने त्यासाठी उत्सुकता दाखविली आहे. मात्र हा प्रस्ताव अगदी प्राथमिक अवस्थेत आहे. या बँकेने जरी विलिनीकरणाची इच्छा व्यक्त केली तरी आरबीआयची परवानगी, संचालकमंडळ व सभासदांची मंजुरी यासाठी काही महिन्यांचा अवधी लागू शकतो. बँकेच्या प्रशासकीय मंडळाची मुदत २२ ऑगस्टरोजी संपत असल्याने प्रशासकीय कालावधी आणखी वाढण्याची शक्यता आहे.