शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

प्रशासन सज्ज, प्रतीक्षा आयोगाची

By admin | Updated: September 10, 2014 00:46 IST

विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा मंगळवारी होणार, अशी चर्चा असल्याने दिवसभर जिल्हा प्रशासनाचे लक्ष या घोषणेकडे लागले होते. नुसतेच लक्षच नव्हे तर निवडणुकीच्या तयारीचीही लगबग सुरू होती.

दिवसभर दिल्लीकडे लक्ष: तयारीचीही लगबगनागपूर : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा मंगळवारी होणार, अशी चर्चा असल्याने दिवसभर जिल्हा प्रशासनाचे लक्ष या घोषणेकडे लागले होते. नुसतेच लक्षच नव्हे तर निवडणुकीच्या तयारीचीही लगबग सुरू होती. मात्र सांयकाळी ६ वाजेपर्यंत वाट पाहूनही काहीच संदेश प्राप्त न झाल्याने, आता आयोगाच्या पुढील घोषणेकडे निवडणूक यंत्रणेचे लक्ष लागले आहे.गणेश विसर्जनानंतर निवडणुकीची घोषणा केली जाईल व त्यासाठी मंगळवारपासून आचारसंहिता लागू केली जाईल, असा अंदाज राजकीय आणि प्रशासकीय पातळीवरून व्यक्त केला जात होता व त्या अनुषंगाने पावलेही उचलली जात होती. मंगळवारी सकाळपासूनच आयोगाच्या घोषणेकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष लागले होते. आयोगाने घोषणा केली व कार्यक्रम जाहीर केला की, त्यानंतरच्या पुढच्या कार्यवाहीसाठी यंत्रणेला तयार ठेवण्यासाठी दिवसभर प्रशासनाची लगबग सुरू होती. याच अनुषंगाने बुधवारी सकाळी विविध विभागप्रमुखांची बैठकीचे, दुपारच्या सत्रात राजकीय पक्षाच्या स्थानिक प्रतिनिधींच्या बैठकीचे आणि सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या स्थानिक तयारीची माहिती देण्याचेही नियोजन करण्यात आले होते. मात्र निवडणूक आयोगाने मंगळवारी निवडणुकांची घोषणाच न केल्याने, आता आयोगाच्या पुढच्या निर्णयाची वाट पाहणे सुरू आहे.निवडणुकीसाठी प्रशासनाची संपूर्ण तयारी झाली आहे. एकदा घोषणा झाली की, नेहमीप्रमाणे तयारीची गाडी सुसाट वेगाने धावणार आहे. बाराही मतदारसंघांचे सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची यादी तयार आहे. आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे याकरिता प्रत्येक विधानसभेसाठी भरारी पथक, व्हिडिओ शूटिंग करणारे पथक, खर्चाची तपासणी करण्यासाठी लेखा अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. ईव्हीएमची तपासणी आणि प्रतिरूप मतदानाची प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांची मागणी नोंदवण्यात आली आहे. गाड्यांची व्यवस्था, मतदार नोंदणी आणि तत्सम कामाची प्रक्रियाही सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)