शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

‘लोकमत’च्या दणक्याने प्रशासनाला जाग

By admin | Updated: June 22, 2016 00:45 IST

महापालिकेतील नगर विकास आणि बांधकाम विभागाचे कार्यालय रात्री उशिरापर्यंत सुरू असते, याबाबत ‘लोकमत’ने सोमवारी (दि.२०) स्टिंग आॅपरेशन केले होते.

पिंपरी : महापालिकेतील नगर विकास आणि बांधकाम विभागाचे कार्यालय रात्री उशिरापर्यंत सुरू असते, याबाबत ‘लोकमत’ने सोमवारी (दि.२०) स्टिंग आॅपरेशन केले होते. याबाबत सर्वसाधारण सभेत जोरदार चर्चा झाली. यामुळे या दोन्ही विभागांचे कार्यालय मंगळवारी कार्यालयीन वेळेतच बंद करण्यात आले. तसेच संत तुकाराममहाराज यांच्या अभंगाचे दृकश्राव्य करण्यासाठी महापालिकेने ५० लाखांची तरतूद केली होती. याबाबतही ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेऊन महापालिकेला हा ठराव रद्द करावा लागला. नव्याने ठराव करून यासाठी ५ लाखांचीच तरतूद करावी लागली. ‘लोकमत’च्या वृत्ताची महापालिका प्रशासनाला दखल घ्यावी लागली. कार्यालयांना वेळेतच टाळेपिंपरी : महापालिकेतील बांधकाम परवाना विभाग आणि नगररचना विभागात नियमबाह्य कामे कार्यालयीन वेळेनंतर रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याबाबत लोकमतने ‘स्टिंग आॅपरेशन’ केले. यावरून महासभेत वादळी चर्चा झाली. यासह महापौरांनीही कारवाईचे आदेश दिले. लोकमतच्या या दणक्यानंतर आता या दोन्ही विभागांच्या कार्यालयांना सहा वाजताच ‘टाळे’ लागत आहे. बांधकाम परवानगी आणि नगररचना या विभागात जी कामे दिवसा करणे शक्य होत नाहीत, अशा नियमबाह्य कामांना सायंकाळनंतर सुरुवात होते. यावर आधारित ‘फाइल मंजुरीसाठी रात्रीस खेळ चाले’ हे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले. यानंतर महापालिका प्रशासन हडबडले. सोमवारच्या महासभेतही या मुद्द्यावरून वादळी चर्चा झाली. नगरसेवकांनी सभागृहात लोकमतच्या वृत्ताचे वाचन करीत या विभागाच्या कामकाजाची चौकशी मागणी केली. महापौरांनीही या दोन विभागात रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या कामकाजाची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले. मनसेचे टाळ बजावो आंदोलनपिंपरी : तुकोबारायांचे अभंग अर्थासहित दृकश्राव्य करण्यासाठी पाच लाख रुपये दाखवून पन्नास लाख रुपये लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्थायी समितीच्या गैरकारभाराच्या निषेधार्थ मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने टाळ बजावो आंदोलन केले. याबाबत मनसेने आयुक्त दिनेश वाघमारे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, श्री संत तुकाराममहाराज यांचे अभंग दृकश्राव्य पद्धतीने सोशल मीडियावर तसेच डिजिटल मीडियाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली स्थायी समितीने प्रस्तावावर पाच लाख रुपये खर्च दाखवून पन्नास लाखांच्या खर्चास मंजुरी घेतली. ही जनतेच्या पैशांची लूट आहे. अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने विषय मंजूर करू नयेत, अशी मागणी करण्यात आली. यासह स्थायी समितीच्या या गैरकारभाराच्या निषेधार्थ मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी स्थायी समिती सभापतींचे कार्यालय तसेच आयुक्त कार्यालयासमोर टाळ बजाओ आंदोलन केले. या आंदोलनात मनसेचे गटनेते अनंत कोऱ्हाळे, मनविसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, रूपेश पटेकर, अंकुश तापकीर, मयूर चिंचवडे, राजू सावळे, तानाजी चांदणे, ज्योती गोफणे आदींचा समावेश होता. तुकोबारायांचे अभंग दृकश्राव्य करण्यासाठी पाच लाख रुपये दाखवून पन्नास लाख लाटणाऱ्या शब्द क्रिएशन या संस्थेला दिलेले काम रद्द करावे, अशी मागणी धनंजय आल्हाट यांनी आयुक्तांकडे केली आहे. पाच लाखांचे ५० लाख करण्याचा डाव फसलापिंपरी : तुकोबारायांचे अभंग अर्थासहित दृकश्राव्य करण्यासाठी पाच लाख रुपये दाखवून पन्नास लाखांचा विषय स्थायीने मंजूर करवून घेतला आहे. हा गैरकारभार ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर स्थायी समितीने अखेर हा चुकीचा ठराव रद्द करणे भाग पडले. यामुळे पाच लाख खर्चाचा प्रस्ताव दाखवून ५० लाख रुपये लाटण्याचा स्थायी समितीचा डाव फसला. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराजांची अभंगगाथा मोबाइलद्वारे तसेच डिजिटल मीडियाद्वारे ऐकावयास मिळावी, यासाठी अभंगगाथा दृक्श्राव्य करण्यासाठीच्या विषयास १४ जूनच्या स्थायी समितीच्या बैठकीत ऐनवेळच्या विषयाद्वारे मान्यता देण्यात आली होती. यासाठी ४५८६ अभंग निवडले. मात्र, या प्रस्तावाच्या खर्चाचे आकडे अक्षरी व अंकी यात तफावत होती. ही बाब लोकमतने दिलेल्या वृत्ताने सर्वांच्या निदर्शनास आली. या प्रस्तावास कडाडून विरोध झाला. त्यामुळे पन्नास लाखांचा प्रस्ताव पाच लाखांवर आला. अखेर अभंग दृकश्राव्य करण्यासाठी येणाऱ्या पाच लाखांचा नवीन ठराव करून मंजूर करण्यात आला.

अगोदरच्या ठरावात प्रत्येक अभंगाचे ध्वनिमुद्रण, ध्वनिसंपादन, स्टुडिओ रेंटसाठी ४०० रुपये, तसेच प्रत्येक अभंगासाठी कलाकारास मानधन म्हणून तीनशे रुपये, व्हिडीओ संपादनासाठी प्रत्येकी तीनशे रुपये, तसेच प्रूफरिडिंगसाठी प्रतिअभंग ११० रुपये असे एकूण एका अभंगासाठी एक हजार ११० रुपये खर्च येत असून, चार हजार ५८६ अभंगांसाठी ५ लाख ९ हजार ४६० रुपये खर्च दाखविण्यात आला होता. अभंगांची संख्या पाहता ही रक्कम पन्नास लाखांवर जात होती. (प्रतिनिधी)