शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

प्रशासन सुस्त दशरथनगर त्रस्त

By admin | Updated: August 6, 2014 01:16 IST

दशरथनगर वस्तीतील नागरिक दहशतीत रात्र जागत असताना, स्थानिक प्रशासन मात्र कुंभकर्णी झोप काढत आहे. ‘लोकमत’ ने सोमवारी ‘मृत्यूच्या कुशीत दशरथनगर’ या शिर्षकाखाली बातमी

लोकांचा जीव मुठीत : पावसाने वाढविली चिंता नागपूर : दशरथनगर वस्तीतील नागरिक दहशतीत रात्र जागत असताना, स्थानिक प्रशासन मात्र कुंभकर्णी झोप काढत आहे. ‘लोकमत’ ने सोमवारी ‘मृत्यूच्या कुशीत दशरथनगर’ या शिर्षकाखाली बातमी प्रकाशित करून, येथेही पुणे जिल्ह्यातील माळीणसारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते, याकडे स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. मात्र तरीही प्रशासनाला जाग आलेली दिसून येत नाही. मंगळवारी प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली करण्यात आलेल्या नाहीत. शिवाय कोणत्याही अधिकाऱ्यांनी या वस्तीला भेट देऊ न येथील वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला नाही. यावरून स्थानिक प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेविषयी किती दक्ष आहे, याचा परिचय मिळतो. माळीण प्रमाणेच गिट्टीखदान परिसरातील दशरथनगर व कुतुबशहानगर या वस्त्या दहशतीत जगत आहे. गत दोन दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसाने येथील लोकांची पुन्हा चिंता वाढविली आहे. रामदेवबाबा पहाडीच्या अगदी पायथ्याशी या दोन्ही वस्त्या वसलेल्या आहेत. त्यामुळे पावसाच्या पाण्यासह पहाडीवरील मोठमोठे दगड व दरड या वस्त्यांमधील घरांवर कोसळतात. यात आजपर्यंत येथील अनेक घरे जमीनदोस्त झाली आहेत. परंतु सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र येथील प्रत्येक नागरिक हा जीव मुठीत धरून जगत आहे. पुणे जिल्ह्यातील माळीण येथील घटनेत १५० हून अधिक लोकांचे जीव गेले. तेथे दरवर्षी भरपूर पाऊस पडतो. मात्र आजवर कोणतीही दुर्घटना झाली नव्हती. परंतु यंदा अचानक निसर्ग कोपला, दरडी कोसळल्या आणि अख्खे गाव दगडमातीच्या ढिगाऱ्याखाली गेले. त्यात नक्की किती लोक गाडल्या गेले, याचा अजूनपर्यंतही आकडा पुढे येऊ शकलेला नाही. नागपूर शहरातसुद्धा माळीणसारख्याच अनेक वस्त्या पहाडाच्या पायथ्याशी वसलेल्या आहेत. त्यामुळे अशा धोकादायक वस्त्यांचे ‘माळीण’ होऊ नये, यासाठी स्थानिक प्रशासनाने सजग होण्याची गरज आहे. मात्र सुस्त प्रशासन कदाचित मोठ्या दुर्घटनेची प्रतीक्षा करीत असावे, असे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)