शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

प्रशासन सुस्त दशरथनगर त्रस्त

By admin | Updated: August 6, 2014 01:16 IST

दशरथनगर वस्तीतील नागरिक दहशतीत रात्र जागत असताना, स्थानिक प्रशासन मात्र कुंभकर्णी झोप काढत आहे. ‘लोकमत’ ने सोमवारी ‘मृत्यूच्या कुशीत दशरथनगर’ या शिर्षकाखाली बातमी

लोकांचा जीव मुठीत : पावसाने वाढविली चिंता नागपूर : दशरथनगर वस्तीतील नागरिक दहशतीत रात्र जागत असताना, स्थानिक प्रशासन मात्र कुंभकर्णी झोप काढत आहे. ‘लोकमत’ ने सोमवारी ‘मृत्यूच्या कुशीत दशरथनगर’ या शिर्षकाखाली बातमी प्रकाशित करून, येथेही पुणे जिल्ह्यातील माळीणसारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते, याकडे स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. मात्र तरीही प्रशासनाला जाग आलेली दिसून येत नाही. मंगळवारी प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली करण्यात आलेल्या नाहीत. शिवाय कोणत्याही अधिकाऱ्यांनी या वस्तीला भेट देऊ न येथील वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला नाही. यावरून स्थानिक प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेविषयी किती दक्ष आहे, याचा परिचय मिळतो. माळीण प्रमाणेच गिट्टीखदान परिसरातील दशरथनगर व कुतुबशहानगर या वस्त्या दहशतीत जगत आहे. गत दोन दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसाने येथील लोकांची पुन्हा चिंता वाढविली आहे. रामदेवबाबा पहाडीच्या अगदी पायथ्याशी या दोन्ही वस्त्या वसलेल्या आहेत. त्यामुळे पावसाच्या पाण्यासह पहाडीवरील मोठमोठे दगड व दरड या वस्त्यांमधील घरांवर कोसळतात. यात आजपर्यंत येथील अनेक घरे जमीनदोस्त झाली आहेत. परंतु सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र येथील प्रत्येक नागरिक हा जीव मुठीत धरून जगत आहे. पुणे जिल्ह्यातील माळीण येथील घटनेत १५० हून अधिक लोकांचे जीव गेले. तेथे दरवर्षी भरपूर पाऊस पडतो. मात्र आजवर कोणतीही दुर्घटना झाली नव्हती. परंतु यंदा अचानक निसर्ग कोपला, दरडी कोसळल्या आणि अख्खे गाव दगडमातीच्या ढिगाऱ्याखाली गेले. त्यात नक्की किती लोक गाडल्या गेले, याचा अजूनपर्यंतही आकडा पुढे येऊ शकलेला नाही. नागपूर शहरातसुद्धा माळीणसारख्याच अनेक वस्त्या पहाडाच्या पायथ्याशी वसलेल्या आहेत. त्यामुळे अशा धोकादायक वस्त्यांचे ‘माळीण’ होऊ नये, यासाठी स्थानिक प्रशासनाने सजग होण्याची गरज आहे. मात्र सुस्त प्रशासन कदाचित मोठ्या दुर्घटनेची प्रतीक्षा करीत असावे, असे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)