शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

आदिवासींना मिळतो गवतविक्रीतून रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2016 03:04 IST

तालुक्यातील ग्रामीण भागात आदिवासींना सध्या गवतविक्रीच्या रूपाने रोजगार लाभला आहे.

विक्रमगड : तालुक्यातील ग्रामीण भागात आदिवासींना सध्या गवतविक्रीच्या रूपाने रोजगार लाभला आहे. त्यामुळे बुडत्याला गवताच्या काडीचा आधार, ही म्हण त्यांच्या बाबतीत खरी ठरत आहे. तालुक्यातील खेडोपाडी दिवाळी सणाआधी गवत खरेदीविक्रीचा व्यवसाय तेजीत आहे. वर्षभर रोजगारासाठी स्थलातंरित होणाऱ्या या शेतकऱ्यांना रोजगार मिळत असला तरी व्यापारी त्यांची मोठी लूट करीत असल्याचे वास्तव खरेदीविक्रीच्या व्यवहारावरून दिसून येत आहे.पावसाळ्यात माळरानावर, जंगलात नैसर्गिकरीत्या उगवणारे गवत विकून काही अंशी आदिवासी पाड्यात रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे. भाद्रपद महिना म्हणजे ग्रामीण भागात हलाखीचा असल्याने व या महिन्यात गौरी-गणपती व नंतर पुढे दसरा-दिवाळी हे सण येत असल्याने सर्वांनाच पैशांची चणचण भासत असते. मात्र, या दिवसांत सर्व संकटांवर मात करून सोन्याचे दिवस दाखवणारा गवताचा व्यवसाय तंगीत सापडलेल्या आदिवासीबांधवांना मोठा आधार ठरतो. माळरानातील गवताचे भारे बांधून विकण्याचा व्यवसाय तालुक्यातील दादडे, केव, महासरोली, साखरा, उपराले, आलोन्डा, या परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. (वार्ताहर)>अशी होते फसवणूकया व्यवसायात गवताच्या लहान ४ जुड्यांची १ धडी व प्रत्येक धडीला ४ ते ५ रुपये गवत कापणाऱ्यास तर जागामालकास ५ रुपये मिळतात. मजुरांना या गवतकापणीचे दिवसभरातून केवळ १०० ते १२० रुपये मिळतात. तर जागा असलेल्या मालकाला क्विंटलमागे केवळ ७० ते ८० पर्यंत मिळतात. मात्र, व्यापारी क्विंटलमागे अंदाजे ५०० ते ७०० रुपये मिळवतो. त्यामुळे या व्यवसायात व्यापाऱ्याचाच फायदा जास्त आसल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जाते. सध्याचा काळात गवताने भरलेले ट्रकचा ट्रक मुंबईच्या दिशेने जाताना पाहावयास मिळत आहेत. खरेदी केलेल्या गवताला मुंबई, वसई, विरार, नालसोपारा, बोरिवली, भिवंडी, येथील गायीम्हशींच्या गोठ्यांमध्ये मोठी मागणी असल्याने हा व्यवसाय दिवसेंदिवस तेजीत आहे.