शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

आदिवासी योजनेतील भ्रष्टाचार नष्ट करणार

By admin | Updated: November 16, 2014 00:48 IST

शासनातर्फे आदिवासींच्या योजनेवर कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. परंतु हा पैसा कुठे जातो हा गंभीर प्रश्न आहे. यापुढे असे चालणार नाही. आदिवासी योजनांमधील भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यात येईल.

मुख्यमंत्र्यांची घोषणा : ‘मॉनिटरी सिस्टीम’ लागू करणार नागपूर : शासनातर्फे आदिवासींच्या योजनेवर कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. परंतु हा पैसा कुठे जातो हा गंभीर प्रश्न आहे. यापुढे असे चालणार नाही. आदिवासी योजनांमधील भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यात येईल. योजनेत पारदर्शकता आणली जाईल. त्यासाठी योजना राबविताना ‘मॉनिटरी सिस्टीम’ लागू केली जाईल. इतकेच नव्हे तर आदिवासींचा पैसा हा आदिवासींपर्यंतच पोहोचविला जाईल. जो अधिकारी कर्मचारी आदिवासींचा पैसा त्यांच्यापर्यंत पोहचू देणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, त्यासाठी कठोर कायदे केले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. क्रांतिसूर्य भगवान वीर बिरसा मुंडा जयंतीनिमित्त मुल निवासी सुधार महासंघद्वारा फुटाळा चौक येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांना बिरसा मुंडा यांचे प्रतीक म्हणून तीर कमान असलेले स्मृतिचिन्ह भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. माजी महापौर व भाजपा आदिवासी आघाडीच्या राष्ट्रीय सचिव माया इवनाते या अध्यक्षस्थानी होत्या. महापौर प्रवीण दटके, आ. सुधाकर देशमुख, आ. डॉ. मिलिंद माने, आ. अनिल सोले, आ. सुधाकर कोहळे, कृष्णराव चव्हाण, नवनितसिंग तुली, मनपा आयुक्त श्याम वर्धने, चिंतामण इवनाते आदी व्यासपीठावर होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बिरसा मुंडा यांनी अतिशय अल्पकाळात आदिवासींसाठी मोठे काम केले. ज्या काळात जमिनदार आणि इंग्रज अशा दोन्ही बाजूंनी आदिवासींची पिळवणूक सुरु होती, त्या काळात बिरसा मुंडा यांनी लढा उभारला. तो लढा खऱ्या अर्थाने आदिवासींचा मुक्तीचा लढा होता. बिरसा मुंडा यांनी दिलेला लढा आणि संघर्षातून आदिवासींना त्यांचे हक्क मिळाले. वनजमिनीवर आदिवासींचा कायद्याने हक्क आहे. परंतु हा हक्क केवळ कागदावरच शिल्लक होता. परंतु आपण त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. आदिवासी योजना आदिवासींपर्यंत प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच बिरसा मुंडा यांनी सुरू केलेला मुक्तीचा लढा आदिवासींनी पुन्हा सुरू करावा, असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी आ. सुधाकर देशमुख यांनी आदिवासींसाठी बिरसा मुंडा यांच्या नावाने नागपुरात समाजभवनासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. माया इवनाते यांनीसुद्धा जागेची मागणी करीत बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनी सार्वजनिक सुटी जाहीर करण्याची विनंती केली. अमित कोवे यांनी प्रास्ताविक केले. संचालन संजय बंगाले यांनी केले. नगरसेवक परिणय फुके, श्रीकांत देशपांडे, सुरेंद्र सावरकर, अ‍ॅड. मनिराम मडावी, पंकज आत्राम, कृष्णराव परतेकी, राजमाता राजेश्वरी देवी आदी व्यासपीठावर होते. (प्रतिनिधी)बिरसा मुंडा यांच्या नावावर नागपुरात समाजभवन आदिवासी समाजासाठी नागपुरात बिरसा मुंडा यांच्या नावावर समाजभवन उभारण्यात येईल. त्यासाठी मनपाने जागेचा शोध घ्यावा. त्यासंबधीचा प्रस्ताव मनपाने शासनाला पाठवावा शासन लगेच मंजुरी प्रदान करेल. तसेच बिरसा मुंडा यांचे चरित्र हे अतिशय प्रेरणादायी आहे, त्यामुळे ते शालेय स्तरावर उपलब्ध करण्यात येईल. यासाठी आपण स्वत: शिक्षणमंत्र्यांना सांगू, असे आश्वासनसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.