शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

टोलचा ‘बाय बॅक’मध्ये समावेश करा

By admin | Updated: August 14, 2015 00:02 IST

अधीक्षक अभियंत्यांचे पत्र : जनतेच्या तीव्र भावनांचा विचार करण्याची मागणी

सांगली : टोल वसुलीविषयी सांगलीकरांच्या भावना तीव्र असून, हा विषय संवेदनशील बनला आहे. त्यामुळे राज्य शासनाने सांगलीच्या टोलचा समावेश ‘बाय बॅक’ योजनेत करून कायमस्वरुपी टोल बंदचा निर्णय घ्यावा, अशी मागणी कोल्हापूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता ए. एस. उपळे यांनी राज्य शासनाकडे एका पत्राद्वारे केली आहे. पत्रात म्हटले आहे की, जिल्हा न्यायालयाने ४ आॅगस्ट २0१५ रोजी शासनास टोल वसुलीची अधिसूचना काढण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या प्रकल्पाची पथकर वसुली बंद करण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी व विविध संघटनांनी जानेवारी २0१४ मध्ये केलेल्या आंदोलनानंतर २0 जानेवारी २0१४ पासून ही टोल वसुली बंद आहे. हा विषय संवेदनशील बनला असून याबाबत स्थानिक जनतेमध्ये भावना तीव्र आहेत. ६ आॅगस्ट रोजी स्थानिक सर्वपक्षीय शिष्टमंडळ व विविध संघटनांनी प्रकल्पाची पथकर वसुली उद्योजकांकडून सुरू करू नये, अशी मागणी बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.मध्यंतरीच्या काळात शासनाने बाय बॅक करावयाच्या प्रकल्पांमध्ये सांगलीच्या टोलचा समावेश केला होता. मात्र न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळे पुन्हा त्याबाबतची कार्यवाही करण्यात आली नाही. आता वरील सर्व गोष्टींचा विचार करून राज्य शासनाने सांगलीच्या टोलचा बाय बॅक प्रकल्पांच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. उच्च न्यायालयात आव्हान देण्याविषयीसुद्धा या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार आता सांगलीच्या टोल वसुलीला १६ वर्षे ९ महिन्यांची मुदत असून २२ मार्च २0३२ पर्यंत टोल वसुलीसाठी राज्य शासनाने अधिसूचना प्रसिद्ध करावी, असे आदेशही झालेले आहेत. या आदेशाच्या अंमलबजावणीस स्थगिती मिळण्यासाठी जिल्हा न्यायालयात केलेला अर्जही फेटाळण्यात आला आहे. सरकारी वकिलांशी चर्चा करून उच्च न्यायालयात निर्णयाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला. याबाबतची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. (प्रतिनिधी)सर्वोच्च न्यायालयात याचिकाअधीक्षक अभियंत्यांनी या पत्रात सर्वोच्च न्यायालयातील याचिकेचा उल्लेख केला आहे. याचिकेचा डायरी क्रमांक १३५६६/२0१५ असल्याचा उल्लेख यात करण्यात आला आहे. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांमार्फत पाठपुरावा सुरू असल्याचे म्हटले आहे. शिष्टमंडळाकडून मुख्यमंत्र्यांची भेटआमदार सुधीर गाडगीळ, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, सरकारी वकील सी. डी. माने, नगरसेविका स्वरदा केळकर यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांना टोलबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. कंपनीस नुकसानभरपाई देऊन हा विषय मिटविण्याबाबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घेण्याचे मान्य केल्याचे केळकर यांनी सांगितले.