शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

टोलचा ‘बाय बॅक’मध्ये समावेश करा

By admin | Updated: August 14, 2015 00:02 IST

अधीक्षक अभियंत्यांचे पत्र : जनतेच्या तीव्र भावनांचा विचार करण्याची मागणी

सांगली : टोल वसुलीविषयी सांगलीकरांच्या भावना तीव्र असून, हा विषय संवेदनशील बनला आहे. त्यामुळे राज्य शासनाने सांगलीच्या टोलचा समावेश ‘बाय बॅक’ योजनेत करून कायमस्वरुपी टोल बंदचा निर्णय घ्यावा, अशी मागणी कोल्हापूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता ए. एस. उपळे यांनी राज्य शासनाकडे एका पत्राद्वारे केली आहे. पत्रात म्हटले आहे की, जिल्हा न्यायालयाने ४ आॅगस्ट २0१५ रोजी शासनास टोल वसुलीची अधिसूचना काढण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या प्रकल्पाची पथकर वसुली बंद करण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी व विविध संघटनांनी जानेवारी २0१४ मध्ये केलेल्या आंदोलनानंतर २0 जानेवारी २0१४ पासून ही टोल वसुली बंद आहे. हा विषय संवेदनशील बनला असून याबाबत स्थानिक जनतेमध्ये भावना तीव्र आहेत. ६ आॅगस्ट रोजी स्थानिक सर्वपक्षीय शिष्टमंडळ व विविध संघटनांनी प्रकल्पाची पथकर वसुली उद्योजकांकडून सुरू करू नये, अशी मागणी बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.मध्यंतरीच्या काळात शासनाने बाय बॅक करावयाच्या प्रकल्पांमध्ये सांगलीच्या टोलचा समावेश केला होता. मात्र न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळे पुन्हा त्याबाबतची कार्यवाही करण्यात आली नाही. आता वरील सर्व गोष्टींचा विचार करून राज्य शासनाने सांगलीच्या टोलचा बाय बॅक प्रकल्पांच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. उच्च न्यायालयात आव्हान देण्याविषयीसुद्धा या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार आता सांगलीच्या टोल वसुलीला १६ वर्षे ९ महिन्यांची मुदत असून २२ मार्च २0३२ पर्यंत टोल वसुलीसाठी राज्य शासनाने अधिसूचना प्रसिद्ध करावी, असे आदेशही झालेले आहेत. या आदेशाच्या अंमलबजावणीस स्थगिती मिळण्यासाठी जिल्हा न्यायालयात केलेला अर्जही फेटाळण्यात आला आहे. सरकारी वकिलांशी चर्चा करून उच्च न्यायालयात निर्णयाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला. याबाबतची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. (प्रतिनिधी)सर्वोच्च न्यायालयात याचिकाअधीक्षक अभियंत्यांनी या पत्रात सर्वोच्च न्यायालयातील याचिकेचा उल्लेख केला आहे. याचिकेचा डायरी क्रमांक १३५६६/२0१५ असल्याचा उल्लेख यात करण्यात आला आहे. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांमार्फत पाठपुरावा सुरू असल्याचे म्हटले आहे. शिष्टमंडळाकडून मुख्यमंत्र्यांची भेटआमदार सुधीर गाडगीळ, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, सरकारी वकील सी. डी. माने, नगरसेविका स्वरदा केळकर यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांना टोलबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. कंपनीस नुकसानभरपाई देऊन हा विषय मिटविण्याबाबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घेण्याचे मान्य केल्याचे केळकर यांनी सांगितले.