शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

माणूस जोडोे

By admin | Updated: September 13, 2015 06:18 IST

पावसाने कितीही ओढ दिली तरी श्रावण तो श्रावणच! रखरखीतपणात एखादी सरही पान, फुल उजळून टाकते. सृष्टी स्वच्छ ताजीतवानी करतो श्रावण, भाद्रपदातल्या गणपतीच्या आगमनासाठी.

- किशोर पाठकपावसाने कितीही ओढ दिली तरी श्रावण तो श्रावणच! रखरखीतपणात एखादी सरही पान, फुल उजळून टाकते. सृष्टी स्वच्छ ताजीतवानी करतो श्रावण, भाद्रपदातल्या गणपतीच्या आगमनासाठी. किती गंमत आहे पाहा! देव सगळेच आपापल्या पद्धतीने येतात. शंकर येतो सोमवारी बेलाची पानं पदरात टाकून जातो. खंडोबा येतो, देवी येते. नवरात्र उजळून टाकते. पण गणपतीचा तोरा काही वेगळाच. तो येतो नाद-निनादात. घरादाराला तर तो त्याच्या आगमनाची चाहूल देतोच, पण संपूर्ण गावाला तो आपलंसं करतो. माणसांमध्ये नवा संचार होतो. त्याचं हे वाजतगाजत येणंच महत्त्वाचं असतं. गणपती येतो तो हजारोंना रोजगार देऊन. हंड्या-झुंबरं, कलाबतू, आरास, दिवे, फुलं, नक्षी रिद्धी-सिद्धी, गौरी, रंगरंगोटी, रोषणाई, झगमगाट, जल्लोष गणपतीच्या नावाचा तऱ्हेतऱ्हेचा गजर हे सारं गणपती आणतो आणि वातावरण भारून टाकतो. बघा ना गणपती गावांना वैशिष्ट्य देतो. लालबागचा गणपती, दगडू हलवाई, मंडईचा गणपती, कसबा गणपती, नवश्या गणपती, चांदीचा गणपती, विविध महालांमध्ये विराजमान झालेला गणपती, कितीतरी प्रकार. म्हणजे गणपती देव एकच, पण तो सगळ्या गावांना, शहरांना बांधून ठेवतो. पुण्याचा गणपती पाहिला का, हा हमखास प्रश्न याच दिवसांत विचाराला जातो. सिद्धिविनायक पावला का, हाही असाच प्रश्न.लोकमान्यांनी गणपती उत्सवास सार्वजनिक रूप दिलं, ते त्या काळी वेगळ्या हेतूने. तेव्हा राजकीय उत्थान, अभिसरण महत्त्वाचं होतं. आज ते जास्तीत जास्त सामाजिक होतंय. एक चैतन्य, वातावरण आनंदित करणारा गोंगाट हे तो देतो. काळाने बदल होत गेले. झगमगाट वाढला. लाइटच्या लाखो माळा झाल्या. त्यात डीजेच्या आवाजाने गणपतीचे लंबकर्णही बधिर झाले. माणसाचा उत्साह अपार. त्याला आपल्यापुरती आरती करायची नाही. त्याला आनंद वाटून वाढवायचा आहे. म्हणून शहरातही लांबवर असलेल्या औद्योगिक कंपन्या आपला गणपती गावात, चौकात बसवतात. यात समतेचा गजर नकळत होतो. कंपनीतला नोकरचाकर, चौकीदारही पूजेला बसतो. सर्व जाती-धर्मांचे लोक यासाठी एकत्र येतात. तंटे, रुसवे-फुगवे वाढतात, तसे कमीही होतात. एक सांस्कृतिक वातावरण तयार होते. या निमित्ताने शाळा आणि विविध संस्था मिरवणुकीत मैदानी खेळ लेजीम पथक, बॅँडपथक, ढोलपथक तयार करून तरुणाईला आवाहन करतात. हे सगळे गणपतीच देतो. अलीकडे आरास आणि देखणी उशिरापर्यंत चालणारी मिरवणूक हे वैशिष्ट्य होऊ पाहातेय. पण ते पाहाण्यासाठी लाखोंच्या संख्येने माणसं घराबाहेर पडताहेत. एकत्र येताहेत हे महत्त्वाचं. यानिमित्ताने विविध स्पर्धा, संमेलनं भरवली जातात. आपण या उत्सवाचं होकारार्थी रूप पाहू या. आपली परंपरा, संस्कृती याचा यथार्थ गौरव होतोय ना, हे महत्त्वाचं. शहरात यानिमित्ताने धार्मिक वातावरण होऊ पाहातं. त्यापेक्षाही सार्वत्रिक सौहार्द आणि सहिष्णुता दिसते, किंबहुना हाच प्रयत्न प्रत्येक सुजाण नागरिकाचा असतो आणि असावा. गणेशोत्सव जास्त हायटेक होतोय हे नक्की, पण तंत्र बदलते तसे त्याचे उपयोगही वाढताहेत. आजच्या काळात गणपतीलाही सेल्फी काढावीशी वाटली तरी ते कालसंगतच म्हणायला हवे. बदललेल्या गणेशोत्सवात माणूस उत्सवाशी, त्यातील सहआनंदाशी स्वत:ला जोडून घेतोय हेच महत्त्वाचे आणि हेच उत्सवाचे सामाजिक फलित आहे. यावर्षी मात्र बाप्पाला सांगायचं, बाप्पा, सोंडेत अडकला तरी चालेल पण जोरदार पाऊस येऊ दे!