शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

माणूस जोडोे

By admin | Updated: September 13, 2015 06:18 IST

पावसाने कितीही ओढ दिली तरी श्रावण तो श्रावणच! रखरखीतपणात एखादी सरही पान, फुल उजळून टाकते. सृष्टी स्वच्छ ताजीतवानी करतो श्रावण, भाद्रपदातल्या गणपतीच्या आगमनासाठी.

- किशोर पाठकपावसाने कितीही ओढ दिली तरी श्रावण तो श्रावणच! रखरखीतपणात एखादी सरही पान, फुल उजळून टाकते. सृष्टी स्वच्छ ताजीतवानी करतो श्रावण, भाद्रपदातल्या गणपतीच्या आगमनासाठी. किती गंमत आहे पाहा! देव सगळेच आपापल्या पद्धतीने येतात. शंकर येतो सोमवारी बेलाची पानं पदरात टाकून जातो. खंडोबा येतो, देवी येते. नवरात्र उजळून टाकते. पण गणपतीचा तोरा काही वेगळाच. तो येतो नाद-निनादात. घरादाराला तर तो त्याच्या आगमनाची चाहूल देतोच, पण संपूर्ण गावाला तो आपलंसं करतो. माणसांमध्ये नवा संचार होतो. त्याचं हे वाजतगाजत येणंच महत्त्वाचं असतं. गणपती येतो तो हजारोंना रोजगार देऊन. हंड्या-झुंबरं, कलाबतू, आरास, दिवे, फुलं, नक्षी रिद्धी-सिद्धी, गौरी, रंगरंगोटी, रोषणाई, झगमगाट, जल्लोष गणपतीच्या नावाचा तऱ्हेतऱ्हेचा गजर हे सारं गणपती आणतो आणि वातावरण भारून टाकतो. बघा ना गणपती गावांना वैशिष्ट्य देतो. लालबागचा गणपती, दगडू हलवाई, मंडईचा गणपती, कसबा गणपती, नवश्या गणपती, चांदीचा गणपती, विविध महालांमध्ये विराजमान झालेला गणपती, कितीतरी प्रकार. म्हणजे गणपती देव एकच, पण तो सगळ्या गावांना, शहरांना बांधून ठेवतो. पुण्याचा गणपती पाहिला का, हा हमखास प्रश्न याच दिवसांत विचाराला जातो. सिद्धिविनायक पावला का, हाही असाच प्रश्न.लोकमान्यांनी गणपती उत्सवास सार्वजनिक रूप दिलं, ते त्या काळी वेगळ्या हेतूने. तेव्हा राजकीय उत्थान, अभिसरण महत्त्वाचं होतं. आज ते जास्तीत जास्त सामाजिक होतंय. एक चैतन्य, वातावरण आनंदित करणारा गोंगाट हे तो देतो. काळाने बदल होत गेले. झगमगाट वाढला. लाइटच्या लाखो माळा झाल्या. त्यात डीजेच्या आवाजाने गणपतीचे लंबकर्णही बधिर झाले. माणसाचा उत्साह अपार. त्याला आपल्यापुरती आरती करायची नाही. त्याला आनंद वाटून वाढवायचा आहे. म्हणून शहरातही लांबवर असलेल्या औद्योगिक कंपन्या आपला गणपती गावात, चौकात बसवतात. यात समतेचा गजर नकळत होतो. कंपनीतला नोकरचाकर, चौकीदारही पूजेला बसतो. सर्व जाती-धर्मांचे लोक यासाठी एकत्र येतात. तंटे, रुसवे-फुगवे वाढतात, तसे कमीही होतात. एक सांस्कृतिक वातावरण तयार होते. या निमित्ताने शाळा आणि विविध संस्था मिरवणुकीत मैदानी खेळ लेजीम पथक, बॅँडपथक, ढोलपथक तयार करून तरुणाईला आवाहन करतात. हे सगळे गणपतीच देतो. अलीकडे आरास आणि देखणी उशिरापर्यंत चालणारी मिरवणूक हे वैशिष्ट्य होऊ पाहातेय. पण ते पाहाण्यासाठी लाखोंच्या संख्येने माणसं घराबाहेर पडताहेत. एकत्र येताहेत हे महत्त्वाचं. यानिमित्ताने विविध स्पर्धा, संमेलनं भरवली जातात. आपण या उत्सवाचं होकारार्थी रूप पाहू या. आपली परंपरा, संस्कृती याचा यथार्थ गौरव होतोय ना, हे महत्त्वाचं. शहरात यानिमित्ताने धार्मिक वातावरण होऊ पाहातं. त्यापेक्षाही सार्वत्रिक सौहार्द आणि सहिष्णुता दिसते, किंबहुना हाच प्रयत्न प्रत्येक सुजाण नागरिकाचा असतो आणि असावा. गणेशोत्सव जास्त हायटेक होतोय हे नक्की, पण तंत्र बदलते तसे त्याचे उपयोगही वाढताहेत. आजच्या काळात गणपतीलाही सेल्फी काढावीशी वाटली तरी ते कालसंगतच म्हणायला हवे. बदललेल्या गणेशोत्सवात माणूस उत्सवाशी, त्यातील सहआनंदाशी स्वत:ला जोडून घेतोय हेच महत्त्वाचे आणि हेच उत्सवाचे सामाजिक फलित आहे. यावर्षी मात्र बाप्पाला सांगायचं, बाप्पा, सोंडेत अडकला तरी चालेल पण जोरदार पाऊस येऊ दे!