शहरं
Join us  
Trending Stories
1
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
3
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
4
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
5
एकीकडे 'घरवाली' दुसरीकडे 'बाहेरवाली'; दोघींसोबत आनंदाने जगत होता तरुण अन् एक दिवस असं काही झालं... 
6
पितृपक्ष इंदिरा एकादशी २०२५: १० राशींवर श्रीहरी प्रसन्न, शिव-गौरी-लक्ष्मी कृपा; शुभ-लाभ-पैसा!
7
बीचवर फिरायला गेलेल्या तरुणीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार; पोलिसांनी आरोपी कसे शोधले?
8
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
9
आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली...
10
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
11
'ओझेम्पिक टीथ' म्हणजे काय? वजन कमी करण्याच्या औषधाचा होतोय 'असा' दुष्परिणाम
12
Nupur Bora: नुपूर बोरा आहे तरी कोण? सहा वर्षात अनेक गैरव्यवहार, घरातही सापडलं मोठं घबाड!
13
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
14
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
15
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
16
बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला
17
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
18
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
19
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
20
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप

थापाड्या मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लगावा

By admin | Updated: May 10, 2017 00:14 IST

केडीएमसी हद्दीत समाविष्ट केलेल्या २७ गावांच्या विकासाच्या बाता मारणाऱ्या थापाड्या मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लगवा

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : केडीएमसी हद्दीत समाविष्ट केलेल्या २७ गावांच्या विकासाच्या बाता मारणाऱ्या थापाड्या मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लगवा, असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे माजी आमदार मधू चव्हाण यांनी मंगळवारी डोंबिवलीतील काँग्रेस सदस्य नोंदणी मेळाव्यात केले. देशभर काँग्रेसचे सदस्य नोंदणी अभियान सुरू असून कल्याण जिल्हा काँग्रेसच्यावतीने डोंबिवली पूर्वेकडील कुडाळदेशकर सभागृहात सदस्य नोंदणी संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित मेळाव्यात चव्हाण बोलत होते.चव्हाण म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणूक प्रचाराच्या काळात २७ गावांच्या विकासासाठी साडेसहा हजार कोटी रूपये निधी देण्याची घोषणा केली होती. परंतु यातील एक पैसाही आजवर मिळालेला नाही. खुर्चीवर बसून केवळ विकासाच्या बाता मारल्या अशा थापाड्या मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लगवा. ज्यांनी काँग्रेस पक्ष बुडवण्याचा विडा उचलला आहे तेच बुडणार असून आतापर्यंतचा इतिहास याला साक्षी आहे. काँग्रेस पक्षाला चांगली परंपरा असून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेले बलिदान व्यर्थ जाणार नाही, असेही चव्हाण म्हणाले. आजच्या घडीला ज्या योजना सरकारकडून राबवल्या जात आहेत त्या काँग्रेसच्या सत्ता काळातील आहेत, असे नमूद करुन चव्हाण म्हणाले की, सध्याच्या भाजपा सरकारने त्यांची फक्त नावे बदलली आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सत्ताधारी युतीने शहराची वाताहत केली असून स्मार्ट सिटी होणार म्हणून घोषणा केलेले हे शहर स्वच्छतेच्या बाबतीत खाली घसरण्यास महापालिकेतील राज्यकर्त्यांचा भोंगळ कारभार कारणीभूत असल्याची टीका त्यांनी केली. यावेळी संतोष केणे, गंगाराम शेलार, नंदू म्हात्रे, सदाशिव शेलार, शारदा पाटील, अमित म्हात्रे, दर्शना शेलार हे पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेस रस्त्यावर उतरणार-महापालिकेत समाविष्ट केलेल्या २७ गावांक डे झालेले दुर्लक्ष, शिवसेना भाजपा या राज्यकर्त्यांकडून नागरिकांची झालेली फसवणूक आदी मुद्दे घेऊन काँग्रेस रस्त्यावर उतरेल, अशी माहिती चव्हाण यांनी दिली. आपण ज्यांना निवडून दिले त्यांनी महापालिका कुठे नेऊन ठेवली याची प्रचिती स्वच्छतेत घसरलेल्या मानांकनावरून नागरिकांना आली असेल.कल्याण- डोंबिवलीचे नागरीक सुजाण असल्याने आगामी निवडणुकीत ते युतीला धडा शिकवतील, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. भिवंडी महापालिकेत काँग्रेस पक्ष नेहमीच मोठा राहिला असून यंदाच्या निवडणुकीतही तो तसाच राहिल, असा दावा त्यांनी केला.