शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
3
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
4
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
5
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
6
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
7
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
8
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
9
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
10
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
11
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
12
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
13
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
14
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
15
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
16
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
17
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
18
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
19
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
20
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

उल्हासनगर महापालिकेचा उपक्रम; उल्हास नदीतील जलपर्णी काढण्यासाठी विशेष मोहीम, नदी होतेय स्वच्छ

By सदानंद नाईक | Updated: March 3, 2023 16:52 IST

उल्हास नदीतील पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेने पाणी उपसा केंद्रा जवळ विशेष मोहिमे अंतर्गत नदी पात्रातील जलपर्णी काढण्याचे काम

उल्हासनगर :

उल्हास नदीतील पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेने पाणी उपसा केंद्रा जवळ विशेष मोहिमे अंतर्गत नदी पात्रातील जलपर्णी काढण्याचे काम सुरू केले. जलपर्णी काढल्याने नदी पात्रातील उपसा केंद्र जलपर्णी मुक्त झाले असून नदीची स्वच्छ झाली आहे.

 उल्हासनगर महापालिका पश्चिम व पूर्वेतील काही भागाला संच्युरी रेयॉन कंपनी जवळील उल्हास नदी पात्रातून उपसा केंद्राद्वारे एमआयडीसी पाणी उचलून पाणी पुरवठा करते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून नदी पात्रात जलपर्णी पसरली असून नदीतील पाणी प्रदूषित झाल्याचे बोलले जाते. याच ठिकाणी शहरातील सांडपाणीचा खेमानी नाला नदीला मिळत असल्याने, नदीचे पाणी अधिकच प्रदूषित होत असल्याचा आरोप होत आहे. नदीतील पाणी स्वच्छ होण्यासाठी व शहरवासीयांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळण्यासाठी महापालिकेने नदी पात्रातील जलपर्णी काढण्यासाठी विशेष मोहीम सुरू केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. आयुक्त अजीज शेख यांची यामागे संकल्पना असल्याचेही लेंगरेकर म्हणाले. 

महापालिकेने नदी पात्रातील ७० टक्के जलपर्णी काढून टाकली असून यापुढे विशेष मोहीम सुरूच राहण्याचे संकेत अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर यांनीं दिले. या मोहिमेमुळे महापालिका हद्दीतील उल्हास नदी पात्र स्वच्छ झाले. मात्र शेजारील वरप, कांबा व म्हारळ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नदी पात्रातील जलपर्णी काढली जात असून ती पाण्याच्या प्रवाहात महापालिका हद्दीतील नदी पात्रात येत असल्याने, जलपर्णी काढण्याचे काम महापालिकेला करावे लागत आहे. महापालिका आयुक्त अजित शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हास नदी पात्रातील जलपर्णी काढण्याचे काम पावसाळा पर्यंत सुरू ठेवण्याचा मानस असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. महापालिका उपअभियंता दिपक ढोले, परमेश्वर बुडगे हे जलपर्णी काढण्याच्या मोहीमेचे नेतृत्व करीत आहेत. नदी पात्रात नागरिक केरकचरा, जुने टाकावू साहित्य, प्लास्टिक पिशव्या व निर्माल्य टाकत असल्याने नदीच्या प्रदूषणात वाढ होत आहे. शहरवासीयांना स्वच्छ पाणी मिळण्यासाठी व नदीचे पावित्र्य जपण्यासाठी नदी पात्रात कोणताही टाकाऊ वस्तू टाकू नका. असे आवाहन महापालिकेने नागरिकांना केले आहे.