शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

उल्हासनगर महापालिकेचा उपक्रम; उल्हास नदीतील जलपर्णी काढण्यासाठी विशेष मोहीम, नदी होतेय स्वच्छ

By सदानंद नाईक | Updated: March 3, 2023 16:52 IST

उल्हास नदीतील पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेने पाणी उपसा केंद्रा जवळ विशेष मोहिमे अंतर्गत नदी पात्रातील जलपर्णी काढण्याचे काम

उल्हासनगर :

उल्हास नदीतील पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेने पाणी उपसा केंद्रा जवळ विशेष मोहिमे अंतर्गत नदी पात्रातील जलपर्णी काढण्याचे काम सुरू केले. जलपर्णी काढल्याने नदी पात्रातील उपसा केंद्र जलपर्णी मुक्त झाले असून नदीची स्वच्छ झाली आहे.

 उल्हासनगर महापालिका पश्चिम व पूर्वेतील काही भागाला संच्युरी रेयॉन कंपनी जवळील उल्हास नदी पात्रातून उपसा केंद्राद्वारे एमआयडीसी पाणी उचलून पाणी पुरवठा करते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून नदी पात्रात जलपर्णी पसरली असून नदीतील पाणी प्रदूषित झाल्याचे बोलले जाते. याच ठिकाणी शहरातील सांडपाणीचा खेमानी नाला नदीला मिळत असल्याने, नदीचे पाणी अधिकच प्रदूषित होत असल्याचा आरोप होत आहे. नदीतील पाणी स्वच्छ होण्यासाठी व शहरवासीयांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळण्यासाठी महापालिकेने नदी पात्रातील जलपर्णी काढण्यासाठी विशेष मोहीम सुरू केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. आयुक्त अजीज शेख यांची यामागे संकल्पना असल्याचेही लेंगरेकर म्हणाले. 

महापालिकेने नदी पात्रातील ७० टक्के जलपर्णी काढून टाकली असून यापुढे विशेष मोहीम सुरूच राहण्याचे संकेत अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर यांनीं दिले. या मोहिमेमुळे महापालिका हद्दीतील उल्हास नदी पात्र स्वच्छ झाले. मात्र शेजारील वरप, कांबा व म्हारळ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नदी पात्रातील जलपर्णी काढली जात असून ती पाण्याच्या प्रवाहात महापालिका हद्दीतील नदी पात्रात येत असल्याने, जलपर्णी काढण्याचे काम महापालिकेला करावे लागत आहे. महापालिका आयुक्त अजित शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हास नदी पात्रातील जलपर्णी काढण्याचे काम पावसाळा पर्यंत सुरू ठेवण्याचा मानस असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. महापालिका उपअभियंता दिपक ढोले, परमेश्वर बुडगे हे जलपर्णी काढण्याच्या मोहीमेचे नेतृत्व करीत आहेत. नदी पात्रात नागरिक केरकचरा, जुने टाकावू साहित्य, प्लास्टिक पिशव्या व निर्माल्य टाकत असल्याने नदीच्या प्रदूषणात वाढ होत आहे. शहरवासीयांना स्वच्छ पाणी मिळण्यासाठी व नदीचे पावित्र्य जपण्यासाठी नदी पात्रात कोणताही टाकाऊ वस्तू टाकू नका. असे आवाहन महापालिकेने नागरिकांना केले आहे.