शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

उल्हासनगर महापालिकेचा उपक्रम; उल्हास नदीतील जलपर्णी काढण्यासाठी विशेष मोहीम, नदी होतेय स्वच्छ

By सदानंद नाईक | Updated: March 3, 2023 16:52 IST

उल्हास नदीतील पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेने पाणी उपसा केंद्रा जवळ विशेष मोहिमे अंतर्गत नदी पात्रातील जलपर्णी काढण्याचे काम

उल्हासनगर :

उल्हास नदीतील पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेने पाणी उपसा केंद्रा जवळ विशेष मोहिमे अंतर्गत नदी पात्रातील जलपर्णी काढण्याचे काम सुरू केले. जलपर्णी काढल्याने नदी पात्रातील उपसा केंद्र जलपर्णी मुक्त झाले असून नदीची स्वच्छ झाली आहे.

 उल्हासनगर महापालिका पश्चिम व पूर्वेतील काही भागाला संच्युरी रेयॉन कंपनी जवळील उल्हास नदी पात्रातून उपसा केंद्राद्वारे एमआयडीसी पाणी उचलून पाणी पुरवठा करते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून नदी पात्रात जलपर्णी पसरली असून नदीतील पाणी प्रदूषित झाल्याचे बोलले जाते. याच ठिकाणी शहरातील सांडपाणीचा खेमानी नाला नदीला मिळत असल्याने, नदीचे पाणी अधिकच प्रदूषित होत असल्याचा आरोप होत आहे. नदीतील पाणी स्वच्छ होण्यासाठी व शहरवासीयांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळण्यासाठी महापालिकेने नदी पात्रातील जलपर्णी काढण्यासाठी विशेष मोहीम सुरू केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. आयुक्त अजीज शेख यांची यामागे संकल्पना असल्याचेही लेंगरेकर म्हणाले. 

महापालिकेने नदी पात्रातील ७० टक्के जलपर्णी काढून टाकली असून यापुढे विशेष मोहीम सुरूच राहण्याचे संकेत अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर यांनीं दिले. या मोहिमेमुळे महापालिका हद्दीतील उल्हास नदी पात्र स्वच्छ झाले. मात्र शेजारील वरप, कांबा व म्हारळ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नदी पात्रातील जलपर्णी काढली जात असून ती पाण्याच्या प्रवाहात महापालिका हद्दीतील नदी पात्रात येत असल्याने, जलपर्णी काढण्याचे काम महापालिकेला करावे लागत आहे. महापालिका आयुक्त अजित शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हास नदी पात्रातील जलपर्णी काढण्याचे काम पावसाळा पर्यंत सुरू ठेवण्याचा मानस असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. महापालिका उपअभियंता दिपक ढोले, परमेश्वर बुडगे हे जलपर्णी काढण्याच्या मोहीमेचे नेतृत्व करीत आहेत. नदी पात्रात नागरिक केरकचरा, जुने टाकावू साहित्य, प्लास्टिक पिशव्या व निर्माल्य टाकत असल्याने नदीच्या प्रदूषणात वाढ होत आहे. शहरवासीयांना स्वच्छ पाणी मिळण्यासाठी व नदीचे पावित्र्य जपण्यासाठी नदी पात्रात कोणताही टाकाऊ वस्तू टाकू नका. असे आवाहन महापालिकेने नागरिकांना केले आहे.