शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिकेचा उपक्रम; उल्हास नदीतील जलपर्णी काढण्यासाठी विशेष मोहीम, नदी होतेय स्वच्छ

By सदानंद नाईक | Updated: March 3, 2023 16:52 IST

उल्हास नदीतील पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेने पाणी उपसा केंद्रा जवळ विशेष मोहिमे अंतर्गत नदी पात्रातील जलपर्णी काढण्याचे काम

उल्हासनगर :

उल्हास नदीतील पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेने पाणी उपसा केंद्रा जवळ विशेष मोहिमे अंतर्गत नदी पात्रातील जलपर्णी काढण्याचे काम सुरू केले. जलपर्णी काढल्याने नदी पात्रातील उपसा केंद्र जलपर्णी मुक्त झाले असून नदीची स्वच्छ झाली आहे.

 उल्हासनगर महापालिका पश्चिम व पूर्वेतील काही भागाला संच्युरी रेयॉन कंपनी जवळील उल्हास नदी पात्रातून उपसा केंद्राद्वारे एमआयडीसी पाणी उचलून पाणी पुरवठा करते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून नदी पात्रात जलपर्णी पसरली असून नदीतील पाणी प्रदूषित झाल्याचे बोलले जाते. याच ठिकाणी शहरातील सांडपाणीचा खेमानी नाला नदीला मिळत असल्याने, नदीचे पाणी अधिकच प्रदूषित होत असल्याचा आरोप होत आहे. नदीतील पाणी स्वच्छ होण्यासाठी व शहरवासीयांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळण्यासाठी महापालिकेने नदी पात्रातील जलपर्णी काढण्यासाठी विशेष मोहीम सुरू केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. आयुक्त अजीज शेख यांची यामागे संकल्पना असल्याचेही लेंगरेकर म्हणाले. 

महापालिकेने नदी पात्रातील ७० टक्के जलपर्णी काढून टाकली असून यापुढे विशेष मोहीम सुरूच राहण्याचे संकेत अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर यांनीं दिले. या मोहिमेमुळे महापालिका हद्दीतील उल्हास नदी पात्र स्वच्छ झाले. मात्र शेजारील वरप, कांबा व म्हारळ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नदी पात्रातील जलपर्णी काढली जात असून ती पाण्याच्या प्रवाहात महापालिका हद्दीतील नदी पात्रात येत असल्याने, जलपर्णी काढण्याचे काम महापालिकेला करावे लागत आहे. महापालिका आयुक्त अजित शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हास नदी पात्रातील जलपर्णी काढण्याचे काम पावसाळा पर्यंत सुरू ठेवण्याचा मानस असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. महापालिका उपअभियंता दिपक ढोले, परमेश्वर बुडगे हे जलपर्णी काढण्याच्या मोहीमेचे नेतृत्व करीत आहेत. नदी पात्रात नागरिक केरकचरा, जुने टाकावू साहित्य, प्लास्टिक पिशव्या व निर्माल्य टाकत असल्याने नदीच्या प्रदूषणात वाढ होत आहे. शहरवासीयांना स्वच्छ पाणी मिळण्यासाठी व नदीचे पावित्र्य जपण्यासाठी नदी पात्रात कोणताही टाकाऊ वस्तू टाकू नका. असे आवाहन महापालिकेने नागरिकांना केले आहे.