शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
4
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
5
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
6
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
7
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
8
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
9
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
10
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
11
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
12
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
13
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
14
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
15
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
16
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
17
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
18
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
19
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
20
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?

‘इनकमिंग’वर कार्यकर्ते नाराज

By admin | Updated: September 10, 2014 09:13 IST

भारतीय जनता पार्टीमध्ये अन्य पक्षांमधून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशावर असलेला फिल्टर काढून घेण्यात आल्यावर परपक्षांतून लोंढे येऊ लागल्याने भाजपाचा मूळ कार्यकर्ता अस्वस्थ झाला आहे.

भाजपा : पक्षात अस्वस्थता, एकनाथ खडसेंनी दिली कबुली!संदीप प्रधान, मुंबईभारतीय जनता पार्टीमध्ये अन्य पक्षांमधून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशावर असलेला फिल्टर काढून घेण्यात आल्यावर परपक्षांतून लोंढे येऊ लागल्याने भाजपाचा मूळ कार्यकर्ता अस्वस्थ झाला आहे. गेली पंधरा वर्षे सत्ता उपभोगलेल्यांच्या पालख्या  पुढील पाच वर्षे उचलाव्या लागणार असतील तर अशी सत्ता येऊन काय कामाची, असा सवाल कार्यकर्ते खासगीत करीत आहेत.भाजपामधील अन्य पक्षीयांच्या प्रवेशामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असल्याची कबुली खडसे यांनी दिली. मात्र त्या कार्यकर्त्यांचे प्रमाण नगण्य असल्याचा दावा केला. ज्या मतदारसंघात भाजपाची परि स्थिती मजबूत नाही. जेथे गेल्या २५ वर्षांत पक्षाचा आमदार निवडून आलेला नाही अशा ठिकाणी पर पक्षातून प्रवेश दिले जात आहेत, असे ते म्हणाले. शिवाय पक्षात प्रवेश करणाऱ्यांपैकी केवळ एक-दोघांचा अपवाद वगळता इतरांना उमेदवारी नको आहे, असे ते म्हणाले.खडसे यांचा दावा काहीही असला तरी अन्य पक्षातून येणारी मंडळी ही एकतर भाजपाचे सरकार आल्यास वेगवेगळ््या यंत्रणांकडून संरक्षण मिळावे याकरिता किंवा त्यांच्या सहकार क्षेत्रातील संस्थांना आर्थिक लाभ मिळत राहावा याकरिता येत आहेत,असे कार्यकर्त्यांचे मत आहे. गावित, पाचपुते यांना पक्षात घेतल्याने कदाचित ते दोन-चार मतदारसंघ भाजपाकडे येतील. मात्र अन्यत्र त्यांच्या प्रवेशाचा फटका बसणार नाही याची काय खात्री, असा सवाल कार्यकर्ते करीत आहेत. प्रवेश करणाऱ्या काहींनी कुठलीही उमेदवारी मागितली नसली तरी भविष्यात राज्यसभा, विधान परिषद, महामंडळांची अध्यक्षपदे यावर काँग्रेस-राष्ट्रवादीतून येणारी ही मंडळी दावा करणार. अशावेळी भाजपातील प्रामाणिक कार्यकर्त्यांचा विचार होणार की नाही, अशी चिंता कार्यकर्ते खासगीत व्यक्त करीत आहेत. फ्री इनकमिंग सुरूच !वादग्रस्त माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते यांच्याबरोबर किमान ३५ जणांना भाजपाने राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत प्रवेश दिला. त्यानंतर मंगळवारी जावळीचे माजी आमदार सदाशिवराव सपकाळ, उस्मानाबादचे माजी खासदार शिवाजीराव कांबळे, भारिपच्या उज्ज्वला जाधव आदींनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.पुन्हा तेच होणार का ?राज्यात पुलोदचे सरकार होते तेव्हा व शिवसेना-भाजपा युतीचे सरकार होते तेव्हाही अनेक मंडळी पक्षात आली होती. त्यांनी मंत्रीपदे, राज्यसभेची खासदारकी पदरात पाडून घेतली होती. तेच पुन्हा घडणार असेल तर सत्ता येऊनही गेली पंधरा वर्षे संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांचे काय होणार, असे कार्यकर्त्यांचे मत आहे.