शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
4
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
5
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
6
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
7
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
8
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
9
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
10
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
11
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
12
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
13
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
14
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
15
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
16
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
17
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
18
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
19
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
20
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही

‘इनकमिंग’वर कार्यकर्ते नाराज

By admin | Updated: September 10, 2014 09:13 IST

भारतीय जनता पार्टीमध्ये अन्य पक्षांमधून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशावर असलेला फिल्टर काढून घेण्यात आल्यावर परपक्षांतून लोंढे येऊ लागल्याने भाजपाचा मूळ कार्यकर्ता अस्वस्थ झाला आहे.

भाजपा : पक्षात अस्वस्थता, एकनाथ खडसेंनी दिली कबुली!संदीप प्रधान, मुंबईभारतीय जनता पार्टीमध्ये अन्य पक्षांमधून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशावर असलेला फिल्टर काढून घेण्यात आल्यावर परपक्षांतून लोंढे येऊ लागल्याने भाजपाचा मूळ कार्यकर्ता अस्वस्थ झाला आहे. गेली पंधरा वर्षे सत्ता उपभोगलेल्यांच्या पालख्या  पुढील पाच वर्षे उचलाव्या लागणार असतील तर अशी सत्ता येऊन काय कामाची, असा सवाल कार्यकर्ते खासगीत करीत आहेत.भाजपामधील अन्य पक्षीयांच्या प्रवेशामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असल्याची कबुली खडसे यांनी दिली. मात्र त्या कार्यकर्त्यांचे प्रमाण नगण्य असल्याचा दावा केला. ज्या मतदारसंघात भाजपाची परि स्थिती मजबूत नाही. जेथे गेल्या २५ वर्षांत पक्षाचा आमदार निवडून आलेला नाही अशा ठिकाणी पर पक्षातून प्रवेश दिले जात आहेत, असे ते म्हणाले. शिवाय पक्षात प्रवेश करणाऱ्यांपैकी केवळ एक-दोघांचा अपवाद वगळता इतरांना उमेदवारी नको आहे, असे ते म्हणाले.खडसे यांचा दावा काहीही असला तरी अन्य पक्षातून येणारी मंडळी ही एकतर भाजपाचे सरकार आल्यास वेगवेगळ््या यंत्रणांकडून संरक्षण मिळावे याकरिता किंवा त्यांच्या सहकार क्षेत्रातील संस्थांना आर्थिक लाभ मिळत राहावा याकरिता येत आहेत,असे कार्यकर्त्यांचे मत आहे. गावित, पाचपुते यांना पक्षात घेतल्याने कदाचित ते दोन-चार मतदारसंघ भाजपाकडे येतील. मात्र अन्यत्र त्यांच्या प्रवेशाचा फटका बसणार नाही याची काय खात्री, असा सवाल कार्यकर्ते करीत आहेत. प्रवेश करणाऱ्या काहींनी कुठलीही उमेदवारी मागितली नसली तरी भविष्यात राज्यसभा, विधान परिषद, महामंडळांची अध्यक्षपदे यावर काँग्रेस-राष्ट्रवादीतून येणारी ही मंडळी दावा करणार. अशावेळी भाजपातील प्रामाणिक कार्यकर्त्यांचा विचार होणार की नाही, अशी चिंता कार्यकर्ते खासगीत व्यक्त करीत आहेत. फ्री इनकमिंग सुरूच !वादग्रस्त माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते यांच्याबरोबर किमान ३५ जणांना भाजपाने राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत प्रवेश दिला. त्यानंतर मंगळवारी जावळीचे माजी आमदार सदाशिवराव सपकाळ, उस्मानाबादचे माजी खासदार शिवाजीराव कांबळे, भारिपच्या उज्ज्वला जाधव आदींनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.पुन्हा तेच होणार का ?राज्यात पुलोदचे सरकार होते तेव्हा व शिवसेना-भाजपा युतीचे सरकार होते तेव्हाही अनेक मंडळी पक्षात आली होती. त्यांनी मंत्रीपदे, राज्यसभेची खासदारकी पदरात पाडून घेतली होती. तेच पुन्हा घडणार असेल तर सत्ता येऊनही गेली पंधरा वर्षे संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांचे काय होणार, असे कार्यकर्त्यांचे मत आहे.