शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सोशल मीडियावर अफवांचा पाऊस, अफवा पसरवणा-यांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 05:15 IST

मुंबईत मंगळवारपासून मुसळधार पावसास सुरुवात झाली. त्यातच बुधवारी दुपारी ३च्या सुमारास मुंबईत वादळ धडकणार आहे, अशी अफवा मंगळवारी मध्यरात्रीपासून सोशल मीडियावर पसरली.

मुंबई : मुंबईत मंगळवारपासून मुसळधार पावसास सुरुवात झाली. त्यातच बुधवारी दुपारी ३च्या सुमारास मुंबईत वादळ धडकणार आहे, अशी अफवा मंगळवारी मध्यरात्रीपासून सोशल मीडियावर पसरली. अफवांच्या या पावसामुळे मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळाले. मात्र, मुंबईत असे कोणतेही वादळ धडकणार नसून, नागरिकांनी हा संदेश फॉरवर्ड करू नये आणि कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने नेटीझन्सना केले. मुंबई प्रादेशिक हवामान खात्यानेही चक्रीवादळाची अफवा असल्याचे सांगितले, तरीही बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत मुंबईकरांच्या मनातील भीती कायम होती.दुपारी ३ वाजता मुंबईत वादळ धडकले, तर अनर्थ घडू नये, यासाठी खबरदारी म्हणून वांद्रे-वरळी सी लिंक, पेडर रोड बंद ठेवण्यात आला आहे. सायन ब्रिजही बंद करून वाहनांना माघारी पाठविण्यात येत आहे. पावसामुळे वांद्रे ते सांताक्रुझपर्यंत एस. व्ही. मार्ग बंद आहे, अशा अनेक अफवांचे संदेश सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फिरत होते. हे संदेश पूर्णपणे चुकीचे असून, नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले. दुसरीकडे अनेकांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर लोकल बंद झाल्याचे संदेश आल्याने गोंधळ उडाला होता. मुंबईत अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. कोणीही घरातून बाहेर पडू नका, असे मेसेजेसही फिरत होते.>चक्रीवादळ येणार आहे. त्यामुळे वांद्रे वरळी समुद्रसेतू मार्ग बंद केला आहे, अशा बातम्या सोशल मीडियावरून पसरवण्यात आल्या. पालिकेने याची गंभीर दखल घेतली असून हा संदेश पसरवणाºयांचा शोध सुरू केला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, प्रकरण १०, कलम ५४ अंतर्गत खोटी माहिती देऊन मुंबईकरांमध्ये भीती निर्माण केल्याबद्दल कारवाईचे निर्देश संबंधितांना द्यावे, अशी सूचना आयुक्त अजय मेहता यांनी सहपोलीस आयुक्त देवेन भारती यांना केली आहे. दोषीला एक वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते.