शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

कारवाईचा वेग मंदावलेला

By admin | Updated: June 9, 2017 02:13 IST

मुंबईत बेकायदा बांधकामांची संख्या झपाट्याने वाढत असताना त्यावरील महापालिकेचा कारवाईचा वेग मंदावलेलाच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत बेकायदा बांधकामांची संख्या झपाट्याने वाढत असताना त्यावरील महापालिकेचा कारवाईचा वेग मंदावलेलाच आहे. रस्त्यावर अतिक्रमण करणारे फेरीवाले अथवा बेकायदा बांधकामांवर कारवाई होत असल्याचा दावा महापालिका अधिकारी करीत आहेत. प्रत्यक्षात मात्र दररोज सरासरी एकाच बेकायदा बांधकामावर महापालिका कारवाई करीत असल्याचे आकडेवारीवरून उजेडात आले आहे. रस्त्यावर ठाण मांडणारे फेरीवाले, मोकळ्या भूखंडांवरील अतिक्रमण आणि बेकायदा बांधकामांना आळा घालण्यासाठी पालिकेने बेकायदा बांधकामांविरोधात मोहीम सुरू केली. गेले वर्षभर या मोहिमेअंतर्गत कारवाई सुरू आहे. वर्षभरात सुमारे ११ हजार बेकायदा बांधकामांवर २४ विभाग कार्यालयांच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र या कारवाईसाठी प्रशासन आपल्या अधिकाऱ्यांची पाठ थोपटत असले तरी प्रत्यक्षात हा मोठा आकडा केवळ धूळफेक असल्याचे बोलले जात आहे. एप्रिल २०१६ ते एप्रिल २०१७ या १३ महिन्यांच्या कालावधीत ११ हजार ४१३ बांधकामांवर महापालिकेने कारवाई केली आहे. म्हणजेच दररोज सरासरी २९ बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात येत आहे. याचाच अर्थ प्रत्येक वॉर्डात दररोज जेमतेम एकच कारवाई होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.वर्षात ५ हजार झोपड्यांवर कारवाईगेल्या १३ महिन्यांच्या कालावधीत महापालिकेने तीन हजार ६१९ निवासी, दोन हजार ५०६ व्यावसायिक, तर पाच हजार २८८ झोपड्या तथा कच्च्या स्वरूपाच्या बांधकामांवर कारवाई केली आहे. एका वर्षात पाच हजार झोपड्यांवरच कारवाई करणे महापालिका अधिकाऱ्यांना शक्य झाले आहे. >१३ हजार बांधकामे तोडल्याचा दावामुंबईतील अनधिकृत फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते आणि बांधकामांवर वर्षभरात १३ हजार ४१३ बांधकामे तोडल्याचा दावा महापालिकेने केला आहे. वर्षभरातील ही कारवाई असून त्यात सर्वाधिक बांधकामे एफ उत्तर व एम पश्चिम विभागातील आहेत. अनधिकृत व्यवसायांवर हातोडाएप्रिल २०१६ ते एप्रिल २०१७ या १३ महिन्यांच्या कालावधीत महापालिकेने तीन हजार ६१९ निवासी, दोन हजार ५०६ व्यावसायिक तर पाच हजार २८८ झोपड्या आणि कच्च्या स्वरूपाची बांधकामे तोडली. एफ उत्तर विभागात सर्वाधिक कारवायामाटुंगा, शीव, चुनाभट्टी, वडाळा, अ‍ॅण्टॉप हिल यासारख्या एफ उत्तर विभागात सर्वाधिक एक हजार ८४०, त्याखालोखाल एम पश्चिम विभागातील चेंबूर, टिळकनगर आदी परिसरातील एक हजार १९० आणि आर उत्तर विभागात एक हजार ९५ अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली.