शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

गणेशोत्सव मंडळांवर कारवाईची टांगती तलवार

By admin | Updated: September 23, 2015 01:40 IST

उच्च न्यायालयाच्या दट्ट्यानंतर सार्वजनिक रीतसर परवानगी घेऊन उत्सव साजरा करतील, ही अपेक्षा गणेशोत्सव मंडळांनी फोल ठरवली आहे. ठाण्यात ३६० मंडळांपैकी केवळ

ठाणे : उच्च न्यायालयाच्या दट्ट्यानंतर सार्वजनिक रीतसर परवानगी घेऊन उत्सव साजरा करतील, ही अपेक्षा गणेशोत्सव मंडळांनी फोल ठरवली आहे. ठाण्यात ३६० मंडळांपैकी केवळ २१४ मंडळांनी पालिकेची रीतसर परवानगी घेऊन मंडप टाकले आहेत. परंतु यातील ४० पेक्षा अधिक मंडळांनी नियमांचे उल्लंघन केले असल्याची माहितीही समोर आली आहे. तर महापालिका हद्दीतील ६६ मंडळांनी पालिकेची परवानगी न घेता मंडप उभारल्याचा अहवाल ठाणे तहसीलदारांनी महापालिकेला सादर केला आहे. त्यानुसार आता महापालिकेने या ६६ मंडळांना नोटिसा बजावल्या आहेत. परवानगी न घेता मंडप उभारल्याबद्दल या मंडळांना नोटिसा बजावून न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्याचे सूतोवाच करण्यात आले आहे. ठाणे महापालिकेच्या नव्या धोरणाला बाजूला सारून वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा प्रकारे मंडप उभारले आहेत. त्यासाठी महापालिकेच्या प्रस्तावाचा दाखला दिला आहे. त्यानुसार बहुसंख्य मंडळांनी आपल्या स्तरावर परंपरागत पद्धतीनेच मंडप उभारले आहेत. यापूर्वी महापालिकेने केलेल्या ठरावानुसार वाहतुकीला अडथळा ठरणार नाही, अशाप्रकारे मंडप उभारणीला परवानगी दिली आहे. त्याच आधारे सर्व मंडळांनी आपले मंडप यंदाही उभारले आहेत. मात्र त्याचवेळी न्यायालयाचा दट्ट्या बसण्याची भीती असल्याने सर्वच शासकीय यंत्रणा किमान कागदावरील कारवाईत मात्र आघाडीवर आहेत. ठाण्यातील रस्ते अडविणाऱ्या मंडपांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने ठाणे तहसीलदारांना दिले होते. तसेच असे तो न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची तंबी दिली होती. त्यानंतर ठाणे तहसीलदारांनी तयार केलेल्या अहवालात ६६ मंडळांनी परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.यापूर्वी मंडपाच्या विषयावरून नवी मुंबईतील एका मंडळाला एक लाखाचा दंड ठोठावण्यात आला. त्याच धर्तीवर ठाण्यात कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे.