शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
5
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
6
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
7
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
8
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
9
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
10
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
11
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
12
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
13
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
14
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
15
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
16
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
17
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
18
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
19
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
20
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा

मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृहातील जेवणात भेसळ आढळल्यास अॅट्रोसीटीनुसार कारवाई

By admin | Updated: March 23, 2017 22:55 IST

वसतिगृहात राहणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जेवणात विषबाधा होणे असे प्रकार गेली अनेक वर्षे सतत घडत असून

 ऑनलाइन लोकमत

मुंबई दि. २३ – वसतिगृहात राहणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जेवणात विषबाधा होणे असे प्रकार गेली अनेक वर्षे सतत घडत असून, अन्न धान्य भेसळ करण्यात येते हे प्रकार रोखण्यासाठी अशी घटना घडल्यास संबंधित कंत्राटदारावर यापुढे अॅट्रोसीटी कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांनी आज विधानसभेत मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या प्रश्नावर केली.
चेंबूर येथील संत एकनाथ मुलांच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणात पाल सापडल्याची घटना २२ फेब्रुवारी २०१७ रोजी आढळून आली. त्यापूर्वी जेवणात काचेचे तुकडे, गोगलगाय आढळल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती. तर राज्यातील विविध वसतिगृहातील विद्यार्थ्यांकडून अशा स्वरूपाच्या तक्रारी करण्यात येत असल्याकडे विधानसभेत लक्षवेधी सुचनेमार्फत लक्ष वेधण्यात आले होते. या चर्चेत सहभागी होताना आमदार आशिष शेलार यांनी याबाबत सरकारने कठोर उपयोजना करण्याची आवश्यकता आहे असे सांगत अशा प्रकारे कंत्राटदार दोषी आढळल्यास त्यांच्यावर अॅट्रोसीटी कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल काय असा प्रश्न उपस्थित केला. त्याला उत्तर देताना सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांनी ही सूचना मान्य करत यापुढे अशा घटनांवर अॅट्रोसीटी कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल असे घोषित केले.