शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

कृती आराखडा कागदावरच

By admin | Updated: June 6, 2017 00:21 IST

नांदेड: यावर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांसाठी १० कोटी ७० लाख तर एप्रिल ते जूनसाठी १६ कोटी ७१ लाख १४ हजार रूपयांचा कृती आराखडा तयार केला होता़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: यावर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांसाठी १० कोटी ७० लाख तर एप्रिल ते जूनसाठी १६ कोटी ७१ लाख १४ हजार रूपयांचा कृती आराखडा तयार केला होता़ त्यानुसार काही ठिकाणी कामेही सुरू करण्यात आले़ मात्र शासनाकडून अद्याप निधी न मिळाल्याने टंचाई निवारणार्थ अनेक कामे कागदावरच राहिली आहेत़ गतवर्षी पाणीटंचाई निवारणार्थ ७८ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला होता़ प्रत्यक्षात ४३ कोटी ५० लाख रूपये विविध योजनांवर खर्च करण्यात आले़ यावर्षी नव्याने २७ कोटींची मागणी जिल्हा परिषदेने केली होती़ जिल्हाधिकारी कार्यालयात सादर झालेल्या या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर तो विभागीय आयुक्तांकडे सादर झाला़ मात्र या आराखड्याचा प्रस्तावित निधी अद्याप मिळाला नाही़ मार्च, एप्रिल व मे महिन्यात ग्रामीण भागातील गावे, वाडे, वस्त्या पाण्यासाठी व्याकूळ झाले़ जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने मात्र कागदोपत्रीच आराखडे सादर करून आपले कर्तव्य बजावले़ ग्रामीण पाणीटंचाई निवारणार्थ जानेवारी ते जून या सहा महिन्यांसाठी २७ कोटींचा आराखडा तयार केल्यानंतर त्यास तातडीने निधी मिळण्यासाठीचे प्रयत्न अपुरे पडले़ त्यामुळे जिल्ह्यातील २२४ गावे, वाड्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागले़ गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईचे गांभिर्य प्रशासनाकडून घेण्यातच आले नाही़ मार्चअखेर पाण्याचे स्त्रोत कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता़ पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजनेचे कामे वेळेवर सुरू न झाल्यामुळे ऐन एप्रिलच्या मध्यावर पाणीटंचाईला सामोर जावे लागले़ ग्रामीण पाणीटंचाई निवारणार्थ सहा महिन्यांचा संभाव्य कृती आराखडा केला होता़ यामध्ये नवीन विंधन विहिरी, नळयोजना विशेष दुरूस्ती करणे, पुरक नळयोजना, विंधन विहीर विशेष दुरूस्ती, खाजगी विहीर अधिग्रहण, टँकरद्वारे पाणी पुरवठा, प्रगतीपथावरील उपाय योजना आदी कामासाठी एकूण २७ कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता़ एप्रिल ते जून या महिन्यासाठी १६ कोटी ७१ लाख १४ हजार रूपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता़