शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

कृती आराखडा कागदावरच

By admin | Updated: June 6, 2017 00:21 IST

नांदेड: यावर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांसाठी १० कोटी ७० लाख तर एप्रिल ते जूनसाठी १६ कोटी ७१ लाख १४ हजार रूपयांचा कृती आराखडा तयार केला होता़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: यावर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांसाठी १० कोटी ७० लाख तर एप्रिल ते जूनसाठी १६ कोटी ७१ लाख १४ हजार रूपयांचा कृती आराखडा तयार केला होता़ त्यानुसार काही ठिकाणी कामेही सुरू करण्यात आले़ मात्र शासनाकडून अद्याप निधी न मिळाल्याने टंचाई निवारणार्थ अनेक कामे कागदावरच राहिली आहेत़ गतवर्षी पाणीटंचाई निवारणार्थ ७८ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला होता़ प्रत्यक्षात ४३ कोटी ५० लाख रूपये विविध योजनांवर खर्च करण्यात आले़ यावर्षी नव्याने २७ कोटींची मागणी जिल्हा परिषदेने केली होती़ जिल्हाधिकारी कार्यालयात सादर झालेल्या या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर तो विभागीय आयुक्तांकडे सादर झाला़ मात्र या आराखड्याचा प्रस्तावित निधी अद्याप मिळाला नाही़ मार्च, एप्रिल व मे महिन्यात ग्रामीण भागातील गावे, वाडे, वस्त्या पाण्यासाठी व्याकूळ झाले़ जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने मात्र कागदोपत्रीच आराखडे सादर करून आपले कर्तव्य बजावले़ ग्रामीण पाणीटंचाई निवारणार्थ जानेवारी ते जून या सहा महिन्यांसाठी २७ कोटींचा आराखडा तयार केल्यानंतर त्यास तातडीने निधी मिळण्यासाठीचे प्रयत्न अपुरे पडले़ त्यामुळे जिल्ह्यातील २२४ गावे, वाड्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागले़ गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईचे गांभिर्य प्रशासनाकडून घेण्यातच आले नाही़ मार्चअखेर पाण्याचे स्त्रोत कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता़ पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजनेचे कामे वेळेवर सुरू न झाल्यामुळे ऐन एप्रिलच्या मध्यावर पाणीटंचाईला सामोर जावे लागले़ ग्रामीण पाणीटंचाई निवारणार्थ सहा महिन्यांचा संभाव्य कृती आराखडा केला होता़ यामध्ये नवीन विंधन विहिरी, नळयोजना विशेष दुरूस्ती करणे, पुरक नळयोजना, विंधन विहीर विशेष दुरूस्ती, खाजगी विहीर अधिग्रहण, टँकरद्वारे पाणी पुरवठा, प्रगतीपथावरील उपाय योजना आदी कामासाठी एकूण २७ कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता़ एप्रिल ते जून या महिन्यासाठी १६ कोटी ७१ लाख १४ हजार रूपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता़