शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

लातूरच्या पाणीटंचाईसाठी कृती आराखडा

By admin | Updated: December 22, 2015 02:02 IST

लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणी टंचाई निवारणार्थ पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला होता, त्यानुसार टप्प्याटप्प्याने कारवाई करण्यात आली,

नागपूर : लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणी टंचाई निवारणार्थ पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला होता, त्यानुसार टप्प्याटप्प्याने कारवाई करण्यात आली, अशी माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी विधानसभेत दिली. अब्दुल सत्तार यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री केसरकर यांनी सांगितले की, लातूर जिल्ह्यासाठी १ आॅक्टोबर २०१४ ते ३० जून २०१५ या कालावधीकरिता ३१३८.१७ लक्ष रुपयाचा पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आलेला होता. तसेच जून २०१५ अखेर अत्यल्प पर्जन्यमान झाल्यामुळे १ जुलै २०१५ ते ३० सप्टेंबर २०१५ या कालवधीकरिता ६९२.८१ लक्ष रुपयांचा आकस्मिक टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला होता. टंचाई कृती आराखड्याची आवश्यकतेप्रमाणे अंमलबजावणी करण्यात आली आहे. उपरोक्त कालावधीत टंचाई निवारणार्थ एकूण १४६७ उपाययोजना राबवण्यात आल्या असून सदर उपाययोजनांवर १६१४.४९ लक्ष रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. त्यापैकी शासनकडून आतापर्यंत १५४०.६१ लाख रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे, असेही त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)