शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

नैसर्गिक न्यायाला डावलून कारवाई

By admin | Updated: September 6, 2015 00:50 IST

सेवाशर्तीनुसार व सामान्य प्रशासन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न करता, नैसर्गिक न्यायाचे कोणतेही तत्त्व न पाळता एकतर्फी व आकस बुद्धीने सार्वजनिक बांधकाम विभागातील

मुंबई : सेवाशर्तीनुसार व सामान्य प्रशासन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न करता, नैसर्गिक न्यायाचे कोणतेही तत्त्व न पाळता एकतर्फी व आकस बुद्धीने सार्वजनिक बांधकाम विभागातील २२ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली, असा आक्षेप घेणारे निषेधाचे पत्र कनिष्ठ अभियंता संघटनेने बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठविले आहे.लेखातपासणी पथकाला २५ कामांच्या पाहणीत शंका आढळली व शासनाचे ९४,८५० रुपयांचे नुकसान झाल्याचे लेखापरीक्षण पथकाने नमूद केले होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनावट अहवाल तयार करण्यात आल्याचा निष्कर्ष दक्षता व गुणनियंत्रण मंडळाने काढला होता. मात्र चाचणी अहवालाचे निष्कर्ष स्वीकृत मानांकनाप्रमाणे आहेत की नाही, एवढेच तपासणे विभागीय कार्यालयातील व क्षेत्रीय अभियंत्यांकडून अपेक्षित असताना आणि आधुनिक तंत्रज्ञानाने केलेले फेरफार ओळखण्याची कोणतीही यंत्रणा, प्रशिक्षण उपलब्ध नसताना अभियंत्यांना यात गोवले गेले, असा आरोप या पत्रात आहे.निलंबित करण्यापूर्वी संबंधितांना कारणे दाखवा नोटीस देणे, त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देणे व विहित पद्धतीचा अवलंब न करता थेट निलंबनाची कारवाई केली गेली. तसेच ज्या २५ कामांच्या तपासणीत कोणताही संबंध नसलेल्या अधिकाऱ्यांना ते केवळ त्या कालावधीत उत्तर मुंबई कार्यालयात कार्यरत होते, या एकाच निकषावर कोणतीही शहानिशा न करता निलंबनाची कारवाई बांधकाम विभागाने केली आहे, असेही त्यात म्हटले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातल्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना अधीक्षक अभियंता मुंबई यांना देण्यात आल्या होत्या. परंतु त्यांनी या आदेशाची पूर्तता केली की नाही याची कसलीही माहिती न घेता एकतर्फी निर्णय घेण्यात आल्याने या कृतीचा तीव्र निषेध करीत हे निलंबन मागे घेण्याची मागणीही या पत्रात आहे. (प्रतिनिधी)