शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक न्यायाला डावलून कारवाई

By admin | Updated: September 6, 2015 00:50 IST

सेवाशर्तीनुसार व सामान्य प्रशासन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न करता, नैसर्गिक न्यायाचे कोणतेही तत्त्व न पाळता एकतर्फी व आकस बुद्धीने सार्वजनिक बांधकाम विभागातील

मुंबई : सेवाशर्तीनुसार व सामान्य प्रशासन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न करता, नैसर्गिक न्यायाचे कोणतेही तत्त्व न पाळता एकतर्फी व आकस बुद्धीने सार्वजनिक बांधकाम विभागातील २२ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली, असा आक्षेप घेणारे निषेधाचे पत्र कनिष्ठ अभियंता संघटनेने बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठविले आहे.लेखातपासणी पथकाला २५ कामांच्या पाहणीत शंका आढळली व शासनाचे ९४,८५० रुपयांचे नुकसान झाल्याचे लेखापरीक्षण पथकाने नमूद केले होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनावट अहवाल तयार करण्यात आल्याचा निष्कर्ष दक्षता व गुणनियंत्रण मंडळाने काढला होता. मात्र चाचणी अहवालाचे निष्कर्ष स्वीकृत मानांकनाप्रमाणे आहेत की नाही, एवढेच तपासणे विभागीय कार्यालयातील व क्षेत्रीय अभियंत्यांकडून अपेक्षित असताना आणि आधुनिक तंत्रज्ञानाने केलेले फेरफार ओळखण्याची कोणतीही यंत्रणा, प्रशिक्षण उपलब्ध नसताना अभियंत्यांना यात गोवले गेले, असा आरोप या पत्रात आहे.निलंबित करण्यापूर्वी संबंधितांना कारणे दाखवा नोटीस देणे, त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देणे व विहित पद्धतीचा अवलंब न करता थेट निलंबनाची कारवाई केली गेली. तसेच ज्या २५ कामांच्या तपासणीत कोणताही संबंध नसलेल्या अधिकाऱ्यांना ते केवळ त्या कालावधीत उत्तर मुंबई कार्यालयात कार्यरत होते, या एकाच निकषावर कोणतीही शहानिशा न करता निलंबनाची कारवाई बांधकाम विभागाने केली आहे, असेही त्यात म्हटले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातल्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना अधीक्षक अभियंता मुंबई यांना देण्यात आल्या होत्या. परंतु त्यांनी या आदेशाची पूर्तता केली की नाही याची कसलीही माहिती न घेता एकतर्फी निर्णय घेण्यात आल्याने या कृतीचा तीव्र निषेध करीत हे निलंबन मागे घेण्याची मागणीही या पत्रात आहे. (प्रतिनिधी)