शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आदर्शप्रकरणी सूडबुद्धीने कारवाई

By admin | Updated: January 30, 2016 01:48 IST

भाजपाप्रणित सरकारची लोकविरोधी धोरणे आमचा पक्ष चव्हाट्यावर आणत असल्याने सरकारने देशभरातील काँग्रेस नेत्यांविरुद्ध राजकीय सूडबुद्धीने कारवाई सुरू केली आहे, असा आरोप

मुंबई : भाजपाप्रणित सरकारची लोकविरोधी धोरणे आमचा पक्ष चव्हाट्यावर आणत असल्याने सरकारने देशभरातील काँग्रेस नेत्यांविरुद्ध राजकीय सूडबुद्धीने कारवाई सुरू केली आहे, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी पत्रकारपरिषदेत केला. मुंबईतील आदर्श गृहनिर्माण सोसायटीप्रकरणी राजकीय आकसापोटी कायदेशीर पैलुंचा विचार न करता भाजपा सरकारने सीबीआयवर दबाव आणून राज्यपालांना माझ्याविरूद्ध खटला चालविण्याची परवानगी मागण्यास भाग पाडले, असा आरोपही चव्हाण यांनी केला. ते म्हणाले की, या मुस्कटदाबीला काँग्रेस भीक घालणार नाही. खा. किरीट सोमय्या राजभवनचे किंवा सीबीआयचे प्रवक्ते नाहीत. तरीही ते राज्यपाल काय निर्णय घेणार किंवा सीबीआय काय कारवाई करणार, याचे सूतोवाच करीत राहतात. याचाच अर्थ विरोधकांवर काय कारवाई करायची, याची योजना भाजपच्या स्तरावर आखली जात असून, ती कारवाई तडीस नेण्यासाठी सीबीआयसारख्या स्वायत्त संस्थांचा गैरवापर सुरू असल्याची शंका येते, असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले. विरोधी पक्षातील नेत्यांवर बिनबुडाच्या आरोपांखाली कारवाई करणारे हे सरकार भाजपा नेत्यांच्या गैरव्यवहाराबद्दल मात्र चकार शब्द काढत नाही. भाजपा नेत्यांवरील आरोपांची चौकशीही केली जात नाही. यातून भाजपाची दुटप्पी भूमिका स्पष्ट होते, असा पलटवार खा. चव्हाण यांनी केला. आदर्श गृहनिर्माण संस्था प्रकरणामध्ये आपले नाव आरोपपत्रातून वगळण्यासंदर्भात एक याचिका सर्वोच्च न्यायालयात विचाराधीन आहे. याबाबत सीबीआय व राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाचे नोटीससुद्धा दिलेली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. (विशेष प्रतिनिधी)कर्जमाफीच द्यासरकारने शेतक-यांसाठी अनेक पॅकेज जाहीर केले. परंतु, या पॅकेजनंतरही शेतकरी आत्महत्यांचे चिंताजनक प्रमाण कमी झालेले नाही. याचाच अर्थ सरकारच्या पॅकेजमुळे शेतक-यांचे नैराश्य कमी झालेले नाही, असा आरोपही त्यांनी केला.मनरेगाची दशकपूर्ती : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) २ फेब्रुवारी २००६ रोजी लागू झाली होती त्या घटनेला येत्या २ तारखेला १० वर्ष पूर्ण होत आहेत. या महत्वाकांक्षी योजनेची दशकपूर्ती साजरी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने २ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता संत एकनाथ रंगमंदिर सिडको, औरंगाबाद येथे राज्यस्तरीय चर्चासत्र होणार असल्याची माहिती खा. चव्हाण यांनी दिली.