शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
3
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
4
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
5
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
6
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
7
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
8
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
9
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
10
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
11
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
12
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
13
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
14
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
15
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
16
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
17
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
18
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
19
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
20
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन

आंब्याबाबत दिशाभूल करणाऱ्यांवर कारवाई

By admin | Updated: March 27, 2017 04:12 IST

आंब्याची वाढ, पिकवणे, रंग यासंदर्भात काही कंपन्यांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. त्याच्या मुळाशी जावून

पुणे : आंब्याची वाढ, पिकवणे, रंग यासंदर्भात काही कंपन्यांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. त्याच्या मुळाशी जावून संबंधित कंपन्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी दिला.कृषी पणन मंडळातर्फे मुख्यालयाबाहेर थेट शेतकरी ते ग्राहक आंबा महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी ते म्हणाले, हंगाम सुरू झाल्यानंतर दरवर्षी आंंबा पिकविण्याचा मुद्दा ऐरणीवर येतो. आंबा पिकविण्यासाठी विविध कंपन्यांची उत्पादने उपलब्ध आहेत. आंब्याला रंग आणणे, आकार वाढविणे यासाठीही काही कंपन्यांकडून जाहिरातबाजी केली जाते. त्यावर कृषी विभागाचे सातत्याने नियंत्रण असते. काही कंपन्यांकडून शेतकऱ्यांना चुकीची माहिती देवून दिशाभूल केली जाते. रसायनचा अंश असलेला आंबा ग्राहकांपर्यंत जाण्यामध्ये थेट शेतकरी किंवा व्यापाऱ्यांचा दोष नाही. तर मूळ कंपन्यांकडून चुकीचे मार्गदर्शन केले जाते. त्यांच्यावर कारवाई केली जाईल. (प्रतिनिधी)यंदा सुमारे दीड लाख हेक्टरवर आंबा क्षेत्र असून साडेचार हजार मेट्रिक टन उत्पादन अपेक्षित आहे. राज्यात तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. यासंदर्भात कृषी विभागाचा अंदाज १० लाख मेट्रिक टन एवढा होता. मात्र, त्यापेक्षा अधिक उत्पादन अपेक्षित आहे. शेतमलाला चांगला भाव मिळावा यासाठी राज्यभर आंब्यासह काजू, बेदाणा आदी शेतमालाचे महोत्सव भरविण्याचे प्रयत्न पणन मंडळाकडून सुरु आहेत, असे देशमुख यांनी सांगितले.