शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
2
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
3
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
4
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
5
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
6
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
7
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
9
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
10
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
11
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
12
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
13
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
14
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
15
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
16
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
17
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
18
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
19
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
20
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम

प्रदूषण वाढल्यास सीईओंवर कारवाई

By admin | Updated: March 23, 2017 23:52 IST

राज्यातील सात सर्वाधिक प्रदूषित एमआयडीसींमध्ये प्रदूषण नियंत्रणाचे काम राज्य शासन स्वत: हाती घेईल. त्यानंतरही प्रदूषणाची

मुंबई : राज्यातील सात सर्वाधिक प्रदूषित एमआयडीसींमध्ये प्रदूषण नियंत्रणाचे काम राज्य शासन स्वत: हाती घेईल. त्यानंतरही प्रदूषणाची पातळी वाढली तर संबंधित एमआयडीसीच्या मुख्याधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज विधानसभेत सांगितले. अतुल भातखळकर आदींनी राज्यातील औद्योगिक प्रदूषणासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. शहरांमधील वायुप्रदूषण रोखण्यासाठी सरकार काय पाऊल उचलत आहे, असा प्रश्न करून त्यांनी प्रदूषण नियंत्रणाचे प्रभावी काम करणाऱ्या संस्था, कंपन्यांना कार्बन क्रेडिट द्यावे, अशी सूचनाही केली. प्रदूषण नियंत्रणाचा कृती आराखडा लवकरात लवकर अंमलात आणण्यात येईल, असे पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी सांगितले. अतुल सावे यांनी औरंगाबाद येथील डिस्टिलरीजच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे याकडे लक्ष वेधले. या कारखान्यांविरुद्ध आठ दिवसांच्या आत कारवाई करण्याचे आश्वासन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले. वीटभट्ट्यांमार्फत होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी धोरण तयार करण्यात आले असून, त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन कदम यांनी दिले.