शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
4
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
5
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
6
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
7
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
8
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
9
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
10
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
11
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
12
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
13
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
14
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
15
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
16
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
17
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
18
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
19
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
20
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!

परीक्षा संपल्यावर आरोपींवर कारवाई

By admin | Updated: March 14, 2017 04:41 IST

बारावीची परीक्षा सुरू झाल्यापासून चार पेपर व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाले. त्यातच व्हॉट्सअ‍ॅपवर पेपर व्हायरल करणाऱ्यांना ताब्यात घेऊनही कारवाई न झाल्याने बोर्डावर टीका होत आहे

मुंबई : बारावीची परीक्षा सुरू झाल्यापासून चार पेपर व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाले. त्यातच व्हॉट्सअ‍ॅपवर पेपर व्हायरल करणाऱ्यांना ताब्यात घेऊनही कारवाई न झाल्याने बोर्डावर टीका होत आहे. त्यामुळे संबंधितांवर परीक्षा संपल्यावर कारवाई करणार असल्याचे बोर्डाने जाहीर केले. बारावीचे पेपर परीक्षेच्या वेळेआधी व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल करणाऱ्या गय केली जाणार नाही, अशी भूमिका बोर्डाने स्पष्ट केली आहे. पण बारावीची परीक्षा सुरू झाल्यापासून मुंबई विभागातून चार पेपर व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. आतापर्यंत मराठी, एसपी, गणित आणि बुक किपिंगचा पेपर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी वाशी आणि कांदिवली पोलीस ठाण्यात बोर्डाने तक्रार दाखल केली आहे. सायबर सेलनेही विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापक, शिक्षक आणि लिपिकाला अटक केली आहे. पोलिसांचा अहवाल आल्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. पण परीक्षांमध्ये अडथळा येऊ नये म्हणून सध्या कारवाई केलेली नाही. परीक्षा संपल्यावर कारवाई करण्यात येईल, असे मुंबई विभागीय मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी सांगितले. (प्रतिनिधी)