शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

बेवारस दिव्यांगांच्या आजीवन आश्रयासाठी लवकरच कायदा : सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले

By admin | Updated: April 30, 2017 13:22 IST

मतीमंद, दिव्यांग मुले-मुली वयात आल्यानंतरही त्यांचा कायद्याने सांभाळ करता यावा व त्यांना आश्रय मिळावा, यासाठी कायदा करण्यात येईल, अशी घोषणा सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केली.

 जळगाव,दि.30- मतीमंद, दिव्यांग आणि प्रज्ञाचक्षू मुले-मुली ही वयात आल्यानंतरही त्यांचा कायद्याने सांभाळ करता यावा व त्यांना सामाजिक सुरक्षितता मिळून आश्रय मिळावा, यासाठी लवकरच कायदा करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी रविवारी जळगावात केली. या वेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर हेदेखील उपस्थित होते. त्यांनीही असे प्रस्ताव सर्व राज्यातून येण्यासाठी प्रयत्न केली जातील, अशी ग्वाही दिली. 

20 वषार्पूर्वी शिर्डी येथे बेवारस स्थितीत सापडलेल्या व अमरावती जिल्ह्यातील वङझर येथील स्व.अंबादासपंत वैद्य, दिव्यांग, बेवारस बालगृहात समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांच्या देखरेखीत वाढलेली 20 वी मानसकन्या मंगल या  मुकबधीर मुलीच्या विवाहासाठी ते जळगावात आले होते. सकाळी शहरातील पद्मालय विश्रामगृह येथे  बडोले यांच्यासह हंसराज अहिर यांनी उपवरांना आशीर्वाद दिले. त्या वेळी ते बोलत होते. 
समाजातील बेवारस मतीमंद, दिव्यांग आणि प्रज्ञाचक्षू मुले मुली अल्पवयीन असताना त्यांचा बालसुधारगृह अथवा संस्थांमध्ये सांभाळ केला जातो, मात्र ती 18 वर्षाची झाली तर त्यांचा कायद्यानुसार सांभाळ करता येत नसल्याने ते वाईट मार्गाला लागतात अथवा त्यांचे हाल होतात.  त्यांना सुरक्षित जगण्यासाठी किंवा पोषण व निवासासाठी सरकारी योजना नाहीत. ती सुरू करायला हवी हा उद्देश डोळ्य़ापुढे ठेवून खास हा मंगल विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. त्या माध्यमातून अशा मुलांना आश्रय मिळण्यासाठी कायद्याने तरतूद व्हावी, अशी अपेक्षा शंकरबाबा पापळकर यांची असून यासाठी जळगावातील रोटरी क्लब जळगाव वेस्टनेही पुढाकार घेतला आहे.  
हा प्रश्न लक्षात घेऊन शंकरबाबा पापळकर यांच्यासह रोटरी क्लबच्यावतीने राजकुमार बडोले यांना निवेदन देण्यात आले. त्याला उत्तर देताना त्यांनी वरील घोषणा केली. सोबतच अशा मुलांच्या सांभाळासह त्यांच्या लग्नासाठी रोटरीप्रमाणे राज्यातील इतर संस्थांनीही पुढे आले पाहिजे असे सांगून रोटरी क्लब जळगाव वेस्टच्या या कार्याचे कौतुक केले. 
इतर राज्यांनीही पुढाकार घ्यावा
हंसराज अहिर यांनी या विषयी बोलताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच अपंगांसाठी ‘दिव्यांग’ शब्द लागू केला असून अशा मुलांच्या सांभाळासाठी प्रत्येक राज्याकडून प्रस्ताव मागविले जातील. बडोले यांच्याकडे हे खाते असून महाराष्ट्रात हा कायदा लागू होण्यासाठी त्यांनी तत्काळ प्रस्ताव पाठविल्यास केंद्राकडूनही सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली.