शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यातील डाळींना देशभरातून मागणी

By admin | Updated: April 15, 2017 00:06 IST

अकोला- अकोल्यात डाळ उद्योग सुरू असून दिल्ली, कोलकाता, राजस्थान, हैद्राबादसह महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यातून अकोल्यातील डाळींना मागणी वाढली आहे.

अकोला : अकोल्यातील डाळीला देशभरातील विविध राज्यातून प्रचंड मागणी आहे. वऱ्हाड परिसरात तुरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतल्या जात असल्याने, अकोल्यातील औद्योगिक वसाहतीत गत अनेक वर्षांपासून डाळ उद्योगाचा विस्तार झाला. शेकडोंच्या संख्येत अकोल्यात डाळ उद्योग सुरू असून दिल्ली, कोलकाता, राजस्थान, हैद्राबाद, यासह नागपूर आणि महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यातून अकोल्यातील डाळींना मागणी वाढली आहे. राज्याबाहेरील अनेक व्यापाऱ्यांनी हजारो टन डाळीची बुंकिग अकोल्याच्या व्यापाऱ्यांकडे केल्याची माहिती आहे. एकीकडे वऱ्हाडात शेतकऱ्यांच्या तुरीला योग्य भाव आणि खरेदीदार नाही. नाफेडच्या खरेदी धोरणातील दिरंगाईमुळे कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात तूर घेऊन शेकडो शेतकरी माल विक्रीसाठी रांगेत लागले आहे. तर दुसरीकडे दिल्ली, राजस्थान आणि गुजरात राज्यातून अकोल्यातील तूर डाळीला प्रचंड मागणी वाढली आहे. अकोल्यातील औद्योगिक वसाहतीमधून दररोज हजारो टन डाळ देशभरात पाठविली जात आहे. विशेष म्हणजे देशासह अकोल्यातील डाळीला विदेशातही मोठी मागणी कायम असते. मध्यंतरी तुरीच्या इतर डाळींचे दर वधारल्याने सर्वसामान्य जनतेची ओरड सुरू झाली होती. त्यामुळे केंद्र शासनाने विदेशातून मोठ्या प्रमाणात डाळ आयात केली. त्यावरील इम्पोर्ट ड्युटीही लावली नाही. बाहेरून आलेला डाळीचा साठा आणि निसर्गाच्या कृपेने आलेले चांगले पीक यामुळे डाळीचे उत्पादन चांगले झाले. त्यामुळे तुरीला चांगले भाव मिळेल ही अपेक्षा होती; मात्र ती फोल ठरली आहे. अकोल्यातील डाळ देशभरात जाते. त्यामुळे येथील औद्योगिक वसाहतीमधील डाळ उद्योग हा महत्वाचाआहे, मात्र शासनाच्या काही धोरणांमुळे कधीकाळी तीनशेच्या वर डाळ प्रक्रिया उद्योग असणाऱ्या अकोल्यात आता केवळ १४० डाळ उद्योग शिल्लक राहिले आहे.- मधू चांडक, माजी उपाध्यक्ष, अकोला दाल मिल असोसिएशन.डाळीच्या निर्यातीवरील बंदी केंद्राने उठविली तर शेतकऱ्यांच्या तुरीला चांगला भाव मिळेल. सोबतच डाळ प्रक्रिया उद्योगही तेजीत येईल. शासनाच्या या धोरणामुळे महागाई आटोक्यात तर येणार नाही. उलटपक्षी शेतकऱ्यांचे आणि उद्योजकांचे नुकसान होईल.- वसंत बाछुका, विदर्भ चेबर्स आॅफ कॉमर्सचे सदस्य, अकोला.