शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

आरोपी सुटले तर उपोषण करेन

By admin | Updated: September 8, 2016 02:56 IST

कोणीही उठतो आणि वर्दीवर हात टाकतो. पोलिसांच्या वर्दीला काही किंमत आहे की नाही? जर उद्या माझ्या मुलाचे काही बरेवाईट झाले

आकाश गायकवाड,  डोंबिवलीकोणीही उठतो आणि वर्दीवर हात टाकतो. पोलिसांच्या वर्दीला काही किंमत आहे की नाही? जर उद्या माझ्या मुलाचे काही बरेवाईट झाले, तर त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, अशा शब्दांत कल्याणमधील पोलीस उपनिरीक्षक नितीन डगळे यांची आई सत्यभामा डगळे यांनी आपल्या संतापाला ‘लोकमत’कडे वाट मोकळी करून दिली. आपल्या मुलावर हात उगारणाऱ्यांना राजकीय दबावापोटी कठोर शिक्षा झाली नाही, तर आमरण उपोषण करण्याचा इशाराही या माऊलीने दिला आहे.मंगळवारी रात्री अत्यंत किरकोळ वादावादीनंतर नितीन यांना कल्याण पूर्वेतील जरीमरी मित्र मंडळाच्या चार कार्यकर्त्यांनी विसर्जन तलावात बुडवून मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना घडल्यानंतर पहाटे नितीन घरी परतले, पण त्यांनी घरातील कोणालाही काही सांगितले नाही. सकाळी जेव्हा त्या हल्ल्याची चित्रफीत सर्व वाहिन्यांवर दिसू लागली, तेव्हा नितीनची विचारपूस करण्यासाठी शेजारीपाजारी येऊ लागले, फोन वाजू लागले, तेव्हा आमचा मुलगा कोणत्या प्रसंगातून काल गेला, ते आम्हाला कळले, असे सत्यभामा म्हणाल्या. कायद्याचा वचक राहिला नाही. कोणीही उठतो आणि पोलिसांवर हल्ले करतो. पोलीस हे जनतेचे रक्षक आहेत. जर त्यांच्यावरच असे जीवघेणे हल्ले झाले, तर सामान्य नागरिकांनी न्याय कोणाकडे मागायचा, असा संतप्त सवालही त्यांनी केला. मुलावर ओढवलेला प्रसंग पाहिला आणि अलीकडेच मारहाणीत मरण पावलेले पोलीस हवालदार विलास शिंदे यांची आठवण झाली. माझा मुलगा नितीन वेळीच त्या हल्लेखोरांच्या तावडीतून सुटला नसता तर कदाचित आमच्यावर मोठा दु:खद प्रसंग ओढवला असता, असेही त्या म्हणाल्या. वडील धोंडू डगळे म्हणाले की, राजकीय दबाव आणि हस्तक्षेपाने अशा प्रकरणांमधील आरोपी शेफारले आहेत. आमचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर विश्वास असून माझ्या मुलाला योग्य न्याय मिळेल, असे वाटते. त्या हल्ल्यातून वाचल्यानंतर नितीन यांनी सर्वप्रथम आपल्या घरी फोन करून पत्नीकडे मुलाची चौकशी केली. आई हृदयविकाराने आजारी असल्याने तिला काही कळणार नाही, याची खबरदारी घेण्याची सूचना केली. त्यानंतर, ते पोलीस स्टेशनमध्ये गेले. ही माहिती देऊन नितीन यांची पत्नी नम्रता म्हणाल्या की,पोलिसांवरील हल्ले वाढले आहेत, त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाची? आज माझ्या नवऱ्याला काही झाले असते तर माझी दोन मुले अर्णव आणि मानस यांचे संगोपन मी कसे केले असते?