शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

आरोपी सुटले तर उपोषण करेन

By admin | Updated: September 8, 2016 02:56 IST

कोणीही उठतो आणि वर्दीवर हात टाकतो. पोलिसांच्या वर्दीला काही किंमत आहे की नाही? जर उद्या माझ्या मुलाचे काही बरेवाईट झाले

आकाश गायकवाड,  डोंबिवलीकोणीही उठतो आणि वर्दीवर हात टाकतो. पोलिसांच्या वर्दीला काही किंमत आहे की नाही? जर उद्या माझ्या मुलाचे काही बरेवाईट झाले, तर त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, अशा शब्दांत कल्याणमधील पोलीस उपनिरीक्षक नितीन डगळे यांची आई सत्यभामा डगळे यांनी आपल्या संतापाला ‘लोकमत’कडे वाट मोकळी करून दिली. आपल्या मुलावर हात उगारणाऱ्यांना राजकीय दबावापोटी कठोर शिक्षा झाली नाही, तर आमरण उपोषण करण्याचा इशाराही या माऊलीने दिला आहे.मंगळवारी रात्री अत्यंत किरकोळ वादावादीनंतर नितीन यांना कल्याण पूर्वेतील जरीमरी मित्र मंडळाच्या चार कार्यकर्त्यांनी विसर्जन तलावात बुडवून मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना घडल्यानंतर पहाटे नितीन घरी परतले, पण त्यांनी घरातील कोणालाही काही सांगितले नाही. सकाळी जेव्हा त्या हल्ल्याची चित्रफीत सर्व वाहिन्यांवर दिसू लागली, तेव्हा नितीनची विचारपूस करण्यासाठी शेजारीपाजारी येऊ लागले, फोन वाजू लागले, तेव्हा आमचा मुलगा कोणत्या प्रसंगातून काल गेला, ते आम्हाला कळले, असे सत्यभामा म्हणाल्या. कायद्याचा वचक राहिला नाही. कोणीही उठतो आणि पोलिसांवर हल्ले करतो. पोलीस हे जनतेचे रक्षक आहेत. जर त्यांच्यावरच असे जीवघेणे हल्ले झाले, तर सामान्य नागरिकांनी न्याय कोणाकडे मागायचा, असा संतप्त सवालही त्यांनी केला. मुलावर ओढवलेला प्रसंग पाहिला आणि अलीकडेच मारहाणीत मरण पावलेले पोलीस हवालदार विलास शिंदे यांची आठवण झाली. माझा मुलगा नितीन वेळीच त्या हल्लेखोरांच्या तावडीतून सुटला नसता तर कदाचित आमच्यावर मोठा दु:खद प्रसंग ओढवला असता, असेही त्या म्हणाल्या. वडील धोंडू डगळे म्हणाले की, राजकीय दबाव आणि हस्तक्षेपाने अशा प्रकरणांमधील आरोपी शेफारले आहेत. आमचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर विश्वास असून माझ्या मुलाला योग्य न्याय मिळेल, असे वाटते. त्या हल्ल्यातून वाचल्यानंतर नितीन यांनी सर्वप्रथम आपल्या घरी फोन करून पत्नीकडे मुलाची चौकशी केली. आई हृदयविकाराने आजारी असल्याने तिला काही कळणार नाही, याची खबरदारी घेण्याची सूचना केली. त्यानंतर, ते पोलीस स्टेशनमध्ये गेले. ही माहिती देऊन नितीन यांची पत्नी नम्रता म्हणाल्या की,पोलिसांवरील हल्ले वाढले आहेत, त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाची? आज माझ्या नवऱ्याला काही झाले असते तर माझी दोन मुले अर्णव आणि मानस यांचे संगोपन मी कसे केले असते?