शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

खुनातील फरार आरोपीला अटक

By admin | Updated: December 26, 2015 01:05 IST

दिवा गावातील बाळाराम म्हात्रे (४५) यांच्या तब्बल २५ वर्षांपूर्वी झालेल्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशातील औराव गावचा माजी सरपंच अनिल रामसागर चौबे याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग

ठाणे : दिवा गावातील बाळाराम म्हात्रे (४५) यांच्या तब्बल २५ वर्षांपूर्वी झालेल्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशातील औराव गावचा माजी सरपंच अनिल रामसागर चौबे याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग युनिट-१ने अटक केली आहे. न्यायालयाने त्याला ४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली असून, त्याच्या आणखी एका साथीदाराला पकडण्यासाठी तीन पथके उत्तर प्रदेशमध्ये पाठविल्याची माहिती पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली. १६ मार्च १९९० रोजी साबागाव, दिवा येथे बाळाराम हे घरात झोपलेले असतांना त्यांचा अंगरक्षक विजयसिंह आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्या डोक्यात गोळी झाडून हत्या केली होती. त्या वेळी संशयावरून तिघांना अटक केली होती. मात्र, मुख्य हल्लेखोर पोलिसांना मिळालेच नव्हते. ठोस पुराव्याअभावी अटकेतील तिघेही निर्दोष सुटले होते. तपास अपुराच राहिल्याने गुन्ह्याची उकल झाली नव्हती. यातील हल्लेखोरांबाबत एक महत्त्वाचा दुवा वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाच्या हाती लागला. विजयसिंह हाच अनिल चौबे असून त्याच्यावर जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच उत्तर प्रदेशमध्ये माजी सरपंच असल्याने त्याचे मोठे राजकीय वजनही असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच आधारे ठाकरे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, हवालदार आनंदा भिलारे, सुनील जाधव, शिवाजी गायकवाड आणि सुभाष मोरे आदींनी चौबेला अटक केली. सुभाष भोईरांचीही चौकशीबाळाराम म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी त्या वेळी त्यांच्या कुटुंबीयांच्या संशयावरून शिवसेनेचे विद्यमान आमदार सुभाष भोईर यांच्यासह तिघांना अटक केली होती. पुन्हा भोईरांचीही चौकशी केली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.असे घडले सूडनाट्य...मुंब्रा येथील शिवसेनेचे नगरसेवक सुधीर भगत यांचे वडील रामचंद्र भगत उर्फ पिंट्यादादा आणि गोवर्धन म्हात्रे उर्फ गौऱ्यादादा या दोन मित्रांमध्ये जमिनीच्या वादातून १९८०मध्ये शत्रुत्व निर्माण झाले. त्यातूनच नौपाड्यातील आराधना सिनेमागृहात भरदिवसा पिंट्यादादाने त्याच्या साथीदारांच्या मदतीने गौऱ्यावर वार करून त्याचा खून केला होता. गौऱ्याचा भाऊ बाळाराम म्हात्रेने दाऊद टोळीतील शूटर महंमद काल्या आणि काही साथीदारांच्या मदतीने पिंट्यावर १९८३मध्ये गोळीबार करून त्याचा खून केला. बाळाराम आणि पिंट्याचे समर्थक यांच्यात एकमेकांचा काटा काढण्यासाठी त्यानंतर सुमारे सात वर्षे हल्ले-प्रतिहल्ले झाले. १९९०मध्ये बाळारामचाही खून झाला आणि सूडनाट्याला पूर्णविराम मिळाला. बाळारामच्या खुनाचा मात्र अद्याप छडा लागलेला नव्हता.