शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

खुनातील फरार आरोपीला अटक

By admin | Updated: December 26, 2015 01:05 IST

दिवा गावातील बाळाराम म्हात्रे (४५) यांच्या तब्बल २५ वर्षांपूर्वी झालेल्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशातील औराव गावचा माजी सरपंच अनिल रामसागर चौबे याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग

ठाणे : दिवा गावातील बाळाराम म्हात्रे (४५) यांच्या तब्बल २५ वर्षांपूर्वी झालेल्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशातील औराव गावचा माजी सरपंच अनिल रामसागर चौबे याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग युनिट-१ने अटक केली आहे. न्यायालयाने त्याला ४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली असून, त्याच्या आणखी एका साथीदाराला पकडण्यासाठी तीन पथके उत्तर प्रदेशमध्ये पाठविल्याची माहिती पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली. १६ मार्च १९९० रोजी साबागाव, दिवा येथे बाळाराम हे घरात झोपलेले असतांना त्यांचा अंगरक्षक विजयसिंह आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्या डोक्यात गोळी झाडून हत्या केली होती. त्या वेळी संशयावरून तिघांना अटक केली होती. मात्र, मुख्य हल्लेखोर पोलिसांना मिळालेच नव्हते. ठोस पुराव्याअभावी अटकेतील तिघेही निर्दोष सुटले होते. तपास अपुराच राहिल्याने गुन्ह्याची उकल झाली नव्हती. यातील हल्लेखोरांबाबत एक महत्त्वाचा दुवा वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाच्या हाती लागला. विजयसिंह हाच अनिल चौबे असून त्याच्यावर जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच उत्तर प्रदेशमध्ये माजी सरपंच असल्याने त्याचे मोठे राजकीय वजनही असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच आधारे ठाकरे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, हवालदार आनंदा भिलारे, सुनील जाधव, शिवाजी गायकवाड आणि सुभाष मोरे आदींनी चौबेला अटक केली. सुभाष भोईरांचीही चौकशीबाळाराम म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी त्या वेळी त्यांच्या कुटुंबीयांच्या संशयावरून शिवसेनेचे विद्यमान आमदार सुभाष भोईर यांच्यासह तिघांना अटक केली होती. पुन्हा भोईरांचीही चौकशी केली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.असे घडले सूडनाट्य...मुंब्रा येथील शिवसेनेचे नगरसेवक सुधीर भगत यांचे वडील रामचंद्र भगत उर्फ पिंट्यादादा आणि गोवर्धन म्हात्रे उर्फ गौऱ्यादादा या दोन मित्रांमध्ये जमिनीच्या वादातून १९८०मध्ये शत्रुत्व निर्माण झाले. त्यातूनच नौपाड्यातील आराधना सिनेमागृहात भरदिवसा पिंट्यादादाने त्याच्या साथीदारांच्या मदतीने गौऱ्यावर वार करून त्याचा खून केला होता. गौऱ्याचा भाऊ बाळाराम म्हात्रेने दाऊद टोळीतील शूटर महंमद काल्या आणि काही साथीदारांच्या मदतीने पिंट्यावर १९८३मध्ये गोळीबार करून त्याचा खून केला. बाळाराम आणि पिंट्याचे समर्थक यांच्यात एकमेकांचा काटा काढण्यासाठी त्यानंतर सुमारे सात वर्षे हल्ले-प्रतिहल्ले झाले. १९९०मध्ये बाळारामचाही खून झाला आणि सूडनाट्याला पूर्णविराम मिळाला. बाळारामच्या खुनाचा मात्र अद्याप छडा लागलेला नव्हता.