शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

अजित पवार यांच्यासह ७६ जणांवर आरोप

By admin | Updated: September 16, 2015 00:09 IST

राज्य सहकारी बँकेमध्ये झालेल्या तब्बल १ हजार ८६ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ७६ जणांना दोषारोपपत्र पाठविण्यात आले असून, यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार

नवी मुंबई : राज्य सहकारी बँकेमध्ये झालेल्या तब्बल १ हजार ८६ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ७६ जणांना दोषारोपपत्र पाठविण्यात आले असून, यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, दिलीप देशमुख, पांडुरंग फुंडकर यांच्यासह अनेक सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. २८ सप्टेंबरपासून या दोषारोपपत्रावर सुनावणी सुरू होणार आहे. संबंधितांचे आरोपांविषयी स्पष्टीकरण व पुरावे पाहून अंतिम जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये २००८ ते २०१३ या पाच वर्षांमध्ये तत्कालीन संचालक मंडळाने साखर कारखाने व सूत गिरण्यांना नियमबाह्य कर्जवाटप करून बँक १ हजार ८६ कोटींच्या तोट्यात आणली. या अनियमिततेची दखल घेत रिझर्व्ह बँकेने तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली. तर या आर्थिक अनियमिततेची चौकशी करण्यासाठी शासनाने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शिवाजी पहिनकर यांची जून २०१४मध्ये नियुक्ती केली होती.पहिनकर यांनी तब्बल १५ महिने सर्व व्यवहारांची चौकशी केली. साखर कारखाने व इतर अनेक सहकारी संस्थांना झालेले विनातारण कर्जवाटप आणि नियम डावलून घेण्यात आलेले निर्णय, चौकशीअंती समोर आले. यावर संचालक मंडळाच्या बैठकीत आमच्यापुढे जी विषयपत्रिका आली त्यावर आम्ही निर्णय घेतले, असे स्पष्टीकरण दिले गेले; परंतु ते ग्राह्य धरण्यात आले नाही. यामुळे पहिनकर यांनी तत्कालीन संचालक आणि अधिकाऱ्यांसह ७६ जणांवर १४१ पानांचे दोषारोप निश्चित केले आहेत. १० सप्टेंबरला हे दोषारोपपत्र सर्व संचालकांना पाठविण्यात आले आहे. आरोपांविषयी स्पष्टीकरण देण्यासाठी २८ सप्टेंबरपासून सुनावणी सुरू होणार आहे. सर्व ७७ जणांना त्यांच्यावरील आरोपांविषयी स्पष्टीकरण व पुरावे देण्याची संधी दिली जाणार आहे. त्यांनी दिलेल्या पुराव्यानंतर अंतिम जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. ज्यांच्यावर अंतिम जबाबदारी निश्चित होईल त्यांच्याकडून नुकसान झालेली रक्कम वसूल करण्याची कारवाई करण्यात येईल. मिळालेल्या माहितीप्रमाणे, या सुनावणीसाठी ६ महिने ते १ वर्षाचा कालावधी लागू शकतो. सद्य:स्थितीमध्ये तर सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या अडचणी वाढल्या असून, ते आरोपांमधून बाहेर पडण्यासाठी काय पुरावे देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)यांच्यावर आहेत आरोपराष्ट्रवादी : अजित पवार, विजयसिंह मोहिते : पाटील, दिलीप सोपाल, अमरसिंह पंडित, माणिकराव पाटील, ईश्वरलाल जैन, राजेंद्र जैन, यशवंतराव गडाख, हसन मुश्रीफ, राजवर्धन कदमबांडे, राजेंद्र शिंगणे, गुलाबराव शेळकेकाँग्रेस : मदन पाटील, दिलीपराव देशमुख, विजय वडेट्टिवार, माणिकराव कोकाटे, रामप्रसाद बोर्डिकर, रजनी पाटील, जयवंतराव आवाळे, मधुकर चव्हाणशिवसेना : आनंदराव अडसूळभाजपा : पांडुरंग फुंडकरशेकाप : जयंत पाटील, मीनाक्षी पाटील