शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

अजित पवार यांच्यासह ७६ जणांवर आरोप

By admin | Updated: September 16, 2015 00:09 IST

राज्य सहकारी बँकेमध्ये झालेल्या तब्बल १ हजार ८६ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ७६ जणांना दोषारोपपत्र पाठविण्यात आले असून, यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार

नवी मुंबई : राज्य सहकारी बँकेमध्ये झालेल्या तब्बल १ हजार ८६ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ७६ जणांना दोषारोपपत्र पाठविण्यात आले असून, यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, दिलीप देशमुख, पांडुरंग फुंडकर यांच्यासह अनेक सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. २८ सप्टेंबरपासून या दोषारोपपत्रावर सुनावणी सुरू होणार आहे. संबंधितांचे आरोपांविषयी स्पष्टीकरण व पुरावे पाहून अंतिम जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये २००८ ते २०१३ या पाच वर्षांमध्ये तत्कालीन संचालक मंडळाने साखर कारखाने व सूत गिरण्यांना नियमबाह्य कर्जवाटप करून बँक १ हजार ८६ कोटींच्या तोट्यात आणली. या अनियमिततेची दखल घेत रिझर्व्ह बँकेने तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली. तर या आर्थिक अनियमिततेची चौकशी करण्यासाठी शासनाने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शिवाजी पहिनकर यांची जून २०१४मध्ये नियुक्ती केली होती.पहिनकर यांनी तब्बल १५ महिने सर्व व्यवहारांची चौकशी केली. साखर कारखाने व इतर अनेक सहकारी संस्थांना झालेले विनातारण कर्जवाटप आणि नियम डावलून घेण्यात आलेले निर्णय, चौकशीअंती समोर आले. यावर संचालक मंडळाच्या बैठकीत आमच्यापुढे जी विषयपत्रिका आली त्यावर आम्ही निर्णय घेतले, असे स्पष्टीकरण दिले गेले; परंतु ते ग्राह्य धरण्यात आले नाही. यामुळे पहिनकर यांनी तत्कालीन संचालक आणि अधिकाऱ्यांसह ७६ जणांवर १४१ पानांचे दोषारोप निश्चित केले आहेत. १० सप्टेंबरला हे दोषारोपपत्र सर्व संचालकांना पाठविण्यात आले आहे. आरोपांविषयी स्पष्टीकरण देण्यासाठी २८ सप्टेंबरपासून सुनावणी सुरू होणार आहे. सर्व ७७ जणांना त्यांच्यावरील आरोपांविषयी स्पष्टीकरण व पुरावे देण्याची संधी दिली जाणार आहे. त्यांनी दिलेल्या पुराव्यानंतर अंतिम जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. ज्यांच्यावर अंतिम जबाबदारी निश्चित होईल त्यांच्याकडून नुकसान झालेली रक्कम वसूल करण्याची कारवाई करण्यात येईल. मिळालेल्या माहितीप्रमाणे, या सुनावणीसाठी ६ महिने ते १ वर्षाचा कालावधी लागू शकतो. सद्य:स्थितीमध्ये तर सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या अडचणी वाढल्या असून, ते आरोपांमधून बाहेर पडण्यासाठी काय पुरावे देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)यांच्यावर आहेत आरोपराष्ट्रवादी : अजित पवार, विजयसिंह मोहिते : पाटील, दिलीप सोपाल, अमरसिंह पंडित, माणिकराव पाटील, ईश्वरलाल जैन, राजेंद्र जैन, यशवंतराव गडाख, हसन मुश्रीफ, राजवर्धन कदमबांडे, राजेंद्र शिंगणे, गुलाबराव शेळकेकाँग्रेस : मदन पाटील, दिलीपराव देशमुख, विजय वडेट्टिवार, माणिकराव कोकाटे, रामप्रसाद बोर्डिकर, रजनी पाटील, जयवंतराव आवाळे, मधुकर चव्हाणशिवसेना : आनंदराव अडसूळभाजपा : पांडुरंग फुंडकरशेकाप : जयंत पाटील, मीनाक्षी पाटील