शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

दंगल हा भाजपाचा निवडणूक ट्रेलर, पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 04:47 IST

जीएसटी व नोटाबंदीमुळे विकासाचा दर मंदावला आहे. नरेंद्र व देवेंद्र सरकार विकासाच्या मुद्यावर अपयशी ठरले आहे.

श्रीगोंदा (अहमदनगर) : जीएसटी व नोटाबंदीमुळे विकासाचा दर मंदावला आहे. नरेंद्र व देवेंद्र सरकार विकासाच्या मुद्यावर अपयशी ठरले आहे. निवडणुकीची चाहूल लागताच हिंसाचार, जातीयवाद, दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी कोरेगाव भीमाची जातीय दंगल हा भाजपाने केलेला ट्रेलर होता, असा थेट आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी श्रीगोंदा फॅक्टरी येथे बोलताना केला.राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त शेतकरी मेळावा झाला. कृषी प्रदर्शन व नागवडे साखर कारखाना प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. चव्हाण म्हणाले, पिकाला हमीभाव मिळत नसल्याने शेतक ºयांचे कंबरडे मोडले आहे. कर्जमाफी करण्यासाठी राज्य सरकारने जाचक अटी घालून शेतकºयांची कुचेष्टा केली आहे. पण उद्योगपतींना २ लाख १२ हजार कोटींची कर्जमाफी करण्यासाठी मोदी सरकारकडे पैसा कोठून येणार आहे. हा पैसा जनतेच्या खिशातून जाणार आहे. शिवाजीराव नागवडे यांनी काँग्रेसच्या विचाराचा झेंडा खांद्यावर घेऊन श्रीगोंद्यासारख्या दुष्काळी तालुक्याचे चित्र बदलण्यासाठी आयुष्य वेचले. त्यांचा आदर्श घेऊन कार्यकर्त्यांनी राजकारणात राहून सहकारी संस्था चालविण्याची गरज आहे.माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, नागवडेबापूंनी समाजाचे हित आणि कामातून आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. ते अनेक संस्थांवर काम करीत आहेत. हे त्यांच्या कर्तृत्वाचे यश आहे. शिवाजीराव नागवडे म्हणाले, राजकारणाला अडचणीच्या काळात सुरूवात केली. तत्त्व आणि निष्ठेचे राजकारण करीत असताना अनेक अडचणी आल्या, पण जिवाभावाच्या कार्यकर्त्यांनी भक्कम साथ दिली. त्यामुळे राजकारणातून समाजाचे हित साध्य करता आले, याचा आनंद आहे.