शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

आरटीईअंतर्गत प्रवेश त्रासदायक

By admin | Updated: March 3, 2017 01:23 IST

आरटीईअंतर्गत येणाऱ्या मोफत प्रवेशासाठी पालकांना नाहक त्रास होत आहे.

कोरेगाव मूळ : यावर्षीही आरटीईअंतर्गत येणाऱ्या मोफत प्रवेशासाठी पालकांना नाहक त्रास होत आहे. मदत केंद्रांमधून जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला गरजेचा असल्याचे सांगून माघारी पाठवले जात आहे. काही ठिकाणी मदत केंद्रांमध्ये मदतनीस नसल्याने वंचित घटकातील पालकांना अर्ज करता येत नाही. प्रवेशासाठी अर्ज भरताना जेव्हा पत्ता भरला जातो तेव्हा गुगल मॅपद्वारे अंतर मोजण्याचा प्रयत्न केला जातो. त्या वेळी पत्त्यानुसार घर मॅपवर दाखविले जात नाही. त्यामुळे अर्ज पुढे भरताच येत नाही. आपल्या घरापासून जवळ असलेल्या शाळा या कारणाने दिसत नाही, असे चित्र दिसून येत आहे. बालकांचा मोफत आणि सक्तीचे शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत होणाऱ्या प्रवेशप्रक्रियेसाठी शाळांची नोंदणी होत नसल्यामुळे प्रवेशप्रक्रियेला विलंब झाला होता. मात्र, आॅनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असूनही, मदत केंद्रांमध्ये अर्ज भरून न घेणे, जुना हेल्पलाइन क्रमांक, शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा नसणे आणि विभागवार नकाशा नसल्यामुळे अर्ज करण्यासाठी समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे पालकांनी सांगितले. आरटीईअंतर्गत अर्ज भरण्यासाठी पुणे जिल्हा, शहर अशा सर्व ठिकाणी शिक्षण विभागाकडून मार्गदर्शन केंद्रे जाहीर केली होती. याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर दिली आहे. त्याचबरोबर लागणारी कागदपत्रे, तसेच सर्व माहितीही संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यानुसार प्रत्येक मार्गदर्शन केंद्र, प्रत्येक जिल्हास्तरीय केंद्राचे हेल्पलाइन क्रमांक दिलेले आहेत. यंदा नवीन नियमानुसार अर्ज भरताना कोणतीही कागदपत्रे लागणार नाहीत. ती मुलांच्या प्रवेशाच्या वेळेस लागणार आहेत, असा नियम असूनही बऱ्याच ठिकाणी अर्ज भरण्यासाठी कागदपत्रे लागतील, असे सांगण्यात येते. (वार्ताहर)