शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
5
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
8
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
9
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
10
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
11
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
12
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
13
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
14
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
15
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
16
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
17
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
18
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
19
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
20
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!

स्वमग्न जगण्याचा स्वीकार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2017 01:35 IST

भारतात ६६ मुलांपैकी १ मूल स्वमग्न आहे, जगभरात हेच प्रमाण ६८ पैकी १ असे असल्याची संयुक्त राष्ट्रसंघाची आकडेवारी सांगते. २०११ च्या जनगणनेनुसार भारतात १९ वर्षाखालील ७८

मेघना ढोके, नाशिकभारतात ६६ मुलांपैकी १ मूल स्वमग्न आहे, जगभरात हेच प्रमाण ६८ पैकी १ असे असल्याची संयुक्त राष्ट्रसंघाची आकडेवारी सांगते. २०११ च्या जनगणनेनुसार भारतात १९ वर्षाखालील ७८ लाखांहून अधिक मुले दिव्यांग आहेत. मात्र या आकडेवारीच्या पलिकडे जावून विचार केला तर आजही स्वमग्नता असणाऱ्या मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे प्रश्न, समाजासह कुटुंबाने करण्याचा स्वीकार हे प्रश्न गंभीर आहेत.स्वमग्नता जागरुकता दिनानिमित्त यावर्षी संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीनेही काम करण्यात येत आहे. ‘टूवर्ड अ‍ॅटॉनॉमी अ‍ॅण्ड सेल्फ डिर्टर्मिनेशन!’ अशी ही संकल्पना आहे. स्वमग्नता असणाऱ्या मुलांना पूर्ण स्वायत्तता, स्वयंनिर्णयता आणि स्वयंपूर्णता देण्यासाठी पालकांसह शिक्षक आणि समाजाने एकत्रित काम करावे, हे या संकल्पनेत अभिप्रेत आहेच. मात्र हे सारे तेव्हाच होईल जेव्हा स्वमग्न मूलांचा पूर्ण स्वीकार पालकांनीही केला तर!विशेषत: भारतासारख्या देशात स्वमग्नता असणाऱ्या मुलांचा पूर्ण स्वीकार आणि त्यांचे पालनपोषण यासंदर्भातील अज्ञान, गैरसमजूती यासंदर्भातील प्रश्न आजही बिकट आहेत. ग्रामीण भागात माहितीचा अभाव आहे. त्यातून पालक मुलाच्या योग्य निदानापर्यंत आणि उपचारासह प्रशिक्षणापर्यंत पोहोचत नाहीत. शहरी भागात आता एक नवीन प्रश्न दिसतो आहे. अनेक पालक गुगलसह इंटरनेटवर माहिती शोधून त्यातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे स्वत:च उपचार तरी करू पाहतात किंवा योग्य निदानापर्यंत पोहोचत नाही. दोन्हीही संदर्भात मुलांचा स्वीकार, उपचार आणि स्वयंपूर्णता यासंदर्भात वेळीच काम सुरु होत नाही. आपल्या मुलाच्या आजारावर रामबाण औषध नाही पण आयुष्य जगायला आपण त्याला स्वयंनिर्भर करू शकतो यादिशेने विचार होत नाही, हे आजही आपल्या समाजातील वास्तव आहे.