शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

एसीबी चौकशीतील प्रकल्पांची कंत्राटे रद्द !

By admin | Updated: July 5, 2016 04:34 IST

राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (एसीबी) चौकशी सुरू असलेल्या कोकणातील ११ आणि विदर्भातील तीन सिंचन प्रकल्पांची कंत्राटे रद्द करण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाच्या विचाराधीन

- यदु जोशी,  मुंबई

राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (एसीबी) चौकशी सुरू असलेल्या कोकणातील ११ आणि विदर्भातील तीन सिंचन प्रकल्पांची कंत्राटे रद्द करण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाच्या विचाराधीन असून लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. या प्रकल्पांमध्ये कोंढाणे, बाळगंगा, चनेरा तसेच काळ (जि.रायगड), काळू, शाई, सुसरी (जि.ठाणे), शिरशिंगे, गडगडी, शिळ (सिंधुदुर्ग) आणि जामदा (जि.रत्नागिरी) हे कोकणातील प्रकल्प आहेत. गोदीखुर्द (जि.भंडारा), जिगाव (बुलडाणा) आणि निम्न पैनगंगा (यवतमाळ) हे विदर्भातील प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये आघाडी सरकारच्या काळात कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाल्याचा आरोप आहे. बाळगंगा आणि काळू प्रकल्पातील घोटाळ्यांसंदर्भात गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. या प्रकल्पांची सध्या देण्यात आलेली सर्व कंत्राटे रद्द करून नव्याने निविदा काढण्याचा प्रस्ताव आहे. अशा जवळपास दोनशे निविदा काढून कंत्राटे देण्यात आली होती. प्रत्येक कामाची पाहणी करून त्यात काही जास्तीत जास्त गडबडी झालेली कामे रद्द करण्याचाही प्रस्ताव होता. मात्र, आता ती सर्वच रद्द करून पारदर्शकतेच्या दृष्टीने नव्याने निविदा काढण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसे झाल्यास जवळपास चार हजार कोटी रुपयांच्या कामांच्या निविदा नव्याने काढाव्या लागणार आहेत. एसीबीच्या चौकशीमध्ये अडकलेल्या या प्रकल्पांची कामे सध्या बंद आहेत. सध्याच्या कंत्राटदारांकडील कामे कायम ठेवली तर आघाडी सरकारची री ओढल्यासारखे आणि त्या काळातील कंत्राटदारांना सध्याच्या सरकारने पाठीशी घातल्यासारखे होईल. त्यामुळेदेखील नव्याने निविदा काढण्यावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. पालिकांना पाण्याच्या पुनर्वापराची सक्ती- राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि उद्योगांना जलसंपदा विभागाकडून पुरविण्यात येत असलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी प्रक्रिया प्रकल्प उभारणे आता अनिवार्य करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. - महापालिका, नगरपालिका व उद्योगांकडून दरवर्षी १६० टीएमसी सांडपाणी तयार होते व ते नद्यांमध्ये सोडले जाते. आता त्यांनी पुढील पाच वर्षांत मलनिस्सारण प्रकल्प तयार केला नाही तर त्यांच्या पाणीपुरवठ्यात २५ टक्के कपात करण्यात येईल. - प्रक्रिया केलेले पाणी विकण्याची त्यांना परवानगी असेल. पालिकांना पुरविण्यात येणाऱ्या पाण्याच्या ८५ टक्के पाण्यावर तर उद्योगांना पुरविण्यात येत असलेल्या पाण्यापैकी ९५ टक्के पाण्यावर प्रक्रिया करणे शक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.