शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

अटक सत्तेच्या गैरवापरातून

By admin | Updated: May 10, 2016 03:10 IST

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना झालेली अटक सत्तेच्या गैरवापरातूनच झाल्याचे दिसत आहे, असा आरोप करीत याबाबत तपास पूर्ण झाल्यानंतरच योग्य ती भूमिका घेऊ

सातारा : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना झालेली अटक सत्तेच्या गैरवापरातूनच झाल्याचे दिसत आहे, असा आरोप करीत याबाबत तपास पूर्ण झाल्यानंतरच योग्य ती भूमिका घेऊ,’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.‘रयत’चे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त पवार यांनी सोमवारी त्यांच्या समाधीस्थळावर जाऊन अण्णांच्या स्मृतींना अभिवादन केले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भुजबळ प्रकरणाबाबत विचारले असता त्यांनी हे वक्तव्य केले. ‘भुजबळ प्रकरणाचा तपास सुरू असून, सत्य परिस्थिती जनतेसमोर येईल,’ असेही पवार म्हणाले. ‘नरेंद्र मोदी यांच्या नावाचा गजर करून भाजप केंद्रात सत्तेत आले; परंतु गेल्या दोन वर्षांच्या कारभारानंतर आणि बिहारच्या निवडणूक निकालानंतर पंतप्रधान मोदी यांच्या वलयाला आहोटी लागल्याचे दिसत आहे. सध्या पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणूक निकालानंतर ते स्पष्ट होईल,’ असेही त्यांनी सांगितले. नितीशकुमार हे पंतप्रधानासाठी योग्य उमेदवार असल्याचे मत शरद पवारांनी यापूर्वी व्यक्त केले होते, त्याकडे लक्ष वेधले असता ‘मी याबाबत कोणाशीही चर्चा केलेली नाही. तसेच नितीशकुमार यांच्याशीही बोललो नाही. परंतु सध्याच्या परिस्थितीत बाकीच्या घटकांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता नितीशकुमार यांच्यामध्ये दिसते,’ असे ते म्हणाले. ‘राज्यात एका भागातच दुष्काळ नसून विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातही परिस्थिती गंभीर आहे. सरकारला गांभीर्य नसून मुख्यमंत्र्यांनी एखादा विभागाचा प्रमुख म्हणून नाही तर राज्याचा प्रमुख म्हणून काम करावे,’ असा टोलाही त्यांनी हाणला. दुष्काळाच्या प्रश्नांबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत, असेही पवार म्हणाले. (प्रतिनिधी)