शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

अटक सत्तेच्या गैरवापरातून

By admin | Updated: May 10, 2016 03:10 IST

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना झालेली अटक सत्तेच्या गैरवापरातूनच झाल्याचे दिसत आहे, असा आरोप करीत याबाबत तपास पूर्ण झाल्यानंतरच योग्य ती भूमिका घेऊ

सातारा : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना झालेली अटक सत्तेच्या गैरवापरातूनच झाल्याचे दिसत आहे, असा आरोप करीत याबाबत तपास पूर्ण झाल्यानंतरच योग्य ती भूमिका घेऊ,’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.‘रयत’चे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त पवार यांनी सोमवारी त्यांच्या समाधीस्थळावर जाऊन अण्णांच्या स्मृतींना अभिवादन केले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भुजबळ प्रकरणाबाबत विचारले असता त्यांनी हे वक्तव्य केले. ‘भुजबळ प्रकरणाचा तपास सुरू असून, सत्य परिस्थिती जनतेसमोर येईल,’ असेही पवार म्हणाले. ‘नरेंद्र मोदी यांच्या नावाचा गजर करून भाजप केंद्रात सत्तेत आले; परंतु गेल्या दोन वर्षांच्या कारभारानंतर आणि बिहारच्या निवडणूक निकालानंतर पंतप्रधान मोदी यांच्या वलयाला आहोटी लागल्याचे दिसत आहे. सध्या पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणूक निकालानंतर ते स्पष्ट होईल,’ असेही त्यांनी सांगितले. नितीशकुमार हे पंतप्रधानासाठी योग्य उमेदवार असल्याचे मत शरद पवारांनी यापूर्वी व्यक्त केले होते, त्याकडे लक्ष वेधले असता ‘मी याबाबत कोणाशीही चर्चा केलेली नाही. तसेच नितीशकुमार यांच्याशीही बोललो नाही. परंतु सध्याच्या परिस्थितीत बाकीच्या घटकांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता नितीशकुमार यांच्यामध्ये दिसते,’ असे ते म्हणाले. ‘राज्यात एका भागातच दुष्काळ नसून विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातही परिस्थिती गंभीर आहे. सरकारला गांभीर्य नसून मुख्यमंत्र्यांनी एखादा विभागाचा प्रमुख म्हणून नाही तर राज्याचा प्रमुख म्हणून काम करावे,’ असा टोलाही त्यांनी हाणला. दुष्काळाच्या प्रश्नांबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत, असेही पवार म्हणाले. (प्रतिनिधी)