शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

दहशतवादी अबू फैजलच्या अटकेपासून एटीएस मुकले

By admin | Updated: July 11, 2014 09:01 IST

बुलडाणा जिल्ह्यातील दहशतवादी कृत्यप्रकरणी सीमी व इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी अबू फैजल इम्रानखान याच्या अटकेपासून एटीएसला मुकावे लागेल.

मध्य प्रदेश पोलिसांचे मिळाले नाही एस्कॉर्ट : पुन्हा प्रयत्ननागपूर : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली-सैलानी येथील दहशतवादी कृत्यप्रकरणी सीमी आणि इंडियन मुजाहिद्दीनचा सक्रिय कार्यकर्ता जहाल दहशतवादी डॉ. अबू फैजल इम्रानखान याला नागपुरात आणण्यासाठी मध्य प्रदेश पोलिसांचे ‘एस्कॉर्ट’ न मिळाल्याने दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) तूर्त त्याच्या अटकेपासून मुकावे लागले. अबूला मध्य प्रदेश पोलिसांनी नागपूरच्या न्यायालयात हजर करावे, यासाठी नव्याने वॉरंट जारी करण्याच्या संदर्भात १६ जुलै रोजी एटीएस पुन्हा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस.डी. परवाणी यांच्या न्यायालयात अर्ज करणार आहे. अबू फैजल हा सध्या भोपाळच्या कारागृहात आहे. त्याला नागपूरच्या न्यायालयात हजर करण्याच्या संदर्भात या न्यायालयाने २७ जून २०१४ रोजी वॉरंट जारी केला होता. हा वॉरंट आधी भोपाळच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्याच्या न्यायालयात गेला. या न्यायालयाने अबूला नागपूरच्या न्यायालयात हजर करण्यात यावे यासाठी तेथील जेल अधीक्षकाच्या नावे वॉरंट जारी केला. येथील कारागृह प्रशासनास अबूला नागपुरात नेण्यासाठी मध्य प्रदेश पोलिसांचा एस्कॉर्ट उपलब्ध झाला नाही. मध्य प्रदेशचे काही पोलीस कर्मचारी आज नागपुरात आले आणि त्यांनी स्थानिक एटीएसला ही माहिती दिली. लागलीच पोलीस निरीक्षक व्ही. डी. मिश्रा हे विशेष सरकारी वकील प्रशांतकुमार सत्यनाथन यांच्यासह प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर झाले आणि त्यांनी अबूच्या वॉरंटसाठी नव्याने अर्ज करता यावा म्हणून तारीख मागितली. न्यायालयाने १६ जुलै ही तारीख मंजूर केली. मध्य प्रदेश पोलिसांनी अबूला नागपूरच्या न्यायालयात हजर केल्यानंतर एटीएसचे पथक त्याला सैलानी दर्गाप्रकरणी अटक करणार आहेत. अबूचा मोमीनपुऱ्यात संचारया गटाचा म्होरक्या डॉ. अबू फैजल आहे. हे सर्व दहशतवादी मध्य प्रदेश आणि विदर्भाचे नेटवर्क सांभाळून होते. अबू हा २६ जुलै २००८ रोजी अहमदाबाद येथे झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेतील मुख्य आरोपी आहे. २००९ मध्ये खंडव्याच्या कोतवाली पोलीस ठाण्यात या दहशतवाद्यांविरुद्ध भादंविच्या ३०७, २९५, १२४ अ, १५३ क, १२० ब, २१२, ३४, शस्त्र कायद्याच्या २५, २७, बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याच्या ३ (१०), (१३), (१५), (२०) कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. सामान्य आणि विशेष नागरिकांच्या हत्येचा प्रयत्न करून सामाजिक आणि धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी दहशतवादी कृत्य करणे, असा आरोप या गटावर आहे. अकिल खिलजी हा बाबरी विध्वंसानंतर सक्रिय झालेला आहे. तो मुस्लीम तरुणांमध्ये जिहादची भावना निर्माण करायचा, खलील हा त्याचा मुलगा आहे. अबरार हा मोमीनपुरा भागात राहिलेला आहे. खांडवा येथे एटीएसच्या शिपायाला गोळ्या घालून ठार केल्यानंतर अबरार हा एटीएसच्या रडारवर आला होता. अबरार हा मोमीनपुऱ्यात आश्रयाला असताना त्याला अबू फैजल भेटायचा.