मध्य प्रदेश पोलिसांचे मिळाले नाही एस्कॉर्ट : पुन्हा प्रयत्ननागपूर : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली-सैलानी येथील दहशतवादी कृत्यप्रकरणी सीमी आणि इंडियन मुजाहिद्दीनचा सक्रिय कार्यकर्ता जहाल दहशतवादी डॉ. अबू फैजल इम्रानखान याला नागपुरात आणण्यासाठी मध्य प्रदेश पोलिसांचे ‘एस्कॉर्ट’ न मिळाल्याने दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) तूर्त त्याच्या अटकेपासून मुकावे लागले. अबूला मध्य प्रदेश पोलिसांनी नागपूरच्या न्यायालयात हजर करावे, यासाठी नव्याने वॉरंट जारी करण्याच्या संदर्भात १६ जुलै रोजी एटीएस पुन्हा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस.डी. परवाणी यांच्या न्यायालयात अर्ज करणार आहे. अबू फैजल हा सध्या भोपाळच्या कारागृहात आहे. त्याला नागपूरच्या न्यायालयात हजर करण्याच्या संदर्भात या न्यायालयाने २७ जून २०१४ रोजी वॉरंट जारी केला होता. हा वॉरंट आधी भोपाळच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्याच्या न्यायालयात गेला. या न्यायालयाने अबूला नागपूरच्या न्यायालयात हजर करण्यात यावे यासाठी तेथील जेल अधीक्षकाच्या नावे वॉरंट जारी केला. येथील कारागृह प्रशासनास अबूला नागपुरात नेण्यासाठी मध्य प्रदेश पोलिसांचा एस्कॉर्ट उपलब्ध झाला नाही. मध्य प्रदेशचे काही पोलीस कर्मचारी आज नागपुरात आले आणि त्यांनी स्थानिक एटीएसला ही माहिती दिली. लागलीच पोलीस निरीक्षक व्ही. डी. मिश्रा हे विशेष सरकारी वकील प्रशांतकुमार सत्यनाथन यांच्यासह प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर झाले आणि त्यांनी अबूच्या वॉरंटसाठी नव्याने अर्ज करता यावा म्हणून तारीख मागितली. न्यायालयाने १६ जुलै ही तारीख मंजूर केली. मध्य प्रदेश पोलिसांनी अबूला नागपूरच्या न्यायालयात हजर केल्यानंतर एटीएसचे पथक त्याला सैलानी दर्गाप्रकरणी अटक करणार आहेत. अबूचा मोमीनपुऱ्यात संचारया गटाचा म्होरक्या डॉ. अबू फैजल आहे. हे सर्व दहशतवादी मध्य प्रदेश आणि विदर्भाचे नेटवर्क सांभाळून होते. अबू हा २६ जुलै २००८ रोजी अहमदाबाद येथे झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेतील मुख्य आरोपी आहे. २००९ मध्ये खंडव्याच्या कोतवाली पोलीस ठाण्यात या दहशतवाद्यांविरुद्ध भादंविच्या ३०७, २९५, १२४ अ, १५३ क, १२० ब, २१२, ३४, शस्त्र कायद्याच्या २५, २७, बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याच्या ३ (१०), (१३), (१५), (२०) कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. सामान्य आणि विशेष नागरिकांच्या हत्येचा प्रयत्न करून सामाजिक आणि धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी दहशतवादी कृत्य करणे, असा आरोप या गटावर आहे. अकिल खिलजी हा बाबरी विध्वंसानंतर सक्रिय झालेला आहे. तो मुस्लीम तरुणांमध्ये जिहादची भावना निर्माण करायचा, खलील हा त्याचा मुलगा आहे. अबरार हा मोमीनपुरा भागात राहिलेला आहे. खांडवा येथे एटीएसच्या शिपायाला गोळ्या घालून ठार केल्यानंतर अबरार हा एटीएसच्या रडारवर आला होता. अबरार हा मोमीनपुऱ्यात आश्रयाला असताना त्याला अबू फैजल भेटायचा.
दहशतवादी अबू फैजलच्या अटकेपासून एटीएस मुकले
By admin | Updated: July 11, 2014 09:01 IST