शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

वकिलाच्या अनुपस्थितीतही देता येतो अपिलावर निर्णय

By admin | Updated: July 25, 2016 05:14 IST

फौजदारी प्रकरणांमध्ये आरोपीचे वकील अनुपस्थित असतानाही अपिलीय न्यायालयांना गुणवत्तेच्या आधारावर निर्णय देता येतो. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर

राकेश घानोडे,  नागपूरफौजदारी प्रकरणांमध्ये आरोपीचे वकील अनुपस्थित असतानाही अपिलीय न्यायालयांना गुणवत्तेच्या आधारावर निर्णय देता येतो. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका अपिलावर निर्णय देताना हा जनजागृतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे.पारशिवनी येथील प्रकाश परशू उईके (४५) या आरोपीने जन्मठेपेच्या शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. अंतिम सुनावणीच्या वेळी त्याचे वकील अनुपस्थित होते. यामुळे नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती भूषण गवई व न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या ‘के. एस. पांडुरंगा’ प्रकरणातील निवाड्याचा संदर्भ देत वरीलप्रमाणे खुलासा केला.पत्नी सीता हिच्या हत्याप्रकरणात ४ फेब्रुवारी २०१३ रोजी नागपूर सत्र न्यायालयाने अरोपीला दोषी ठरवून जन्मठेप व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त सश्रम कारावास, अशी शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाच्या निर्णयात बदल करून आरोपीला भादंविच्या कलम ३०२ऐवजी कलम ३०४-२ (सदोष मनुष्यवध)अंतर्गत दोषी ठरविले व जन्मठेपेची शिक्षा सात वर्षे सश्रम कारावासात परिवर्तित केली.