शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

राज्य निवडणूक आयुक्तांवर बेकायदा निर्णयाबद्दल ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 06:13 IST

अधिकारांचे उल्लंघन : ग्रामपंचायत निवडणूक रद्द करणे गैर

मुंबई : निवडणूक अधिकाऱ्याच्या संगनमताने काही पात्र उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवून फेटाळण्यात आले आहेत व काही अपात्र उमेदवारांचे अर्ज मुद्दाम वैध ठरविण्यात आले आहेत, असे प्राथमिक चौकशीतून निष्पन्न झाले तरी राज्य निवडणूक आयोग त्याआधारे एखाद्या ग्रामपंचायतीची जाहीर झालेली निवडणूक पूर्णपणे रद्द करू शकत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. एवढेच नव्हे तर अधिकारांचे उल्लंघन करून अशा प्रकारे सोलापूर जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द केल्याबद्दल न्यायालयाने राज्य निवडणूक आयुक्त जगेश्वर सहारिया यांच्यावर कडक शब्दांत ताशेरेही ओढले.

उमेदवारी अर्ज अयोग्य पद्धतीने वैध ठरविणे किंवा फेटाळणे याविषयीचा वाद रीतसर साक्षीपुरावे घेऊनच निकाली काढला जाऊ शकतो. म्हणूनच अशा वादात निवडणूक झाल्यानंतर विजयी उमेदवाराच्या निवडीविरुद्ध सक्षम न्यायालयात याचिका करणे एवढाच मार्ग कायद्याने दिलेला आहे. असे असूनही निवडणूक आयोगाने स्वतंत्र व नि:ष्पक्ष निवडणूक घेण्याची जबाबदारी व निवडणूक पर्यवेक्षणाचे सर्वाधिकार यांचा दाखला देत अशा तक्रारींवरून जाहीर झालेली एखादी निवडणूक ऐनवेळी रद्द करणे म्हणजे कायद्याच्या प्रस्थापित व्यवस्थेला सुरुंग लावणे आहे, असेही न्यायालयाने म्हटले.याखेरीज न्यायालयाने असेही म्हटले की, ज्यांचे उमेदवारी अर्ज फेटाळले गेले होते त्यांच्यापैकी काही जणांनी याचिका केली असता, सुरु झालेल्या निवडणूक प्रक्रियेत आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असे म्हणून उच्च न्यायालयाने निवडणूक रद्द करण्यास नकार दिला होता. तरीही त्याच आधारे आयोगाने निवडणूक रद्द करणे म्हणजे न्यायालयावर कुरघोडी करणे आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील खुणेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादात न्या. रवींद्र बोर्डे व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. राज्यभरातील २६ जिल्ह्यांमधील अन्य हजारो ग्रामपंचायतींसोबत खुणेश्वर ग्रामपंचायतीची निवडणूकही आयोगाने १ नोव्हेंबर २०५ रोजी घ्यायचे जाहीर केले होते. त्यानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण झाली व वरीलप्रकारचे आरोप करण्यात आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून दिलेल्या अहवालाच्या आधारे निवडणूक आयुक्त सहारिया यांनी ठरलेली निवडणूक रद्द करण्याचा आदेश मतदानाच्या आदल्या दिवशी काढला होता. त्याविरुद्ध याचिका केली गेली होती.

पाच वर्षें प्रशासकाच्या ताब्यातखुणेश्वर ग्रामपंचायतीची १ नोव्हेंबर २०१५ रोजी व्हायची निवडणूक रद्द करून आयोगाने नंतर काही दिवसांतच निवडणूक घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने त्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यास अंतरिम स्थगिती देऊन ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमला होता. याचिका प्रलंबित राहिल्याने ही ग्रामपंचायत गेली सुमारे पाच वर्षे प्रशासकाच्या ताब्यात राहिली. आता न्यायालयाने पूर्णपणे नव्याने निवडणूक घेण्याचा आदेश दिला आहे.