शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा अन्नत्याग!

By admin | Updated: August 13, 2015 01:58 IST

प्रशासन विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत गंभीर नसल्याचा आरोप करीत अकोल्याच्या आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी गत तीन दिवसांपासून अन्नत्याग केला आहे.

अकोला : प्रशासन विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत गंभीर नसल्याचा आरोप करीत अकोल्याच्या आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी गत तीन दिवसांपासून अन्नत्याग केला आहे. प्रशासन मात्र ढिम्मच राहिल्याने, संतप्त विद्यार्थ्यांनी बुधवारी वसतिगृहातील साहित्याची नासधूस केली आणि प्रवेशद्वाराला कुलूप लावून स्वत:ला कोंडून घेतले.अकोला शहराच्या कृषिनगर परिसरात आदिवासी मुलांचे हे वसतिगृह आहे. त्याच्या छताला गळती लागल्याने शॉर्टसर्किटचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. शिवाय सर्वच खोल्यांमध्ये पाणी साचत असल्याने शैक्षणिक साहित्य व इतर महत्त्वाच्या वस्तू भिजत आहेत. पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था नसल्याने त्यांच्या आरोग्याला धोका झाला आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकाराला कंटाळून विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी आणि एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकाऱ्यांनाही निवेदन दिले; परंतु प्रशासनाने दखल घेतली नाही. परिणामी सोमवारपासून विद्यार्थ्यांनी अन्नत्याग केला. तरीही प्रशासनाकडून काहीच हालचाल न झाल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावून स्वत:ला कोंडून घेतले आणि इमारतीवरून तेथील वस्तूंची फेकाफेक केली. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली; मात्र मागण्या मान्य होईस्तोवर विद्यार्थ्यांनी कोणत्याही अधिकाऱ्यांशी बोलण्यास नकार दिला.इमारतीला गळती लागली असून, ही गंभीर समस्या आहे. ती निकाली लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इतर समस्यांबाबत विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. - नितीन तायडे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास मंडळ, अकोलाविद्यार्थी आजारी मूलभूत सुविधांसाठी गत तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांनी अन्नत्याग केल्याने दोन विद्यार्थी आजारी पडले. त्यांना सर्वाेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले.