शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा अन्नत्याग!

By admin | Updated: August 13, 2015 01:58 IST

प्रशासन विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत गंभीर नसल्याचा आरोप करीत अकोल्याच्या आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी गत तीन दिवसांपासून अन्नत्याग केला आहे.

अकोला : प्रशासन विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत गंभीर नसल्याचा आरोप करीत अकोल्याच्या आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी गत तीन दिवसांपासून अन्नत्याग केला आहे. प्रशासन मात्र ढिम्मच राहिल्याने, संतप्त विद्यार्थ्यांनी बुधवारी वसतिगृहातील साहित्याची नासधूस केली आणि प्रवेशद्वाराला कुलूप लावून स्वत:ला कोंडून घेतले.अकोला शहराच्या कृषिनगर परिसरात आदिवासी मुलांचे हे वसतिगृह आहे. त्याच्या छताला गळती लागल्याने शॉर्टसर्किटचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. शिवाय सर्वच खोल्यांमध्ये पाणी साचत असल्याने शैक्षणिक साहित्य व इतर महत्त्वाच्या वस्तू भिजत आहेत. पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था नसल्याने त्यांच्या आरोग्याला धोका झाला आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकाराला कंटाळून विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी आणि एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकाऱ्यांनाही निवेदन दिले; परंतु प्रशासनाने दखल घेतली नाही. परिणामी सोमवारपासून विद्यार्थ्यांनी अन्नत्याग केला. तरीही प्रशासनाकडून काहीच हालचाल न झाल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावून स्वत:ला कोंडून घेतले आणि इमारतीवरून तेथील वस्तूंची फेकाफेक केली. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली; मात्र मागण्या मान्य होईस्तोवर विद्यार्थ्यांनी कोणत्याही अधिकाऱ्यांशी बोलण्यास नकार दिला.इमारतीला गळती लागली असून, ही गंभीर समस्या आहे. ती निकाली लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इतर समस्यांबाबत विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. - नितीन तायडे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास मंडळ, अकोलाविद्यार्थी आजारी मूलभूत सुविधांसाठी गत तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांनी अन्नत्याग केल्याने दोन विद्यार्थी आजारी पडले. त्यांना सर्वाेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले.