शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
3
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
4
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
5
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
6
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
7
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
8
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
9
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
10
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
11
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
12
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
13
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
14
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
15
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
16
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
17
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
18
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
19
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
20
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!

आघाडीत 15 दिवसांपासून अबोला

By admin | Updated: September 5, 2014 01:53 IST

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाबाबत 15 दिवसांपासून एकमेकांशी बोलायलादेखील तयार नाहीत, असे चित्र आहे.

यदु जोशी - मुंबई
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाबाबत 15 दिवसांपासून एकमेकांशी बोलायलादेखील तयार नाहीत, असे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसच्या प्रतिसादाची अपेक्षा आहे तर काँग्रेस पक्ष आपले उमेदवार निश्चित करण्यात व्यस्त आहे.
जागा वाटपाबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांची शेवटची बैठक 2क् ऑगस्ट रोजी दिल्लीत झाली होती. त्या बैठकीला ए.के.अँटोनी, अहमद पटेल हे ज्येष्ठ काँग्रेस नेते तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीतर्फे उपस्थित होते. 
जागावाटपाबाबत पुन्हा चर्चेसाठी काँग्रेसकडे तगादा लावायचा नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे. पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की भाजपा आणि शिवसेनेची युती होते की नाही यावर आम्ही नजर ठेवून आहोत. ते वेगळे लढले तर आम्हीही वेगळे लढण्याचा विचार करु. मात्र स्वबळावर लढावे, असे राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्यांचे मत आहे. 
मात्र, जागावाटपाबाबत राष्ट्रवादीने घाई न करण्यामागे वेगळे कारण असल्याची चर्चा आहे. आतापासूनच जागावाटप झाले,काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या जागा लढणार हे ठरले तर राष्ट्रवादी सोडून भाजपा-शिवसेनेत जाणा:यांची संख्या वाढेल, ही भीती यामागे असल्याचे बोलले जाते. गेले काही दिवस राष्ट्रवादीतील अनेक लहानमोठे नेते पक्षाला रामराम ठोकत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. त्या मानाने काँग्रेस सोडून जाणा:या नेत्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे या पातळीवर काँग्रेसमध्ये तितकेसे चिंतेचे वातावरण नाही.  राष्ट्रवादीच्या मागणीसमोर न झुकण्याची भूमिका काँग्रेसने घेतलेली दिसते. 144 जागा राष्ट्रवादीला सोडण्याचा प्रश्नच नाही. दबावासमोर झुकण्यापेक्षा स्वबळावर लढलेले बरे असा काँग्रेसच्या काही नेत्यांचा सूर आहे. राष्ट्रवादीच्या कोटय़ातील 114 जागांसाठी काँग्रेसच्या इच्छुकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याने हा सूर अधिक गडद झाला आहे. युतीचे काय होते ते पाहून आघाडीचे ठरवू, असे सूचक उद्गार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वीच्या पत्र परिषदेत काढले होते.  
 
आम्हाला 144 जागा हव्या आहेत आणि तसा प्रस्ताव काँग्रेसला देण्यात आला आहे. त्यामुळे आमच्या बाजूने आघाडीबाबत बोलण्यासारखे काही नाही. काँग्रेसच्या प्रतिसादाची आम्हाला प्रतीक्षा आहे. 
- नवाब मलिक, राष्ट्रवादीचे प्रवक्ते
 
जागा वाटपाचा निर्णय दिल्लीतच होईल असे राष्ट्रवादीचे नेते वारंवार सांगत होते. आता चर्चेचा चेंडू  दोन्ही पक्षांच्या दृष्टीने दिल्लीच्या कोर्टात असताना राज्यातील त्यांच्या नेत्यांनी बोलण्यात काही अर्थ आहे असे वाटत नाही.  - सचिन सावंत, काँग्रेसचे प्रवक्ते.