शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
5
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
6
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
7
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
8
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
9
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
10
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
11
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
12
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
13
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
14
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
15
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
16
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
17
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
18
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
19
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
20
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी

आघाडीत 15 दिवसांपासून अबोला

By admin | Updated: September 5, 2014 01:53 IST

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाबाबत 15 दिवसांपासून एकमेकांशी बोलायलादेखील तयार नाहीत, असे चित्र आहे.

यदु जोशी - मुंबई
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाबाबत 15 दिवसांपासून एकमेकांशी बोलायलादेखील तयार नाहीत, असे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसच्या प्रतिसादाची अपेक्षा आहे तर काँग्रेस पक्ष आपले उमेदवार निश्चित करण्यात व्यस्त आहे.
जागा वाटपाबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांची शेवटची बैठक 2क् ऑगस्ट रोजी दिल्लीत झाली होती. त्या बैठकीला ए.के.अँटोनी, अहमद पटेल हे ज्येष्ठ काँग्रेस नेते तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीतर्फे उपस्थित होते. 
जागावाटपाबाबत पुन्हा चर्चेसाठी काँग्रेसकडे तगादा लावायचा नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे. पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की भाजपा आणि शिवसेनेची युती होते की नाही यावर आम्ही नजर ठेवून आहोत. ते वेगळे लढले तर आम्हीही वेगळे लढण्याचा विचार करु. मात्र स्वबळावर लढावे, असे राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्यांचे मत आहे. 
मात्र, जागावाटपाबाबत राष्ट्रवादीने घाई न करण्यामागे वेगळे कारण असल्याची चर्चा आहे. आतापासूनच जागावाटप झाले,काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या जागा लढणार हे ठरले तर राष्ट्रवादी सोडून भाजपा-शिवसेनेत जाणा:यांची संख्या वाढेल, ही भीती यामागे असल्याचे बोलले जाते. गेले काही दिवस राष्ट्रवादीतील अनेक लहानमोठे नेते पक्षाला रामराम ठोकत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. त्या मानाने काँग्रेस सोडून जाणा:या नेत्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे या पातळीवर काँग्रेसमध्ये तितकेसे चिंतेचे वातावरण नाही.  राष्ट्रवादीच्या मागणीसमोर न झुकण्याची भूमिका काँग्रेसने घेतलेली दिसते. 144 जागा राष्ट्रवादीला सोडण्याचा प्रश्नच नाही. दबावासमोर झुकण्यापेक्षा स्वबळावर लढलेले बरे असा काँग्रेसच्या काही नेत्यांचा सूर आहे. राष्ट्रवादीच्या कोटय़ातील 114 जागांसाठी काँग्रेसच्या इच्छुकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याने हा सूर अधिक गडद झाला आहे. युतीचे काय होते ते पाहून आघाडीचे ठरवू, असे सूचक उद्गार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वीच्या पत्र परिषदेत काढले होते.  
 
आम्हाला 144 जागा हव्या आहेत आणि तसा प्रस्ताव काँग्रेसला देण्यात आला आहे. त्यामुळे आमच्या बाजूने आघाडीबाबत बोलण्यासारखे काही नाही. काँग्रेसच्या प्रतिसादाची आम्हाला प्रतीक्षा आहे. 
- नवाब मलिक, राष्ट्रवादीचे प्रवक्ते
 
जागा वाटपाचा निर्णय दिल्लीतच होईल असे राष्ट्रवादीचे नेते वारंवार सांगत होते. आता चर्चेचा चेंडू  दोन्ही पक्षांच्या दृष्टीने दिल्लीच्या कोर्टात असताना राज्यातील त्यांच्या नेत्यांनी बोलण्यात काही अर्थ आहे असे वाटत नाही.  - सचिन सावंत, काँग्रेसचे प्रवक्ते.