शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
4
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
5
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
6
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
7
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
8
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
9
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
10
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
11
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
12
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
13
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
15
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
16
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
17
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
18
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
19
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
20
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी

शहरात अनधिकृत पोलीस चौक्यांना अभय

By admin | Updated: July 20, 2016 02:50 IST

सिडकोने शहरामध्ये पोलीस स्टेशन व चौक्यांसाठीही पुरेसे भूखंड ठेवले नाहीत.

नामदेव मोरे,

नवी मुंबई- सिडकोने शहरामध्ये पोलीस स्टेशन व चौक्यांसाठीही पुरेसे भूखंड ठेवले नाहीत. यामुळे शहरात गरजेपोटी पदपथ, मैदान व इतर ठिकाणी अनधिकृतपणे पोलीस स्टेशन व चौक्या उभ्या केल्या आहेत. अनधिकृत चौक्यांमध्ये काम करणारे पोलीस व त्यांना अभय देणारे पालिका, सिडकोचे अधिकारी प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांवर कारवाईसाठी एवढे उतावीळ का, असा प्रश्न स्थानिक रहिवासी विचारू लागले आहेत. प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे हा राज्यभर चर्चेचा विषय झाला आहे. अनेकांनी गरजेपोटी घरे हा काय प्रकार आहे असा प्रश्न विचारण्यास सुरवात केली आहे. जमिनीच्या मोबदल्यामध्ये स्थानिकांना पैसे दिले आहेत. साडेबारा टक्के भूखंड दिले आहेत. यानंतर पुन्हा गरजेपोटीच्या नावाखाली अतिक्रमण करणाऱ्यांना अभय का द्यायचे असे प्रश्नही विचारले जावू लागले आहेत. परंतु वास्तवामध्ये प्रकल्पग्रस्त हा विषय समजून घेतल्याशिवाय गरजेपोटीच्या घरांचा प्रश्न, निर्माण झालेली समस्या सुटणार नाही. सिडकोने १५ हजार, काही ठिकाणी ३० हजार रूपये एकर भावाने जमिनी संपादित केल्या आहेत. त्याच जमिनी आता ३ लाख रूपये चौरस मीटर रूपये दराने विकल्या जात आहेत. औद्योगिक वसाहतीमधील जमिनीही कवडीमोल किमतीने विकत घेतल्या. परंतु याच जमिनीवर भूमाफियांनी झोपड्यांचे साम्राज्य उभे केले. शेकडो एकर जमीन हडप केली आहे. त्यांना अभय देताना स्वत:च्या जमिनीवर घरे बांधणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना भूमाफिया ठरविले जात आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होवू लागला आहे. गरजेपोटी घरांची व्याख्या समजावून घ्यायची असेल तर शहरातील पोलीस स्टेशन व चौक्यांचा अभ्यास करावा. सिडकोने नियोजन केले नसल्याने चौक्या व पोलीस स्टेशनच्या विस्तारासाठी जागा नाही. परिणामी गरजेप्रमाणे महत्त्वाच्या ठिकाणी अतिक्रमण करून चौक्या उभारल्या जात आहेत. सानपाडामधील हुतात्मा बाबू गेणू मैदानामध्ये सानपाडा पोलीस स्टेशनची अनधिकृत इमारत बांधण्यात आली आहे. मैदानामध्ये पोलिसांनी जप्त केलेली व अपघातामधील वाहने अनधिकृतपणे उभी केली आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीजवळील अन्नपूर्णा चौकात पदपथावर वाहतूक विभागाची चौकी बांधली आहे. मसाला मार्केटच्या दुसऱ्या टोकालाही एपीएमसी पोलीस स्टेशनअंतर्गत बिट चौकी बांधण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने उड्डाणपुलाखालील जागेचा वापर करण्यास मनाई केली आहे. परंतु वाशी व तुर्भे पुलाखालीही वाहतूक चौक्या उभ्या केल्या आहेत. कोपरखैरणे तीन टाकीजवळही पदपथावर अनधिकृत चौकी उभारण्यात आली आहे. शहरातील ९० टक्के चौक्या अनधिकृतपणे बांधण्यात आल्या आहेत. या अनधिकृत चौकी व पोलीस स्टेशनमधून बंदोबस्त पुरविते हा विरोधाभास का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. >सौजन्यातून बांधकामांची संकल्पना फिफ्टीमध्ये बांधकाम करण्यास जमीन देत असल्याचाही आक्षेप घेतला जातो. परंतु वास्तवामध्ये अनेक प्रकल्पग्रस्तांची आर्थिक स्थिती नसल्याने त्यांना बिल्डरचे सहाय्य घेतल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. परंतु हीच संकल्पना लोकसहभाग नावाने पोलीसही वापरत आहेत. शहरातील पोलीस स्टेशन आवारातील वाढीव बांधकाम, पोलीस मुख्यालयातील नवीन वास्तू, पदपथावरील चौक्या उभारण्यासाठी शासनाचा निधी मिळालेला नसल्याने लोकसहभागातूनच त्यांचे बांधकाम करण्यात आले असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.