शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शहरात अनधिकृत पोलीस चौक्यांना अभय

By admin | Updated: July 20, 2016 02:50 IST

सिडकोने शहरामध्ये पोलीस स्टेशन व चौक्यांसाठीही पुरेसे भूखंड ठेवले नाहीत.

नामदेव मोरे,

नवी मुंबई- सिडकोने शहरामध्ये पोलीस स्टेशन व चौक्यांसाठीही पुरेसे भूखंड ठेवले नाहीत. यामुळे शहरात गरजेपोटी पदपथ, मैदान व इतर ठिकाणी अनधिकृतपणे पोलीस स्टेशन व चौक्या उभ्या केल्या आहेत. अनधिकृत चौक्यांमध्ये काम करणारे पोलीस व त्यांना अभय देणारे पालिका, सिडकोचे अधिकारी प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांवर कारवाईसाठी एवढे उतावीळ का, असा प्रश्न स्थानिक रहिवासी विचारू लागले आहेत. प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे हा राज्यभर चर्चेचा विषय झाला आहे. अनेकांनी गरजेपोटी घरे हा काय प्रकार आहे असा प्रश्न विचारण्यास सुरवात केली आहे. जमिनीच्या मोबदल्यामध्ये स्थानिकांना पैसे दिले आहेत. साडेबारा टक्के भूखंड दिले आहेत. यानंतर पुन्हा गरजेपोटीच्या नावाखाली अतिक्रमण करणाऱ्यांना अभय का द्यायचे असे प्रश्नही विचारले जावू लागले आहेत. परंतु वास्तवामध्ये प्रकल्पग्रस्त हा विषय समजून घेतल्याशिवाय गरजेपोटीच्या घरांचा प्रश्न, निर्माण झालेली समस्या सुटणार नाही. सिडकोने १५ हजार, काही ठिकाणी ३० हजार रूपये एकर भावाने जमिनी संपादित केल्या आहेत. त्याच जमिनी आता ३ लाख रूपये चौरस मीटर रूपये दराने विकल्या जात आहेत. औद्योगिक वसाहतीमधील जमिनीही कवडीमोल किमतीने विकत घेतल्या. परंतु याच जमिनीवर भूमाफियांनी झोपड्यांचे साम्राज्य उभे केले. शेकडो एकर जमीन हडप केली आहे. त्यांना अभय देताना स्वत:च्या जमिनीवर घरे बांधणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना भूमाफिया ठरविले जात आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होवू लागला आहे. गरजेपोटी घरांची व्याख्या समजावून घ्यायची असेल तर शहरातील पोलीस स्टेशन व चौक्यांचा अभ्यास करावा. सिडकोने नियोजन केले नसल्याने चौक्या व पोलीस स्टेशनच्या विस्तारासाठी जागा नाही. परिणामी गरजेप्रमाणे महत्त्वाच्या ठिकाणी अतिक्रमण करून चौक्या उभारल्या जात आहेत. सानपाडामधील हुतात्मा बाबू गेणू मैदानामध्ये सानपाडा पोलीस स्टेशनची अनधिकृत इमारत बांधण्यात आली आहे. मैदानामध्ये पोलिसांनी जप्त केलेली व अपघातामधील वाहने अनधिकृतपणे उभी केली आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीजवळील अन्नपूर्णा चौकात पदपथावर वाहतूक विभागाची चौकी बांधली आहे. मसाला मार्केटच्या दुसऱ्या टोकालाही एपीएमसी पोलीस स्टेशनअंतर्गत बिट चौकी बांधण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने उड्डाणपुलाखालील जागेचा वापर करण्यास मनाई केली आहे. परंतु वाशी व तुर्भे पुलाखालीही वाहतूक चौक्या उभ्या केल्या आहेत. कोपरखैरणे तीन टाकीजवळही पदपथावर अनधिकृत चौकी उभारण्यात आली आहे. शहरातील ९० टक्के चौक्या अनधिकृतपणे बांधण्यात आल्या आहेत. या अनधिकृत चौकी व पोलीस स्टेशनमधून बंदोबस्त पुरविते हा विरोधाभास का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. >सौजन्यातून बांधकामांची संकल्पना फिफ्टीमध्ये बांधकाम करण्यास जमीन देत असल्याचाही आक्षेप घेतला जातो. परंतु वास्तवामध्ये अनेक प्रकल्पग्रस्तांची आर्थिक स्थिती नसल्याने त्यांना बिल्डरचे सहाय्य घेतल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. परंतु हीच संकल्पना लोकसहभाग नावाने पोलीसही वापरत आहेत. शहरातील पोलीस स्टेशन आवारातील वाढीव बांधकाम, पोलीस मुख्यालयातील नवीन वास्तू, पदपथावरील चौक्या उभारण्यासाठी शासनाचा निधी मिळालेला नसल्याने लोकसहभागातूनच त्यांचे बांधकाम करण्यात आले असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.